शहरं
Join us  
Trending Stories
1
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
2
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
3
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
4
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
5
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
6
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
7
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
8
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
9
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
10
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
11
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
12
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
13
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
14
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
15
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
16
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
17
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
18
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
19
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
20
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

 थंडीमुळे द्राक्ष उत्पादकांमध्ये चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2019 2:42 PM

वणी : गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल झाला असुन थंडीमुळे तापमान घसरल्याने द्राक्ष उत्पादकांची चलबिचल झाली आहे. दिंडोरी ...

वणी : गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल झाला असुन थंडीमुळे तापमान घसरल्याने द्राक्ष उत्पादकांची चलबिचल झाली आहे. दिंडोरी तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासुन थंडीत वाढ झाली आहे.सद्यस्थितीतील हे वातावरण द्राक्ष बागांसाठी प्रतिकुल व मारक असेच आहे. सध्या द्राक्षबागातील बहरलेली द्राक्षे खरेदी करण्याची लगबग परप्रांतीय व्यापाऱ्याची सुरु आहे मात्र अशा वातावरणामुळे व्यापारी वर्गाने द्राक्ष खरेदी करण्याची गती कमी केली आहे. कारण काही दिवसांपुर्वी हरियाणा पंजाब दिल्ली नोईडा या भागात पावसाने हजेरी लावली होती सदर राज्यात तेव्हा मागणी नसल्याने द्राक्षबागांकडे व्यापारी वर्ग फिरकलाही नाही. मागील आठवडा भरात थंडिचा प्रभाव कमी झाला होता. तेव्हा द्राक्ष खरेदी विक्र ी प्रक्रि या सुलभ होइल असे वाटत होते, आता मात्र पुन्हा थंडीचे प्रमाण वाढले आहे. मकर संक्रातीनंतर थंडीचे प्रमाण कमी होते असे नैसर्गिक गणित मात्र त्याला छेद देत प्रतिकुल वातावरण निर्माण झाल्याने द्राक्ष उत्पादकांची चिंता वाढली आहे. अगोदरच द्राक्षाला कमी दर मिळत असताना उत्पादक चिंतातुर झाले होते व आता थंडी यामुळे उत्पादक दुहेरी कोंडीत सापडले आहेत.