शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
2
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
3
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
4
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
5
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
6
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
7
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
8
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
9
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
10
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
11
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
12
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
13
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
14
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
15
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
16
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
17
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
18
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
19
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
20
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात

निसर्गाशी बांधिलकी हीच अहिंसा - राष्ट्रपती कोविंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 4:45 AM

माणूस गरजांसाठी निसर्गाशी छेडछाड करत आहे. साधन संपत्तीचा अंदाधुंद उपभोग घेतला जात आहे. त्यामुळे प्रदूषणात वाढ होत आहे.

ऋषभदेवपूरम, मांगीतुंगी (जि. नाशिक ) : माणूस गरजांसाठी निसर्गाशी छेडछाड करत आहे. साधन संपत्तीचा अंदाधुंद उपभोग घेतला जात आहे. त्यामुळे प्रदूषणात वाढ होत आहे. या अनिष्ठ परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी केवळ माणूस आणि प्राण्यांशीच नव्हे तर निसर्गाशीही सम्यक व्यवहार करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी भगवान ऋषभदेव १०८ फूट मूर्तिनिर्माण कमिटीच्या वतीने आयोजित विश्वशांती अहिंसा संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी केले.अध्यक्षस्थानी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे होते. राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रपतींच्या पत्नी सविता कोविंद यांच्यासह पीठाधीश रवींद्रकीर्ती स्वामी, वाशिमचे आमदार राजन पाटणी आदी उपस्थित होते.राष्ट्रपती जैन परंपरेबद्दल म्हणाले, सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक आचरण ही तीन रत्ने जैन परंपरेत आहेत. तीर्थंकरांनी धर्माला पूजा-पाठ यातून बाहेर काढत त्याला व्यवहार आणि आचरणात आणण्याचा मार्ग दाखवला. गणिनीप्रमुख श्री ज्ञानमती माताजी यांनी आशीर्वचन देताना सांगितले, जेथे अहिंसा तेथे समृद्धी असते. साऱ्या विश्वाचे कल्याण व्हावे, ही भावना तीर्थंकरांची होती. तोच संदेश घेऊन देश पुढे जाईल.>आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदानमुरादाबाद येथील तीर्थंकर महावीर विश्वविद्यालयास भगवान ऋषभदेव इंटरनॅशनल अवॉर्ड प्रदान करण्यात आला. कुलाधिपती सुरेश जैन यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला. ११ लाख रुपये रोख, मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. दर सहा वर्षांनी हा पुरस्कार दिला जाईल.भगवान ऋषभदेव यांच्या १०८ फुटी मूर्तीचे निर्माण कार्य २०१६ मध्ये पूर्ण झाले. त्याची माहिती देणाºया ‘सर्वोच्च दिगंबर जैन प्रतिमा’ ग्रंथाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन झाले.

टॅग्स :Ramnath Kovindरामनाथ कोविंद