शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

त्या रुग्णालयांच्या कारभाराच्या चौकशीसाठी समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 00:58 IST

रक्त तपासणी अहवालात डेंग्यूसदृश आजाराची लागण झाल्याचे रुग्णांना खोटे सांगून रुग्णांची फसवणूक केल्याच्या आरोपानंतर महापालिकेच्या वतीने डॉ. जयराम कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती स्थापन केली असून एकूण तीन रुग्णालयांना भेटी देऊन ही समिती अहवाल तपासणी करणार आहे. शिवाय, आरोप असलेल्या लॅबचीदेखील तपासणी करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देलॅबची तपासणी होणार : दोषी आढळल्यास कारवाई

नाशिक : रक्त तपासणी अहवालात डेंग्यूसदृश आजाराची लागण झाल्याचे रुग्णांना खोटे सांगून रुग्णांची फसवणूक केल्याच्या आरोपानंतर महापालिकेच्या वतीने डॉ. जयराम कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती स्थापन केली असून एकूण तीन रुग्णालयांना भेटी देऊन ही समिती अहवाल तपासणी करणार आहे. शिवाय, आरोप असलेल्या लॅबचीदेखील तपासणी करण्यात येणार आहे.सध्या नाशिकमध्ये डेंग्यू आणि स्वाइन फ्लूचे थैमान सुरू असून, त्यात काही रुग्णालयात डेंग्यू आणि स्वाइन फ्लू झाल्याचे सांगून उपचार करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे. पंचवटीतील दिंडोरीरोडवरील एक रुग्णालयात थंडी तापाने दाखल एक रुग्णाच्या बाबतीत असाच प्रकार घडला होता. सदर रुग्णाची रक्त तपासणी केली असता त्याला डेंग्यू झाल्याचा दावा उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी केल्याने भयभीत झालेल्या रुग्णांनी अन्य दुसºया एका लॅबमध्ये रक्त तपासणी केली होती त्यात डेंग्यू नसल्याचे स्पष्ट झाल्याने संबंधित रुग्णाने मनपाकडे तक्र ार केली होती. या प्रकारानंतर डॉ. जयराम कोठारी यांनी सदर रुग्णालयास भेट दिली होती. अशाच प्रकारे आणखी दोन रुग्णालयांविषयीदेखील तक्रारी आहेत. यासंदर्भात महापालिकेचे प्रभारी आरोग्यवैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल गायकवाड यांनी डॉ. जयराम कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली असून, ही समिती तिन्ही रुग्णालयांची तपासणी करणार आहेत. त्याचप्रमाणे दोन लॅबचीदेखील तपासणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.अनेक तक्रारीरुग्णालयांच्या बाबतीत महापालिकेकडे एकच लेखी तक्रार आली असली तरी तोंडी अनेक रुग्णालयाबाबत तक्रारी आल्या आहेत. लेखी तक्रारी आलेल्या रुग्णालयांबाबत चौकशी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतल्याचे वृत्त आहे.

टॅग्स :Healthआरोग्यMedicalवैद्यकीय