शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
7
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
8
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
9
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
10
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
11
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
12
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
13
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
14
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
15
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
16
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
17
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
18
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
19
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
20
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार

इंदिरानगरला महावितरणच्या विरोधात तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 00:31 IST

इंदिरानगर व परिसरात गेल्या काही महिन्यांपासून वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने तो सुरळीत करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांसाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे प्रतिपादन आमदार देवयानी फरांदे यांनी केले.

इंदिरानगर : इंदिरानगर व परिसरात गेल्या काही महिन्यांपासून वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने तो सुरळीत करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांसाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे प्रतिपादन आमदारदेवयानी फरांदे यांनी केले.परिसरातील महावितरण कंपनीकडून वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने त्यासंदर्भात महावितरण कंपनीचे अधिकारी व नागरिकांच्या बैठकीचे आयोजन प्रभाग क्रमांक २३ व ३० च्या नगरसेवकांनी अजय मित्रमंडळाच्या सभागृहात केले होते त्यावेळी बोलत होत्या. यावेळी सुमारे सहा ते सात महिन्यांपासून नासर्डी ते राजीवनगर दरम्यान नेहमीच होणाºया विजेचा लपंडावामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत तसेच पाऊस सुरू होण्यापूर्वीच विद्युत पुरवठा खंडित होतो. महापालिकेच्याकडे तक्रार करूनसुद्धा वृक्षाच्या फांद्या छाटल्या जात नाहीत यांसह विविध तक्रारींचा पाढा वाचून महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना नागरिकांनी बैठकीत धारेवर धरले होते. यावेळी फरांदे म्हणाल्या की, जिल्हा नियोजनचा निधी उपलब्ध करून देत असून तातडीने नागरिकांच्या समस्या सोडवा अशी सूचना केली तसेच परिसरातील विद्युत तारा भूमिगत करण्याच्या सूचनाही करण्यात आल्या.प्रास्ताविक करताना नगरसेवक डॉ. दीपाली कुलकर्णी यांनी महावितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता मोहिते नगरसेवकांचेसुद्धा फोन उचलत नाही, अशी तक्रार केली. व्यासपीठावर आमदारदेवयानी फरांदे, नगरसेवक सतीश कुलकर्णी, सतीश सोनवणे, चंद्रकांत खोडे, अ‍ॅड. श्याम बडोदे, रूपाली निकुळे, शाहीन मिर्झा यांसह महावितरण कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.गेल्या सात दिवसांपूर्वी काही भागात चोवीस तास विद्युत पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना उकाड्यामुळे रात्र जागून काढावी लागली. तसेच बहुतेक ठिकाणी डीपी उघड्या असल्याने दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भूमिगत विद्युत तारा कधी होणार ? तसेच वीज बिल भरण्याची तारीख निघून गेल्यानंतर वीज बिले मिळत आहेत. याबाबत काय कारवाई करणार अशी विचारणा करण्यात आली़

टॅग्स :electricityवीजMLAआमदारDevyani Farandeदेवयानी फरांदे