शहरं
Join us  
Trending Stories
1
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
2
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
3
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
4
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
5
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
6
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल
7
सरकारमान्य दरांना ठेंगा! ओला, उबरकडून मनमानी; RTO लायसन्स रद्द करण्याचा इशारा हवेतच
8
नवी मुंबईतून डिसेंबरपासून देश-विदेशसाठी करा उड्डाण; नव्या विमानतळाची ९ कोटी प्रवासी क्षमता
9
कोकणात जाणारी रो-रो सेवा ऑक्टोबरपासून; साडे पाच तासांत सिंधुदुर्ग गाठता येणार, दर किती? पाहा
10
...अन्यथा नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाई; कुळगाव बदलापूरप्रकरणी उच्च न्यायालयाचा इशारा
11
कुजबुज! जनता रस्त्यावर उतरताच मतावर डोळा ठेवून ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांना जागा आली का?
12
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
13
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
14
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
15
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
16
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
17
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
18
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
19
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
20
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."

सर्वसमावेशक आणि आश्वासक पंढरीची वारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 00:51 IST

महाराष्टÑ आणि राज्यालगतच्या कर्नाटक, मध्य प्रदेश, आंध्र, गुजरात व भारतातील अन्य भागांतूनही हजारो-लाखो वारकरी स्री-पुरुष पंढरीच्या या वारीत सामील होत असतात. आषाढी वारीच्या कुतूहल आणि उत्सुकतेपोटी जगभरातील अन्य देशांतूनही अनेक लोक येत असतात. कुणाच्याही आमंत्रण आणि आग्रहाशिवाय लाखो वारकरी स्री-पुरुष आबालवृद्ध का येतात हा कौतुकाचा आणि कुतूहलाचा विषय आहे. विठुरायाच्या दर्शन- भेटीसाठी लाखो वारकरी या आषाढी वारीत सामील होत असतात. हा एक चमत्कार आहे.

ठळक मुद्देखरा खुरा निखळ, सात्त्विक आनंद वारीत सामील झाल्यावर

प्रा. डॉ. यशवंतराव पाटील

महाराष्टÑ आणि राज्यालगतच्या कर्नाटक, मध्य प्रदेश, आंध्र, गुजरात व भारतातील अन्य भागांतूनही हजारो-लाखो वारकरी स्री-पुरुष पंढरीच्या या वारीत सामील होत असतात. आषाढी वारीच्या कुतूहल आणि उत्सुकतेपोटी जगभरातील अन्य देशांतूनही अनेक लोक येत असतात. कुणाच्याही आमंत्रण आणि आग्रहाशिवाय लाखो वारकरी स्री-पुरुष आबालवृद्ध का येतात हा कौतुकाचा आणि कुतूहलाचा विषय आहे. विठुरायाच्या दर्शन- भेटीसाठी लाखो वारकरी या आषाढी वारीत सामील होत असतात. हा एक चमत्कार आहे.या वारीला खूप मोठी पौराणिक आणि ऐतिहासिक परंपरा आहे. महाराष्टÑात अशी अनेक घराणी, कुटुंबे, परिवार व व्यक्ती आहेत की ज्यांना ‘पंढरीच्या आषाढी वारीचे’ एक-दोन महिने अगोदरच वेध लागलेले असतात. वेगवेगळ्या संत-महंतांच्या सत्पुरुषांच्या लहान-मोठ्या हजारो दिंड्या त्यांच्या स्री-पुरुष वारकऱ्यांसमवेत सामील होतात. या सामीलकीचा आगळावेगळा भक्तिभाव त्यांच्या चेहºयावर दिसत असतो.‘दिंड्या चालल्या-चालल्या, विठ्ठलाच्या दर्शनाला।।घुमे गजर हरिनामाचा, भक्त हरिनामात रंगला ।।टिळा वैष्णव हे ल्याले । गळा हार तुळशीमाळ ।।एक तारी देते साथ । टाळ-मृदंगाच्या ताला ।।’ असे दिसून येते.आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्र अशा चार वाºया वर्षभर सुरू असतात. मात्र आषाढी वारी ही सर्वांत मोठी असते. सर्वच स्तरातून या वारीची विशेष दखल घेतली जाते. लाखो वैष्णवांची मांदियाळी विठ्ठल भावभक्तीने मजल दरमजल करीत पंढरपूरच्या दिशेने विठ्ठल दर्शन-भेटीच्या ओढीने पुढे सरकत असते. वारीत कुठल्याही प्रकारचा भेदभाव नसतो. ‘सम-सकला पाहू’ आणि ‘भेदा भेद भ्रम अमंगळ’ हे वारीतल्या सर्व वारकऱ्यांचे आचार विचार सूत्र असते. हेच फार कौतुकाचे आहे. वारीत सामील न होणाºयांनाही कौतुक करायला व अचंबित होण्यास लावणारे आहे. सर्व जाती-धर्म, पंथ-गोत्रांचे वैष्णव विठ्ठलभक्तीने अभिमंत्रित होऊन विठ्ठलनामाचा गजर करीत असतात. यातूनच त्यांच्यातील काम, क्रोध, राग, लोभ, मोह, माया यांसारख्या षड्रिपूंचा निचरा होत असतो. यातून वारकºयांना आंतरिक शुद्धता आणि समाधान लाभते. पंढरीच्या आषाढी वारीबद्दल बरंच काही वाचण्यात, ऐकण्यात पाहण्यात येते. या संबंधात वर्तमानपत्रातही वारीसंबंधी लेखनाचा महापूर दिसतो. दूरदर्शनवर बरीच दृश्ये दिसतात; पण खरा खुरा निखळ, सात्त्विक आनंद वारीत सामील झाल्यावर किमान वारीसमवेत काही अंतर पायी चालण्यातून मिळत असतो. ‘एक मेका सहाय्य करू। अवघे धरू सुपंथ।।’ हा मनोभाव मनात साठवून प्रत्येक वारकºयाचा आचार-विचार, धर्म वारीत लहान-सहान प्रसंगातून पहायला मिळतो. सामील झालेल्यांना प्रत्यक्ष अनुभवास येतो. विठ्ठलाच्या भावभक्तीतून निर्माण झालेल्या शारीरिक, मानसिक आणि आत्मिक बळावरच वारीतील वारकरी पाऊस, वादळ, वारा, अडचणीचे अडवळणाचे घाट, अरुंद, गैरसोयीचे रस्ते... आदी कशाचीही पर्वा न करता आनंदविभोर अवस्थेत विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे कूच करीत असतात. जसजसे पंढरपूर जवळ येते, तसतसे वारकºयांच्या हालचाली अधिकाधिक गतिमान आणि उत्साही होत जातात. मुखी विठुरायाचा गजर, काहींच्या हातात भगवे झेंडे, गळ्यात टाळ-मृदंग, कपाळी अष्टगंध व बुक्का... सारेच विलोभनीय! भक्तिभावाची श्रीमंतीदर्शविणारे असते. कुणी बेभान होऊन नाचत, कुणी फुगड्या घालत, कुणी टाळ-मृदंगाच्या तालात आणि सुरात भजन म्हणतात. प्रचंड गर्दीत सहभागी झालेल्या लाखो साधकांना लाडक्या विठुरायाचे दर्शन होईल का नाही, हा प्रश्न वारीत सामील न झालेल्यांचा असतो. ज्या विठुरायाच्या भावभक्तीने आणि त्याच्या दर्शनाच्या ओढीने अभिमंत्रित झालेल्यांना हा प्रश्नच पडत नाही. जसजसे पंढरपूर वारकºयांचे माहेर सुखाचा स्वर्ग जवळ जवळ येतो, तसतसा त्यांच्या मनात भाव निर्माण होतो.(लेखक संत साहित्याचे अभ्यासक आहेत.)