शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार, बहुतांश एक्झिट पोलचा अंदाज
2
नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मला महाराष्ट्राची अपेक्षित साथ नाही !
3
उत्तरेत पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजप पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा
4
पश्चिम बंगालमध्ये भाजप तृणमूलला देणार धक्का, २०१९च्या तुलनेत सरस कामगिरी करणार
5
हिटमॅनचा फॅन मैदानात शिरला! अमेरिकेच्या पोलिसांनी इंगा दाखवला; रोहितही अवाक्, Video
6
अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगचे इटलीत सेलिब्रेशन
7
पंतप्रधान मोदींची ४५ तास ध्यान साधना, संतकवी तिरुवल्लुवर यांना वाहिली पुष्पांजली
8
केजरीवाल जेलमधूनच बघणार लोकसभा निकाल, अंतरिम जामीन अर्जावरील निर्णय कोर्टाकडून ५ जूनपर्यंत राखून
9
जावई-सासऱ्यातील समेटासाठी मुलाचा आधार, संवाद साधण्याचा उच्च न्यायालयाचा सल्ला 
10
भारतीय फलंदाजांनी निडरपणे खेळावे - सौरव गांगुली
11
स्कूलबसच्या अपघाताला शाळा संचालकही जबाबदार, पंजाब आणि हरयाणा हायकोर्टाने सुनावले
12
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: देशात 'मोदी 3.0' चीच हवा, महाराष्ट्रात मात्र 'कट टू कट' जागा
13
IND vs BAN Live : वर्ल्ड कपची तयारी सुरू! विराट कोहली आज बाकावर; रोहितसोबत संजू मैदानात
14
दिनेश कार्तिकचा क्रिकेटला 'पूर्णविराम', स्टार खेळाडूची निवृत्ती, टीम इंडियाचा खरा 'इम्पॅक्ट'
15
Exit Poll: महाराष्ट्रात मोठी उलथापालथ; महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी, असे आहेत आकडे
16
IND vs BAN Live : ...म्हणून विराट कोहली सराव सामना खेळत नाही; रोहित शर्मानं सांगितलं कारण
17
उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजपा पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा 
18
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : कर्नाटकात इंडिया आघाडीला धक्का? एक्झिट पोलचे आकडे आले समोर, एनडीएसाठी खुशखबर
19
मोठी बातमी: दक्षिण भारतातील एक्झिट पोलचे आकडे समोर; कोणाला, किती जागा?
20
Exit Poll : बीडमध्ये पंकजा मुंडेंकडे आघाडी तर नगरमध्ये भाजपला मोठा धक्का!

कळवणला भरदिवसा घरफोड्या; लाखोंचा ऐवज गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 1:05 AM

१२ मे ही लग्नकार्याची दाट तिथी असल्याने बहुतांशी कळवणकर घरांना कुलूप लावून लग्नकार्याला बाहेरगावी गेल्याचा फायदा घेत अट्टल घरफोड्यांनी चार ठिकाणी घरफोड्या करत लाखोंचा ऐवज लांबविला आहे. याप्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला.

कळवण : १२ मे ही लग्नकार्याची दाट तिथी असल्याने बहुतांशी कळवणकर घरांना कुलूप लावून लग्नकार्याला बाहेरगावी गेल्याचा फायदा घेत अट्टल घरफोड्यांनी चार ठिकाणी घरफोड्या करत लाखोंचा ऐवज लांबविला आहे. याप्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला.  शहरातील वेगवेगळ्या भागात चार ठिकाणी बंद घरांचे कुलूप तोडून  भरदिवसा दुपारी २ ते ३ वाजेच्या सुमारास धाडसी चोऱ्या झाल्या. त्यामुळे  शहरातील नागरिकांमध्ये खळबळ  उडाली असून, भीतीचे वातावरण  पसरले आहे. रात्री उशिरा श्वान  पथकाला पाचारण करण्यात आल्याने उशिरा  गुन्हा दाखल झाला . कसमादे पट्ट्यात 12 मे लग्नाची शेवटची तिथी असल्याने शहरात व कॉलनी परिसरात दिवसभर शुकशुकाट होता. या संधीचा फायदा घेऊन चोरटयांनी आपला मोर्चा कळवण शहरातील गणेशनगर भागातील रेणुका कॉलनीतील कळवण पंचायत समतिीचे गटविकासधिकारी डी एम बिहरम, शिवनेरी कॉलनीतील भरत पाटील, ग्रामसेवक पवार हे संपूर्ण कुटुंबासह लग्न समारंभासाठी बाहेर गावी गेले होते. चप्पल बुटाचे व्यापारी गोविंद पंढरीनाथ मालपुरे हे आपल्या व्यापारी प्रतिष्ठानात गेले होते. दुपारच्या सुमारास उन्हाच्या तडाख्यामुळे काही नागरिक घरात झोपले असल्याचा फायदा घेत सर्वांच्या बंद घराचे कुलूप कोयंडा तोडून भरिदवसा धाडसी चोर्या केल्या आहेत.  या चोरीत लाखो रु पयांचा मुद्देमाल गेल्याने व दिवसा चोर्या झाल्याने कळवण शहरातील नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे. या चोरीचा तपास लावण्यासाठी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. रात्री उशीराने श्वान पथक दाखल झालेल्या रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. या चोर्यांचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी देवीदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल फुला, विनोद जाधोर, पोलीस कर्मचारी करीत आहेत. 

टॅग्स :PoliceपोलिसCrimeगुन्हा