शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जागतिकीकरणामुळे शिक्षणाचे व्यावसायिकीकरण : जोंधळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 00:21 IST

शिक्षणाच्या बाजारीकरणामुळे विद्यार्थ्यांना केवळ आवश्यक शिक्षण दिले जात असून, समाजाचा विचार करणारी पिढी निर्माण होण्याची प्रक्रिया थांबली आहे़ आपल्याला सामाजिक व दूरगामी विचार करणारी पिढी निर्माण करावयाची असेल तर चिकित्सक व विश्लेषणात्मक शिक्षण देणाऱ्या संस्था व शाळांची नितांत आवश्यकता असल्याचे प्रतिपादन मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा़ डॉ. सुरेंद्र जोंधळे यांनी केले़

नाशिक : शिक्षणाच्या बाजारीकरणामुळे विद्यार्थ्यांना केवळ आवश्यक शिक्षण दिले जात असून, समाजाचा विचार करणारी पिढी निर्माण होण्याची प्रक्रिया थांबली आहे़ आपल्याला सामाजिक व दूरगामी विचार करणारी पिढी निर्माण करावयाची असेल तर चिकित्सक व विश्लेषणात्मक शिक्षण देणाऱ्या संस्था व शाळांची नितांत आवश्यकता असल्याचे प्रतिपादन मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा़ डॉ. सुरेंद्र जोंधळे यांनी केले़ महात्मा जोतिबा फुले यांच्या १२७ व्या स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेतर्फे गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात आयोजित ‘शिक्षणाचे आजचे वर्तमान’ या विषयावर ते बोलत होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते जिल्ह्यातील १७ गुणवंत शिक्षकांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला़जोंधळे पुढे म्हणाले की, देशातील शिक्षणपद्धतीत आमूलाग्र बदल झाले असून शिक्षणाचे अक्षरश: बाजारीकरण झाले आहे़ विद्यार्थ्यांना केवळ आवश्यक शिक्षण दिले जात असल्याने ज्ञानाला फारसे महत्त्व राहिलेले नसून समाजहिताचा विचार करणाºया पिढीची निर्मितीच बंद झाली आहे़ स्वतंत्र विचाराची बुद्धिवंत पिढीच घडत नसल्याने प्रश्न न विचारणारी सध्याची पिढी तयार होत असून ही समाजासाठी घातक बाब आहे़ विशेष म्हणजे शासनाकडून शिक्षणाच्या निधीत कपात केली जात असल्याने शिक्षण खर्चिक होत चालले असून, विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची दरी वाढत चालली  आहे़  या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सिनेअभिनेते पंढरीनाथ कांबळे (पॅडी) व शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनीही आपले मनोगत व्यक्त केले़  यावेळी जिल्ह्यातील १७ गुणवंत शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला़ यावेळी कवी व साहित्यिक अविनाश जुमडे यांच्या ‘आघात’ या चारोळी संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी गटशिक्षणाधिकारी सरोज जगताप, समता शिक्षक परिषद समन्वयक चंद्रकांत गायकवाड, नवनाथ  आढाव, विजय जगताप, कळवण तहसीलदार कैलास चावडे, संस्थापक डी. के. आहिरे, जिल्हाध्यक्ष  उत्तम केदारे, सरचिटणीस संजय पगारे, प्रा. गंगाधर अहिरे, सुनील ढाकणे, मनपा शिक्षणाधिकारी उदय देवरे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या शिक्षकांचा सत्कारशीतल बावणे (कोकणगाव, ता़ निफाड), चंद्रमोहन रामटेके (बोरीचा पाडा, ता़ इगतपुरी), वंदना ओगले (महापालिका शाळा, ता़ नाशिक), संदीप ससाणे (वैष्णवनगर, ता़ नाशिक), नौशाद मन्सुरी (परमोरी, ता़ दिंडोरी), भगवान तवर (वायकंडेवाडी, ता़ चांदवड), अनिल अहिरे (गणोरे, ता़ कळवण), सुनीता बर्वे (घोडेवाडी, ता़ सिन्नर), श्रावण ठाकरे (सोमठाणदेश, ता़ येवला), चंद्रमणी बोबडे (गावठाण, ता़ त्र्यंबकेश्वर), संजीव पवार (पोखरी, ता़ नांदगाव), सुलोचना जाधव (पाटणे, ता़ मालेगाव), शिरीष पवार (खामखेडा, ता़ देवळा), रवींद्र चौरे (तुपविहिरपाडा, ता़ सटाणा), रमेश धिवरे (आंबापाणी, ता़ पेठ), नारायण महाले (चापावाडी, ता़ सुरगाणा), विशेष पुरस्कार : रुमा पवार, संचालक, बुद्धिस्ट स्कूल, आडगाव)

टॅग्स :Nashikनाशिक