शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
2
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
3
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
4
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
5
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
6
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
7
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
8
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
9
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
10
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
11
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
12
स्विगी, झोमॅटो सारख्या कंपन्यांच्या डिलिव्हरी बॉईजना सुरक्षा मिळणार! 'या' अटी पूर्ण कराव्या लागतील; नवीन नियम जारी
13
राहुल नार्वेकरांचा Video व्हायरल, "माझ्याशी पंगा घेताय.."; हरिभाऊ राठोड यांनीही केले गंभीर आरोप
14
ठाण्यात एकाच घरात दोन पक्ष! मुलगा शिंदेसेनेतून, आई राष्ट्रवादी (शरद पवार) कडून आमने-सामने
15
Shrejal Guleria : अभिमानास्पद! वडील सैन्यात सुभेदार, लेक बनली फ्लाइंग ऑफिसर; तिसरी पिढी देशसेवेसाठी सज्ज
16
Video: आरारारा... खतरनाक! जेसन होल्डरने टाकला अजब-गजब चेंडू, क्रिकेटविश्वात रंगलीये चर्चा
17
सूडाची भावना! खांबाला बांधलं, केसाला धरुन फरफटत नेलं; लव्हमॅरेज केल्यावर जावयाला मारहाण
18
पनवेलमध्ये 'मविआ'ला उमेदवारांनीच दिला झटका! ७ जणांची माघार, भाजपाचे किती उमेदवार बिनविरोध विजयी?
19
राष्ट्रवादीचा 'मास्टरस्ट्रोक'! डॉक्टर, इंजिनिअर्ससह उत्तर भारतीयांना संधी, मलिक म्हणाले...
20
महापौरांसह सर्व समित्यांचे अध्यक्ष मराठीच हवेत! 'महानगरपालिकेसाठी मराठीनामा' कुणी केला जारी?
Daily Top 2Weekly Top 5

बदलत्या अभ्यासक्रमाची  सर्वांगीण ओळख व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 01:05 IST

विद्यार्थ्यांनी केवळ पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमाचा दहावीतील परीक्षेपुरता विचार करू नये, तर जिज्ञासा वाढवून भविष्यातदेखील या अभ्यासाचा आणि ज्ञानाचा कसा फायदा होईल याचा विचार करावा, त्यामुळे विद्यार्थी न बनता ज्ञानार्थी बना, असा सल्ला मान्यवर शिक्षणतज्ज्ञांनी मराठी विज्ञान परिषदेच्या वतीने आयोजित मार्गदर्शन कार्यशाळेत दिला.

नाशिक : विद्यार्थ्यांनी केवळ पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमाचा दहावीतील परीक्षेपुरता विचार करू नये, तर जिज्ञासा वाढवून भविष्यातदेखील या अभ्यासाचा आणि ज्ञानाचा कसा फायदा होईल याचा विचार करावा, त्यामुळे विद्यार्थी न बनता ज्ञानार्थी बना, असा सल्ला मान्यवर शिक्षणतज्ज्ञांनी मराठी विज्ञान परिषदेच्या वतीने आयोजित मार्गदर्शन कार्यशाळेत दिला. लवाटेनगर येथील लक्षिका मंगल कार्यालयात मराठी विज्ञान परिषदेच्या वतीने दहावीचा बदलणारा अभ्यासक्रम आणि बदलणारी मूल्यमापन पद्धती या विषयावर मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक महामंडळाचे सदस्य असणारे डॉ. स्नेहा जोशी, प्रा. डॉ. अ. ल. देशमुख, प्रा. डॉ. शिवानी लिमये, प्रा. माधव भुसकुटे, प्रा. डॉ. श्रृती चौधरी आदींनी विविध विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दहावीच्या वर्गामध्ये सर्व विषयांसंदर्भात शिकवण्याची पद्धत, अभ्यास करण्याची पद्धत, मूल्यमापन पद्धती, गट अभ्यास सहली, विज्ञान प्रयोग प्रात्यक्षिके अशा विविध अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात आले.  याप्रसंगी डॉ. स्नेहा जोशी यांनी दहावीच्या अभ्यासक्रमातील मराठी विषयाचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी प्रा. जोशी यांनी मूल्यमापन आराखडा पुस्तकाचा अभ्यास आवश्यक असल्याचे सांगून भाषा समृद्ध करण्याचे आवाहन केले. तसेच पालक आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांना अभिव्यक्त होऊ द्यावे, त्यांना विचार करण्याची संधी द्यावी, असेही स्पष्ट केले.  याप्रसंगी प्रा. डॉ. शिवानी लिमये यांनी इतिहास, राज्यशास्त्र विषय हे इंग्रजी, गणित आणि विज्ञानाइतकेच महत्त्वाचे असल्याचे सांगून इतिहासातील अभ्यासक्रमाचे बारकावे स्पष्ट केले.  प्रमुख पाहुणे विश्वास बँकेचे अध्यक्ष विश्वास ठाकूर व वृंदा लवाटे यांनीही मनोगत व्यक्त केले.  याप्रसंगी डॉ. धनंजय अहिरे यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना जीवनातील दहावी परीक्षेचे महत्त्व सांगितले. सूत्रसंचालन तृप्ती बक्षी यांनी केले. प्रास्ताविक अजित टक्के यांनी केले.विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसादशैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच दहावी परीक्षेचा अभ्यासक्रम आणि मूल्यमापन पद्धतीविषयी आयोजित केलेल्या या कार्यशाळेला विविध शाळांमधील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यात रचना व नवरचना विद्यालय, आदर्श शाळा, आनंद निकेतन शाळा तसेच जिल्हा परिषद व महापालिका शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते. तसेच अनेक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि पालकही उपस्थित होते.

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळा