शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra ZP Election 2026 Date: मोठी बातमी! राज्यातील १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा, ५ फेब्रुवारीला मतदान
2
‘...ती एक मनपा वगळता २९ पैकी २८ महानगरपालिका महायुती जिंकणार’, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा 
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, महापालिका निवडणुकीत नवा वाद; प्रचार संपला तरीही उमेदवारांना...
4
एका दिवसात १ लाख कोटींचा धुराळा! टाटांच्या 'या' कंपनीचा शेअर धडाम; संक्रांतीपूर्वीच गुंतवणूकदारांना 'धक्का'
5
T20 Word Cup: ४ परदेशी खेळाडूंना भारताचा व्हिसा नाकारला; 'पाकिस्तान कनेक्शन' पडले महागात
6
"...तर तेव्हा उपमुख्यमंत्री झाले नसते'; बसवलेला मुख्यमंत्री म्हणत राज ठाकरेंचा फडणवीसांवर निशाणा
7
'काँग्रेसचा वाण नाही, पण गुण लागला' राज ठाकरेंच्या सभेनंतर उदय सामंतांचा टोला!
8
दुपारी जेवणानंतर का येते झोप? सायंटिफीक कारण समजल्यावर तुम्हीही नक्कीच घ्याल 'पॉवर नॅप'
9
तुम्ही संभाजीनगरचे पालक, पण देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मालक; संजय केनेकर शिरसाटांवर संतापले
10
IND vs NZ: विराट-शिखरचा विक्रम धोक्यात! श्रेयस अय्यर वनडे क्रिकेटमध्ये रचणार 'असा' इतिहास
11
२०००% नं वधारला हा स्मॉलकॅप शेअर, ₹54 वर आलाय भाव; आता कंपनी ₹84 कोटींचे भांडवल उभारणार
12
तुमच्या कुटुंबाचे भविष्य करा सुरक्षित! वर्षाला फक्त २० रुपये भरा आणि मिळवा २ लाखांचे कवच
13
मतदानादिवशी ठाकरे बंधूंचे 'भगवा गार्ड' मैदानात उतरणार, दुबार, बोगस मतदारांना पकडणार आणि...
14
Rohit Sharmaची पत्नी रितिकाच्या हातातल्या महागड्या पर्सची रंगली चर्चा, किंमत ऐकून थक्क व्हाल
15
"हेडगेवारांना कारावास झाला होता, पण...", भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील RSS च्या भूमिकेवर ओवेसींनी उपस्थित केला सवाल
16
'या' विमान कंपनीची नवी ऑफर: प्रवाशांना मोठी भेट; मोठ्यांना १,४९९ रुपयांपासून तर मुलांना १ रुपयांत विमान प्रवास
17
Nashik Municipal Election 2026 : उद्धवसेनेची अस्तित्वासाठी लढाई; नावालाच आघाडी, मैत्री मनसेशीच
18
Bornhan: मकर संक्रांत ते रथसप्तमी: बाळाची पहिली संक्रांत? मग 'बोरन्हाण' घालताना 'या' गोष्टी ठेवा लक्षात!
19
Travel : एकटं फिरायचंय? टेन्शन सोडा! सोलो ट्रॅव्हलिंगसाठी 'ही' ५ ठिकाणे आहेत सर्वात बेस्ट
20
"हा साप मला चावलाय, माझ्यावर उपचार करा" सापाला खिशात घालून रिक्षा चालकानं गाठलं रुग्णालय
Daily Top 2Weekly Top 5

ढगाळ हवामानामुळे द्राक्षपंढरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 21:15 IST

पिंपळगाव बसवंत : परतीच्या पावसामुळे यंदाचे हंगामच हातातून गेल्यामुळे पिंपळगाव बसवंत येथील द्राक्ष उत्पादक शेतकर्याने संपूर्ण बागेवर कुर्हाड चालविली आहे.

ठळक मुद्देपिंपळगाव बसवंत : घड जिरल्याने द्राक्षबागा जमीनदोस्त

पिंपळगाव बसवंत : परतीच्या पावसामुळे यंदाचे हंगामच हातातून गेल्यामुळे पिंपळगाव बसवंत येथील द्राक्ष उत्पादक शेतकर्याने संपूर्ण बागेवर कुर्हाड चालविली आहे.गेल्या चार पाच दिवसापासून कधी थंडी कधी ऊन तर कधी ढगाळ रोगट हवामान असल्याने निफाड तालुक्यातील द्राक्षबागांवर डावण्या सारख्या रोगाचा प्रार्दुभाव दिसू लागला असून घड जिरण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी द्राक्षबागांवर कुºहाड मारण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. पिंपळगाव बसवंत परिसरातील शेतकरी सागर शिंदे यांनी एक एकर द्राक्ष बागेवर कुºहाड मारत द्राक्ष बाग जमीनदोस्त केली आहे.दुसºया टप्यातील छाटणीच्या द्राक्षबागा तयार झाल्या आहेत. त्यामुळे अश्या वातावरणात किंचितही बेमोसमी पाऊस झाला तर डावण्या, भुरी व पोग्यात असलेले घड जिरण्याची चिंता निर्माण झाली आहे दुपारी आर्द्रता व सकाळी धुके तर पावसाची रिप रिप अशा स्थितीमध्ये डावणी रोगाने धुमाकुळ घालायला सुरवात केली आहे.निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत, आहेरगाव, मुखेड, बेहड, कारसूळ, लोनवाडी, दावचवाडी, अंतरवेली, पाचोरे, शिरवाडे वणी, उंबरखेड, नारायण टेंभी, पालखेड, रानवड, कसबे सुकेना, साकोरे, कोकणगाव या गावामध्ये मोठ्या प्रमाणात द्राक्षबागांची लागवड झालेली आहे. सध्याच्या स्थितीत पोग्यात असलेल्या बागामध्ये मोठ्या प्रमाणात घड जिरण्याचे प्रमाण व डावणीच्या रोगाचा देखील प्रादुर्भाव दिसू लागला आहे. दररोजचे ढगाळ वातावरण व त्यात बेमोसमी पडणारा पाऊस त्यात सकाळी पडणारे दव यामुळे फवारणी करूनही दुसºया दिवशी रोग तसाच दिसतो.आमच्या भागात झालेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागेचे नुकसान झाले. हे नुकसान कधीही न भरून येणारे आहे. झालेल्या नुकसानाला कंटाळून द्राक्ष बागेवर कुºहाड चालवावी लागली. परिणामी आतापर्यंत बागेवर केलेला लाखो रु पयांचा खर्च पाण्यात गेला आहे.- सागर शिंदे, द्राक्ष उत्पादक शेतकरी, पिंपळगाव बसवंत.बेमोसमी पावसामुळे द्राक्ष घड जिरण्याचे प्रमाण वाढले असल्याने द्राक्ष बागावर खर्च केलेले लाखो रु पये पाण्यात गेले आहे. प्रचंड नुकसान होऊन तालुक्यात मोठ्या प्रमाणात द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात सापडला असल्याने प्रशासनाने पंचनामे करून शेतकºयांना दिलासा देणे गरजेचे आह.े- उद्धराजे शिंदे, द्राक्ष उत्पादक शेतकरी, पिंपळगाव बसवंत. 

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी