शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

बंद कारखाने, नवीन गुंतवणूक, कांदा निर्यातबंदीचीच चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 01:33 IST

विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार शिगेला पोहोचला असला तरी संपूर्ण प्रचारात युतीकडून जम्मू आणि काश्मीर, ३७० कलम रद्द करणे, तिहेरी तलाक हेच मुद्दे चर्चेत आले तर विरोधकांनी मात्र जनतेच्या प्रश्नांना हात घालत नाशिकमधील कारखाने बंद पडत आहेत, नवीन गुंतवणूक नाही आणि कांदा निर्यातबंदीबरोबरच शेतकऱ्यांच्या आत्महत्या हेच चर्चेत मुद्दे उपस्थित करून कोंडी करण्यात आली.

ठळक मुद्देप्रचारातील मुद्दे : युतीकडून मात्र सरकारी योजना, ३७० कलमावरच भर

नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार शिगेला पोहोचला असला तरी संपूर्ण प्रचारात युतीकडून जम्मू आणि काश्मीर, ३७० कलम रद्द करणे, तिहेरी तलाक हेच मुद्दे चर्चेत आले तर विरोधकांनी मात्र जनतेच्या प्रश्नांना हात घालत नाशिकमधील कारखाने बंद पडत आहेत, नवीन गुंतवणूक नाही आणि कांदा निर्यातबंदीबरोबरच शेतकऱ्यांच्या आत्महत्या हेच चर्चेत मुद्दे उपस्थित करून कोंडी करण्यात आली.निवडणुका म्हटल्या की, जनसामन्यांचे प्रश्न चर्चेत येतात. प्रचाराच्या माध्यमातून त्यावर मंथन होत असते. जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना हात घातला जातो. यंदा प्रचारात विरोधी पक्षांनी याच मुद्द्यांना हात घातला. नाशिकमध्ये औद्योगिक क्षेत्रात गेल्या पाच वर्षांत एकही नवीन प्रकल्प आला नाही. मेक इन इंडिया, मेक इन नाशिक अशा अनेक घोेषणा झाल्या; परंतु उपयोग झाला नाही, उलट आर्थिक मंदीमुळे नाशिकचे अर्थकारण चालविणाºया बॉश, महिंद्रा आणि अन्य कारखान्यांवर संकट आले असून, त्यामुळे कामगार कपातीचे संकट घोंगावत आहे. त्याच मर्मावर विरोधकांनी बोट ठेवले. यााशिवाय शहरातील गावठाण क्लस्टर, पूररेषा रखडल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. त्यावरदेखील चर्चा अधिक झाली.ग्रामीण भागात सर्वाधिक मुद्दा कांदा निर्यातबंदीचाच चर्चेत ठरला. निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. ग्रामीण भागातील रोष बघता मुख्यमंत्र्यांनी प्रथमच ग्रामीण भागात दौरा करून निवडणुका झाल्या की, तत्काळ कांदा निर्यातबंदी हटविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे विनंती करू, असे सांगून रोष शमविण्याचा प्रयत्न केला; मात्र अखेरपर्यंत हा मुद्दा विरोधकांच्या अजेंड्यावर होता. कळवण, चांदवड, देवळा या भागात नार-पारचे पाणीदेखील चर्चेत होते तर आदिवासींच्या आरक्षणाचा मुद्दादेखील चर्चेत असल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्याबाबतदेखील रोष कमी करण्याचा प्रयत्न केला.विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांमुळे मात्र सरकार पक्षाची दमछाक झाली. त्यांनी त्यावर उत्तर देण्याचा प्रयत्न केला; परंतु सत्तारूढ पक्षाच्या वतीने मात्र त्या तुलनेत सरकारी योजनांचा लेखाजोखा मांडण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यापेक्षा त्यांचा भर ३७० कलम, पाकिस्तानला धडा शिकविला, तिहेरी तलाक या मुद्द्यांवरच अधिक होता.दत्तक नाशिकवरून कोंडीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिक ा निवडणुकीच्या वेळी नाशिक दत्तक घेतल्याचे जाहीर केले होते; मात्र त्यानंतर कोणतीही नवीन गुंतवणूक आली नाही. अनेक कारखाने बंद पडले हा मुद्दा विरोधकांनी पुढे केला असल्याने त्याची बरीच चर्चा झाली. नाशिक पश्चिम मतदारसंघात हा मुद्दा चर्चिला गेला; मात्र भाजपने माकपाच्या युनियनवर त्याबाबत ठपका ठेवून त्यामुळेच नवीन कारखाने आले नसल्याचे सांगून सोडवणूक करण्याचा प्रयत्न केला. त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभ हा अवघा एक किलोमीटरचा रस्ता, परंतु दोन वर्षांपासून तो रखडला असल्याने तोदेखील चर्चिला गेला.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019onionकांदाElectionनिवडणूक