शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
3
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
4
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
5
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
6
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
7
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश
8
Navratri 2025: अष्टमी-नवमीला 'या' दिशेला दिवा लावा; अखंड दिवा लावण्याचे लाभ मिळतील 
9
सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, १० ग्रॅम सोन्याची किंमत किती? चांदी महागली
10
IND vs WI: सर्फराज खानला विंडिजविरूद्ध कसोटी संघात का घेतलं नाही? अखेर BCCI ने दिलं उत्तर
11
'लडाखमध्ये जे घडत आहे ते चिंताजनक, प्रत्येक देशभक्ताने लोकांना पाठिंबा दिला पाहिजे'; अरविंद केजरीवाल यांनी स्पष्टच सांगितले
12
"पुन्हा NDA चे सरकार आल्यास नीतीश कुमार नव्हे तर...!"; ओवेसींनी सांगितलं, कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री?
13
नवरात्र २०२५: ललिता सहस्रनामाचे नियमित करा पठण, देवी सदैव करेल पाठराखण; अपार लाभ-समृद्धी! 
14
ट्रम्पनी H-1B फीवरून ब्लॅकमेल केले, अमेरिकी कंपनीने भारतातच १२,००० नोकऱ्यांची घोषणा केली...
15
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
16
पुढच्या वर्षी ९४,००० पर्यंत जाणार Sensex; HSBC नं दृष्टीकोन बदलला, भारताचं रेटिंगही वाढवलं
17
'शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?'; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
18
बुद्धिबळाची 'राणी'! वडिलांची साथ, लेकीने रचला इतिहास; बिहारची पहिली महिला FIDE मास्टर
19
Tiger Attack: समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
20
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...

ढगाळ हवामानामुळे द्राक्षपंढरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 21:15 IST

पिंपळगाव बसवंत : परतीच्या पावसामुळे यंदाचे हंगामच हातातून गेल्यामुळे पिंपळगाव बसवंत येथील द्राक्ष उत्पादक शेतकर्याने संपूर्ण बागेवर कुर्हाड चालविली आहे.

ठळक मुद्देपिंपळगाव बसवंत : घड जिरल्याने द्राक्षबागा जमीनदोस्त

पिंपळगाव बसवंत : परतीच्या पावसामुळे यंदाचे हंगामच हातातून गेल्यामुळे पिंपळगाव बसवंत येथील द्राक्ष उत्पादक शेतकर्याने संपूर्ण बागेवर कुर्हाड चालविली आहे.गेल्या चार पाच दिवसापासून कधी थंडी कधी ऊन तर कधी ढगाळ रोगट हवामान असल्याने निफाड तालुक्यातील द्राक्षबागांवर डावण्या सारख्या रोगाचा प्रार्दुभाव दिसू लागला असून घड जिरण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी द्राक्षबागांवर कुºहाड मारण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. पिंपळगाव बसवंत परिसरातील शेतकरी सागर शिंदे यांनी एक एकर द्राक्ष बागेवर कुºहाड मारत द्राक्ष बाग जमीनदोस्त केली आहे.दुसºया टप्यातील छाटणीच्या द्राक्षबागा तयार झाल्या आहेत. त्यामुळे अश्या वातावरणात किंचितही बेमोसमी पाऊस झाला तर डावण्या, भुरी व पोग्यात असलेले घड जिरण्याची चिंता निर्माण झाली आहे दुपारी आर्द्रता व सकाळी धुके तर पावसाची रिप रिप अशा स्थितीमध्ये डावणी रोगाने धुमाकुळ घालायला सुरवात केली आहे.निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत, आहेरगाव, मुखेड, बेहड, कारसूळ, लोनवाडी, दावचवाडी, अंतरवेली, पाचोरे, शिरवाडे वणी, उंबरखेड, नारायण टेंभी, पालखेड, रानवड, कसबे सुकेना, साकोरे, कोकणगाव या गावामध्ये मोठ्या प्रमाणात द्राक्षबागांची लागवड झालेली आहे. सध्याच्या स्थितीत पोग्यात असलेल्या बागामध्ये मोठ्या प्रमाणात घड जिरण्याचे प्रमाण व डावणीच्या रोगाचा देखील प्रादुर्भाव दिसू लागला आहे. दररोजचे ढगाळ वातावरण व त्यात बेमोसमी पडणारा पाऊस त्यात सकाळी पडणारे दव यामुळे फवारणी करूनही दुसºया दिवशी रोग तसाच दिसतो.आमच्या भागात झालेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागेचे नुकसान झाले. हे नुकसान कधीही न भरून येणारे आहे. झालेल्या नुकसानाला कंटाळून द्राक्ष बागेवर कुºहाड चालवावी लागली. परिणामी आतापर्यंत बागेवर केलेला लाखो रु पयांचा खर्च पाण्यात गेला आहे.- सागर शिंदे, द्राक्ष उत्पादक शेतकरी, पिंपळगाव बसवंत.बेमोसमी पावसामुळे द्राक्ष घड जिरण्याचे प्रमाण वाढले असल्याने द्राक्ष बागावर खर्च केलेले लाखो रु पये पाण्यात गेले आहे. प्रचंड नुकसान होऊन तालुक्यात मोठ्या प्रमाणात द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात सापडला असल्याने प्रशासनाने पंचनामे करून शेतकºयांना दिलासा देणे गरजेचे आह.े- उद्धराजे शिंदे, द्राक्ष उत्पादक शेतकरी, पिंपळगाव बसवंत. 

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी