शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
2
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
3
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
4
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
5
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
6
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
7
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
8
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
9
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
10
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
11
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
12
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
13
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
14
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
15
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
16
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
17
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
18
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
19
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
20
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या

सर्वसमावेशक आणि आश्वासक पंढरीची वारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 12:50 AM

महाराष्टÑ आणि राज्यालगतच्या कर्नाटक, मध्य प्रदेश, आंध्र, गुजरात व भारतातील अन्य भागांतूनही हजारो-लाखो वारकरी स्री-पुरुष पंढरीच्या या वारीत सामील होत असतात. आषाढी वारीच्या कुतूहल आणि उत्सुकतेपोटी जगभरातील अन्य देशांतूनही अनेक लोक येत असतात. कुणाच्याही आमंत्रण आणि आग्रहाशिवाय लाखो वारकरी स्री-पुरुष आबालवृद्ध का येतात हा कौतुकाचा आणि कुतूहलाचा विषय आहे. विठुरायाच्या दर्शन- भेटीसाठी लाखो वारकरी या आषाढी वारीत सामील होत असतात. हा एक चमत्कार आहे.

ठळक मुद्देखरा खुरा निखळ, सात्त्विक आनंद वारीत सामील झाल्यावर

प्रा. डॉ. यशवंतराव पाटील

महाराष्टÑ आणि राज्यालगतच्या कर्नाटक, मध्य प्रदेश, आंध्र, गुजरात व भारतातील अन्य भागांतूनही हजारो-लाखो वारकरी स्री-पुरुष पंढरीच्या या वारीत सामील होत असतात. आषाढी वारीच्या कुतूहल आणि उत्सुकतेपोटी जगभरातील अन्य देशांतूनही अनेक लोक येत असतात. कुणाच्याही आमंत्रण आणि आग्रहाशिवाय लाखो वारकरी स्री-पुरुष आबालवृद्ध का येतात हा कौतुकाचा आणि कुतूहलाचा विषय आहे. विठुरायाच्या दर्शन- भेटीसाठी लाखो वारकरी या आषाढी वारीत सामील होत असतात. हा एक चमत्कार आहे.या वारीला खूप मोठी पौराणिक आणि ऐतिहासिक परंपरा आहे. महाराष्टÑात अशी अनेक घराणी, कुटुंबे, परिवार व व्यक्ती आहेत की ज्यांना ‘पंढरीच्या आषाढी वारीचे’ एक-दोन महिने अगोदरच वेध लागलेले असतात. वेगवेगळ्या संत-महंतांच्या सत्पुरुषांच्या लहान-मोठ्या हजारो दिंड्या त्यांच्या स्री-पुरुष वारकऱ्यांसमवेत सामील होतात. या सामीलकीचा आगळावेगळा भक्तिभाव त्यांच्या चेहºयावर दिसत असतो.‘दिंड्या चालल्या-चालल्या, विठ्ठलाच्या दर्शनाला।।घुमे गजर हरिनामाचा, भक्त हरिनामात रंगला ।।टिळा वैष्णव हे ल्याले । गळा हार तुळशीमाळ ।।एक तारी देते साथ । टाळ-मृदंगाच्या ताला ।।’ असे दिसून येते.आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्र अशा चार वाºया वर्षभर सुरू असतात. मात्र आषाढी वारी ही सर्वांत मोठी असते. सर्वच स्तरातून या वारीची विशेष दखल घेतली जाते. लाखो वैष्णवांची मांदियाळी विठ्ठल भावभक्तीने मजल दरमजल करीत पंढरपूरच्या दिशेने विठ्ठल दर्शन-भेटीच्या ओढीने पुढे सरकत असते. वारीत कुठल्याही प्रकारचा भेदभाव नसतो. ‘सम-सकला पाहू’ आणि ‘भेदा भेद भ्रम अमंगळ’ हे वारीतल्या सर्व वारकऱ्यांचे आचार विचार सूत्र असते. हेच फार कौतुकाचे आहे. वारीत सामील न होणाºयांनाही कौतुक करायला व अचंबित होण्यास लावणारे आहे. सर्व जाती-धर्म, पंथ-गोत्रांचे वैष्णव विठ्ठलभक्तीने अभिमंत्रित होऊन विठ्ठलनामाचा गजर करीत असतात. यातूनच त्यांच्यातील काम, क्रोध, राग, लोभ, मोह, माया यांसारख्या षड्रिपूंचा निचरा होत असतो. यातून वारकºयांना आंतरिक शुद्धता आणि समाधान लाभते. पंढरीच्या आषाढी वारीबद्दल बरंच काही वाचण्यात, ऐकण्यात पाहण्यात येते. या संबंधात वर्तमानपत्रातही वारीसंबंधी लेखनाचा महापूर दिसतो. दूरदर्शनवर बरीच दृश्ये दिसतात; पण खरा खुरा निखळ, सात्त्विक आनंद वारीत सामील झाल्यावर किमान वारीसमवेत काही अंतर पायी चालण्यातून मिळत असतो. ‘एक मेका सहाय्य करू। अवघे धरू सुपंथ।।’ हा मनोभाव मनात साठवून प्रत्येक वारकºयाचा आचार-विचार, धर्म वारीत लहान-सहान प्रसंगातून पहायला मिळतो. सामील झालेल्यांना प्रत्यक्ष अनुभवास येतो. विठ्ठलाच्या भावभक्तीतून निर्माण झालेल्या शारीरिक, मानसिक आणि आत्मिक बळावरच वारीतील वारकरी पाऊस, वादळ, वारा, अडचणीचे अडवळणाचे घाट, अरुंद, गैरसोयीचे रस्ते... आदी कशाचीही पर्वा न करता आनंदविभोर अवस्थेत विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे कूच करीत असतात. जसजसे पंढरपूर जवळ येते, तसतसे वारकºयांच्या हालचाली अधिकाधिक गतिमान आणि उत्साही होत जातात. मुखी विठुरायाचा गजर, काहींच्या हातात भगवे झेंडे, गळ्यात टाळ-मृदंग, कपाळी अष्टगंध व बुक्का... सारेच विलोभनीय! भक्तिभावाची श्रीमंतीदर्शविणारे असते. कुणी बेभान होऊन नाचत, कुणी फुगड्या घालत, कुणी टाळ-मृदंगाच्या तालात आणि सुरात भजन म्हणतात. प्रचंड गर्दीत सहभागी झालेल्या लाखो साधकांना लाडक्या विठुरायाचे दर्शन होईल का नाही, हा प्रश्न वारीत सामील न झालेल्यांचा असतो. ज्या विठुरायाच्या भावभक्तीने आणि त्याच्या दर्शनाच्या ओढीने अभिमंत्रित झालेल्यांना हा प्रश्नच पडत नाही. जसजसे पंढरपूर वारकºयांचे माहेर सुखाचा स्वर्ग जवळ जवळ येतो, तसतसा त्यांच्या मनात भाव निर्माण होतो.(लेखक संत साहित्याचे अभ्यासक आहेत.)