शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
2
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
3
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
4
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
5
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
6
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
7
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
8
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
9
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
10
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
11
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
12
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
13
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
14
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
15
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
16
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
17
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
18
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
19
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
20
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात

मानधनासाठी संगणक परिचालकांचे आंदोलन सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 12:51 AM

ग्रामपंचायत पातळीवर सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम करणाऱ्या संगणक परिचालकांना गेल्या सहा महिन्यांपासून मानधन मिळालेले नसून, त्यांना त्वरित मानधन देण्यात यावे, त्याचबरोबर मानधनात वाढ करावी या मागणीसाठी जिल्ह्यातील संगणक परिचालकांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे.

एकलहरे : ग्रामपंचायत पातळीवर सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम करणाऱ्या संगणक परिचालकांना गेल्या सहा महिन्यांपासून मानधन मिळालेले नसून, त्यांना त्वरित मानधन देण्यात यावे, त्याचबरोबर मानधनात वाढ करावी या मागणीसाठी जिल्ह्यातील संगणक परिचालकांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींच्या कामकाजावर परिणाम होत आहे.शासनाने डिजिटल इंडियाच्या माध्यमातून प्रत्येक गावात आॅनलाइन दाखले व सुविधा देण्यासाठी राज्यातील २५ हजार ग्रामपंचायतींंमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून संगणक परिचालक प्रामाणिकपणे काम करत आहेत. यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आपले सरकार सेवा केंद्रामार्फत संगणक परिचालकांची नेमणूक केली आहे. केवळ सहा हजार रुपये इतकाच तुटपुंजा मासिक पगार या परिचालकांना दिला जातो. मात्र तोही चक्क सहा सहा महिने दिलाच जात नाही. सध्या संगणक परिचालकांचे गेल्या सहा महिन्यांपासून पगार दिलेले नाहीत. यासंदर्भात संगणक परिचालकांनी मुंबई येथे आंदोलन केले असता मुख्यमंत्र्यांनी १० ते १२ दिवसांत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले, परंतु त्याची पूर्तता होऊ शकली नाही. त्यामुळे राज्यातील सर्व संगणक परिचालकांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. यासंदर्भात संगणक परिचालकांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पी. एस. कोल्हे यांना मागण्यांचे निवेदन दिले असून, त्यात राज्यातील सर्व ग्रामपंचायत संगणक परिचालकांना महाराष्ट्र आय.टी. महामंडळाकडून संगणक परिचालक म्हणून कायमस्वरूपी नियुक्ती देणे, प्रतिमहिना किमान वेतन १५००० रुपये द्यावे, संगणक परिचालकांचे मागील एप्रिल २०१७ ते जुलै २०१९ पर्यंतचे सर्व थकीत मानधन देणे आदि मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी संघटनेचे तालुका अध्यक्ष शांताराम बेंडकुळे, हिरामण बेंडकुळे, निशांत डंबाळे, विनायक सूर्यवंशी, कैलास मोंढे, लहानू कचरे, राहुल पारधी, अनिल अवचट उपस्थित होते.छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान (शेतकरी कर्जमाफी) योजनेचे मानधन देणे, प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीणचे आॅनलाइन सर्व्हे केलेले मानधन मिळावे, नोटीस न देता कामावरून कमी केलेल्या संगणक परिचालकांना परत कामावर घ्यावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Governmentसरकारgram panchayatग्राम पंचायत