शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
3
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
4
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
5
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
6
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
7
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
8
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
9
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
10
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
11
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
12
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
13
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
14
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
15
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
16
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
17
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
18
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
19
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
Daily Top 2Weekly Top 5

हक्काचे पाणी मिळत नसल्याची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 00:13 IST

तालुक्यातील उंदीरवाडीसाठी पालखेड कालव्यातून हक्काचे असलेले पाणी गेट बंद असल्यामुळे मिळत नाही त्यामुळे शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून हा प्रश्न सोडवण्यासाठी ग्रामस्थांनी बैठकीचे आयोजन करून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी चर्चा केली.

येवला : तालुक्यातील उंदीरवाडीसाठी पालखेड कालव्यातून हक्काचे असलेले पाणी गेट बंद असल्यामुळे मिळत नाही त्यामुळे शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून हा प्रश्न सोडवण्यासाठी ग्रामस्थांनी बैठकीचे आयोजन करून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी चर्चा केली. या बैठकीसाठी भाजपा नेते बाबा डमाळे यांना निमंत्रित करण्यात आले होते. याप्रसंगी डमाळे यांनी समस्या समजावुन घेत आपण जलसंपदा तथा पालकमंत्री गिरीश महाजन व संबंधित अधिकार्यामार्फत ही समस्या सोडवू असे आश्वासन त्यांनी दिले. उंदिरवाडी च्या धामणानदीवरील सर्व बंधारे पाण्याने पालखेड कालव्याच्या आवर्तनातून यापूर्वी भरून दिले जात होते. याकरिता धामणगाव शिवारातील फाळके नाल्यावर झडत होती मात्र गेल्या अनेक वर्षापासून ती बंद झाली आहे. या ठिकाणी दरवाजा (गेट) बसवण्याकरीता शेतकर्यांची गेल्या अनेक वर्षापासून मागणी होती. याकरीता अनेक अधिकारी, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्याकडे वारंवार मागणी करूनही सदर समस्याचे निराकरण होत नाही. यासाठी बाबा डमाळे आपला प्रश्न मार्गी लावतील या अपेक्षेने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या समस्यांचा पाठपुरावा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या मार्फत सोडवू असे डमाळे यांनी यावेळी आश्वासन दिले.याप्रसंगी बाळासाहेब देशमुख, मारु ती जेजुरकर, संतोष केंद्रे, प्रशांत देशमुख, संजय देशमुख, गोटीराम देशमुख, मुन्ना देशमुख, बापू देशमुख, अशोक पवार, तुळशीदास देशमुख, दिगंबर जेजुरकर, अरविंद क्षीरसागर, गोविंद क्षीरसागर, राजेंद्र क्षीरसागर, शुक्लेश्वर पवार, वाल्मीक  देशमुख, सुदाम गायकवाड, अमोल जेजुरकर, दत्तू चौधरी यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई