शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

सामुदायिक विवाह सोहळा : नाशिक जिल्ह्यातील ९६ जोडप्यांचे जुळले रेशीमबंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 23:50 IST

राज्याचे धर्मदाय आयुक्त शिवकुमार डिगे यांच्या संकल्पनेनुसार आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब, कर्जबाजारी शेतकरी कुटुंबांमधील वय झालेल्या मुला-मुलींचा सामुदायिक विवाह सोहळा राज्यभरात आयोजित केला जात आहे.

ठळक मुद्दे नवजोडप्यांना संसारोपयोगी आवश्यक भेटवस्तूदेखील देण्यात आल्यानाशिक विभागात २१७ जोडपे विवाहबद्ध ९६ जोडपे विवाहबद्ध झाल्याने सुमारे १९२ कुटुंबांची चिंता दूर

नाशिक : नियतीने ज्यांच्या डोक्यावरील पितृछत्र हिरावून घेतले अशा कर्जबाजारी शेतकरी कुटुंबांच्या मुला-मुलींना जीवनसाथी मिळण्याचा प्रश्न ऐरणीवर आला; मात्र धर्मदाय आयुक्त कार्यालयाच्या संकल्पनेतून समाजातील विविध देवस्थानांसह दानशूरांचे हात पुढे आल्याने जिल्ह्यातील पाच-दहा नव्हे तर तब्बल ९६ जोडप्यांच्या रेशीमगाठी पारंपरिक पद्धतीने समारंभपूर्वक रविवारी (दि.१३) जुळून आल्या.राज्याचे धर्मदाय आयुक्त शिवकुमार डिगे यांच्या संकल्पनेनुसार आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब, कर्जबाजारी शेतकरी कुटुंबांमधील वय झालेल्या मुला-मुलींचा सामुदायिक विवाह सोहळा राज्यभरात आयोजित केला जात आहे. याअंतर्गत जिल्ह्यातील अशा कुटुंबातील मुला-मुलींचा विवाह शहरातील गंगापूररोडवरील चोपडा लॉन्समध्ये उत्साहात पार पडला. शेतीमधील पिकाला हमीभाव मिळाला नाही किंवा आस्मानी संकटामुळे पीक हाताशी आले नाही त्यामुळे कर्जाचा डोंगर डोक्यावर झाला आणि नाइलाजाने राज्यभरात अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला.

त्यामुळे अशा आत्महत्याग्रस्त कुटुंबातील तरुण मुला-मुलींच्या लग्नाची समस्या उभी राहिली. या समस्येवर मात करण्यासाठी धर्मदाय आयुक्तांनी राज्यभरात सहायक धर्मदाय आयुक्त कार्यालयाच्या नियंत्रणात जिल्ह्यातील मोठी देवस्थान विश्वस्त संस्था, दानशूर व्यक्तींना एकत्र आणून त्यांच्यामार्फत स्वतंत्ररीत्या न्यासांतर्गत समितीचे गठन करून सामुदायिक विवाह सोहळा राबविण्याची संकल्पना पुढे आणली. या संकल्पनेला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शहरात जिल्हास्तरीय सामुदायिक विवाह सोहळ्यात ९६ जोडपे विवाहबद्ध झाल्याने सुमारे १९२ कुटुंबांची चिंता दूर झाली. प्रत्येक कुटुंबाच्या व-हाडींसाठी भोजनाच्या अद्ययावत व्यवस्थेसह नवजोडप्यांना संसारोपयोगी आवश्यक भेटवस्तूदेखील सामुदायिक विवाह सोहळा समिती, नाशिकच्या वतीने देण्यात आल्या. नववधू-वरांना शुभेच्छा देण्यासाठी सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून खगोलशास्त्रज्ञ पद्मविभूषण जयंत नारळीकर, मंगला नारळीकर, जिल्हा व सत्र न्यायाधीश यू. एम. नंदेश्वर, गणेश देशमुख, एम. एस. बोधणकर, एस. पी. पांडे, आमदार सीमा हिरे, मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार, विभागीय धर्मदाय सहआयुक्त प्रदीप घुगे उपस्थित होते. पाहुण्यांचे स्वागत सहायक धर्मदाय आयुक्त वैशाली पंडित, दीप्ती कोळपकर, के. एम. सोनवणे यांनी केले.

नाशिक विभागात २१७ जोडपे विवाहबद्धराज्यभरात अद्याप ३ हजार ४६ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा अशा पद्धतीने राबविला गेला. नाशिक विभागात जळगावमध्ये ४०, धुळ्यात ५५ तर नंदुरबारमध्ये २६ जोडपे सामुदायिकरीत्या विवाहबद्ध झाले. यंदाचे पहिले वर्ष आहे. यापुढे ही संकल्पना धोरणात्मक निर्णयामध्ये रूपांतरित करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार असल्याचे धर्मदाय सहआयुक्त प्रदीप घुगे यांनी सांगितले.

टॅग्स :marriageलग्नNashikनाशिकHinduismहिंदुइझमfarmer suicideशेतकरी आत्महत्या