शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
14
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
15
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
16
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
17
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
18
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
19
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
20
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?

शेतकऱ्यांवर दु:खाचे आभाळ कोसळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 5:41 PM

पाटोदा : पिके ऐन काढणीला आली असतांनाच परिसरात सुरु असलेल्या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती निर्माण झाली आहे. गेल्या वीस बावीस दिवसांपासून या भागात कधी मध्यम ते कधी जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे शेती पिकांचे कोट्यवधी रु पयांचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देपाटोदा : ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

पाटोदा : पिके ऐन काढणीला आली असतांनाच परिसरात सुरु असलेल्या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती निर्माण झाली आहे. गेल्या वीस बावीस दिवसांपासून या भागात कधी मध्यम ते कधी जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे शेती पिकांचे कोट्यवधी रु पयांचे नुकसान झाले आहे.या वर्षी परिसरात समाधानकारक पाऊस पडल्याने पिके जोमात असतानांच गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने अक्षरक्ष: धुमाकूळ घातल्याने परीसरातील शेतात पाणी साचल्यामुळे शेतात उभी असलेली सर्व पिके सडून गेली आहे. शेतात कापणी केलेली बाजरीची कणसे व चारा सडून गेल्याने चाºयाचा प्रश्न गंभीर होणार आहे. तसेच मका बिट्यांना कोंब फुटले आहे. सोयाबीनचीही तीच गत झाली आहे. त्यामुळे शेतकरी आणि शेती संकटात सापडली आहे. ज्या कांदा पिकाच्या भरोशावर शेतकरी संपूर्ण आर्थिक गणित मांडत असतो, शेतातील कांदा तसेच कांदा रोपेही सडल्याने शेतकरी वर्गावर संकटाचे आभाळ कोसळले आहे. पावसाने या भागातील द्राक्ष बागाही धोक्यात आल्या आहे. शासनाने सर्वच पिकांना नुकसान भरपाई देऊन मदत करावी अशी मागणी येथील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.पाटोदा, ठाणगाव, कानडी, पिंपरी व परिसरात गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरु आहे. दहा बारा दिवसांपूर्वी पावसाने एक दोन दिवस विश्रांती घेतल्याने शेतात असलेली बाजरीची कापणी करून चारा व कणसे गोळा करून ठेवली मात्र त्यानंतर पावसाने दररोज हजेरी लावल्याने कणसे पूर्णपणे पाण्यात भिजली आहे. केलेला हजारो रु पयांचा खर्च वाया गेला आहे. तसेच चाराही सडून गेल्याने जनावरांच्या चाºयाचा प्रश्न गंभीर होणार आहे. तसेच मका शेतात आडवी पडली असून त्यात मोठया प्रमाणात पाणी साचले आहे. 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती