शहरं
Join us  
Trending Stories
1
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
2
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
3
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
4
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
5
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
6
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
7
ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
8
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
9
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष
10
Decision Making: निर्णय घेताना द्विधा मनःस्थिती होते? सद्गुरु सांगतात, 'या' पाच मार्गाने घ्या मनाचा कौल!
11
कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले...
12
Delhi Red Fort Blast : अल फलाह विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत आरडीएक्स तयार केले होते? ८०० पोलिस आणि एनआयए तपास करणार
13
बाजारात 'रिकव्हरी'चा वेग! महिंद्रा-अदाणी कंपनीचे शेअर्स सुस्साट! टाटा-बजाज आपटले
14
दिल्ली स्फोट: दुसऱ्या दिवशी सकाळी झाडावर लटकलेला मृतदेह सापडला; मृतांचा आकडा १० वर...
15
"मी २०३० मध्ये IAS होऊनच...", कुटुंबाचा लग्नासाठी दबाव, ९२% मिळालेल्या टॉपरने सोडलं घर
16
सुझलॉन एनर्जीचे शेअर्स ३०% घसरले! गुंतवणूकदारांनी काय करावं? ब्रोकरेज फर्मने दिलं रेटींग
17
Delhi Red Fort Blast : दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र आणि दिनेश कनेक्शन; कोण आहेत 'ही' दोन नावं?
18
"बाय बाय मुंबई, मी लवकरच...", प्राजक्ता माळी अचानक चालली तरी कुठे?, चाहते पडले चिंतेत
19
अमेरिकेतून भारतासाठी आली आनंदाची बातमी! 'या' कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
20
कालभैरव जयंती २०२५: कालभैरवाच्या कृपेने 'या' ८ राशींच्या आयुष्यात घडणार अविस्मरणीय घटना!

गावठाण विकासाचे क्लस्टर लालफितीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 00:54 IST

गावठाण विकासाचा प्रश्न सोडविण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून पुनर्विकासाचा विषय प्रलंबित आहे. पहिल्या पंचवार्षिकपासून रखडलेला हा विकास करण्यासाठी सिंगापूरपासून आता स्मार्ट सिटीपर्यंत करण्यापर्यंत अनेक योजना आल्या आणि गेल्या, परंतु साध्या गावठाण क्षेत्राचे चटई क्षेत्र अर्ध्या टक्क्यानेही वाढले नाही.

नाशिक : गावठाण विकासाचा प्रश्न सोडविण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून पुनर्विकासाचा विषय प्रलंबित आहे. पहिल्या पंचवार्षिकपासून रखडलेला हा विकास करण्यासाठी सिंगापूरपासून आता स्मार्ट सिटीपर्यंत करण्यापर्यंत अनेक योजना आल्या आणि गेल्या, परंतु साध्या गावठाण क्षेत्राचे चटई क्षेत्र अर्ध्या टक्क्यानेही वाढले नाही. आताही मुंबई आणि ठाण्याच्या धर्तीवर क्लस्टर पद्धतीने विकास करण्याचे धोरण आखण्यात आले आहे. परंतु हा विषयदेखील लालफितीत असल्याने गावठाणातील धोकादायक वाड्यांचा प्रश्न सुटूच शकत नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे.  भूतपूर्व नाशिक, सातपूर तसेच नाशिकरोड, देवळाली या तीन नगरपालिका एकत्र येऊन नाशिक महानगरपालिका झाली असून, त्यात २३ खेड्यांचा समावेश असल्याने त्यात गावठाण क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. परिसर विकसित होत असला तरी गावठाणातील जुन्या मिळकती त्याचप्रमाणे तेथील अरुंद रस्ते, उंच सखल भाग या सर्व समस्या नागरिकांना भेडसावीत असतात. एखादी दुर्घटना घडली तर अग्निशामक दलाचे विमोचक वाहनही त्या ठिकाणी जाऊ शकत नाही, अशी स्थिती असून रुग्णवाहिका तर दूरच राहिली. जुन्या गावठाणात टीडीआर किंवा हस्तांतरणीय विकास हक्क वापरता येत नाही. अन्य भागापेक्षा दाट वस्तीचा भाग म्हणून समस्या वेगळ्या असतात. परिणामी त्याचा विकास करता येत नाही, अशी स्थिती असल्याने या वाड्यांचा पुनर्विकास करणे हा मार्ग मानला जातो.  गेल्या अनेक वर्षांपासून गावठाण भागातील वाड्यांसाठी चटई क्षेत्र वाढवून देण्याची मागणी होत आहे. सध्या नाशिकमध्ये अन्य भागात चटई क्षेत्र एकास एक इतके आहे तर गावठाणात ते दोन आहे. हेच चटई क्षेत्र वाढवून तीन करावे, अशी मागणी असून त्यासाठी अनेकदा राजकीय आश्वासने देऊनही निर्णय मात्र झालेला नाही. विद्यमान सरकारकडे नाशिक शहरासाठी एसआरए म्हणजे झोपडपट्टी पुनर्विकास तसेच गावठाण पुनर्विकासासाठी गावठाणास ज्यादा चटई क्षेत्र देण्याची मागणी आहे. मात्र, त्यावर निर्णय झालेला नाही. गेल्याच महिन्यात मध्य नाशिकच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी विधिमंडळात या विषयाबाबत प्रश्न विचारला होता. मात्र त्यासाठी राज्य शासनाने नाशिक महापालिका आयुक्तांकडून माहिती मागवण्यात आली आहे. विशेषत: समजा वाढीव चटई क्षेत्र वाढविलेच तर त्याचा लोकसंख्या घनतेवर किती घनता आणि आघात होतात, त्याचा अहवाल मागविण्यात आला असून, त्यानंतर तो दिल्यानंतर शासन त्यावर निर्णय घेणार आहे....तरीही उपेक्षाचनाशिकचे होणार होते सिंगापूर महापालिकेत लोकप्रतिनिधींची राजवट आल्यानंतर ज्यावेळी १९९५ मध्ये प्रकाश मते हे महापौर झाले त्यावेळी त्यांनी नाशिकचे सिंगापूर करण्याची घोषणा केली होती. त्यावेळी जुन्या नाशिकचा गावठाण विकास हाच उद्देश होता. काही वास्तुशास्त्रज्ञाच्या मदतीने त्यांनी गावठाणच्या जागी टोलेजंग इमारती बांधण्याचे संकल्पना चित्र तयार केले होते.त्यानंतर ही केवळ चर्चाच राहिली महापालिकेच्या वतीने पंचवटीतील एरंडवाडी येथे डॉ. आंबेडकर वाल्मीकी घरकुल योजनेअंतर्गत झोपडपट्टीवासीयांना घरे देण्यात आली. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याकडे पुन्हा गावठाण विकासाची मागणी करण्यात आली होती. त्यावेळी चार चटई क्षेत्र देण्याची मागणी करण्यात आली होती. देशमुख यांनी ती मान्य करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप ही योजना कागदावरच आहे.आता क्लस्टर लालफितीत नाशिक महापालिकेचा विकास आराखडा तयार करण्यात आला खरा; परंतु त्यासाठी तो सध्याच्या भाजपाच्या कारकिर्दीत भागश: मंजूर झाला आहे. मूळ आराखड्यात चटई क्षेत्र वाढवून देण्याचा प्रस्ताव आहे. परंतु क्लस्टर पध्दतीने त्याचा विकास करायचा आहे. त्यासाठी राज्य शासन आता राज्यस्तरावर धोरण ठरविण्यात येणार आहे. आघात अहवाल मागावून व्यवहार्यता पडताळणी केली जाणार आहे. परंतु राज्यातील भाजपा सरकारची पाच वर्षे संपत आली, परंतु त्यालाही मुहूर्त लागलेला नाही.नवनिर्माणही रखडले महापालिकेत महाराष्टÑ नवनिर्माण सेनेची सत्ता असताना शहर विकास आराखडा तयार करण्यात आला. अनेक चुकी आणि त्रुटींमुळे आराखडा फेटाळण्यात आल्यानंतर पुन्हा नवीन विकास आराखडा करताना गावठाण विकासासाठी जादा चटई क्षेत्राची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार ती मान्य करण्यात आली, परंतु आराखडाच मंजूर झाला नाही.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक