शहरं
Join us  
Trending Stories
1
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
2
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
3
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
4
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
5
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
6
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
7
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
8
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
9
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
10
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
11
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
12
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
13
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
14
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
15
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
16
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
17
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
18
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
19
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
20
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल

बंद कारखाने, नवीन गुंतवणूक, कांदा निर्यातबंदीचीच चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 01:33 IST

विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार शिगेला पोहोचला असला तरी संपूर्ण प्रचारात युतीकडून जम्मू आणि काश्मीर, ३७० कलम रद्द करणे, तिहेरी तलाक हेच मुद्दे चर्चेत आले तर विरोधकांनी मात्र जनतेच्या प्रश्नांना हात घालत नाशिकमधील कारखाने बंद पडत आहेत, नवीन गुंतवणूक नाही आणि कांदा निर्यातबंदीबरोबरच शेतकऱ्यांच्या आत्महत्या हेच चर्चेत मुद्दे उपस्थित करून कोंडी करण्यात आली.

ठळक मुद्देप्रचारातील मुद्दे : युतीकडून मात्र सरकारी योजना, ३७० कलमावरच भर

नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार शिगेला पोहोचला असला तरी संपूर्ण प्रचारात युतीकडून जम्मू आणि काश्मीर, ३७० कलम रद्द करणे, तिहेरी तलाक हेच मुद्दे चर्चेत आले तर विरोधकांनी मात्र जनतेच्या प्रश्नांना हात घालत नाशिकमधील कारखाने बंद पडत आहेत, नवीन गुंतवणूक नाही आणि कांदा निर्यातबंदीबरोबरच शेतकऱ्यांच्या आत्महत्या हेच चर्चेत मुद्दे उपस्थित करून कोंडी करण्यात आली.निवडणुका म्हटल्या की, जनसामन्यांचे प्रश्न चर्चेत येतात. प्रचाराच्या माध्यमातून त्यावर मंथन होत असते. जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना हात घातला जातो. यंदा प्रचारात विरोधी पक्षांनी याच मुद्द्यांना हात घातला. नाशिकमध्ये औद्योगिक क्षेत्रात गेल्या पाच वर्षांत एकही नवीन प्रकल्प आला नाही. मेक इन इंडिया, मेक इन नाशिक अशा अनेक घोेषणा झाल्या; परंतु उपयोग झाला नाही, उलट आर्थिक मंदीमुळे नाशिकचे अर्थकारण चालविणाºया बॉश, महिंद्रा आणि अन्य कारखान्यांवर संकट आले असून, त्यामुळे कामगार कपातीचे संकट घोंगावत आहे. त्याच मर्मावर विरोधकांनी बोट ठेवले. यााशिवाय शहरातील गावठाण क्लस्टर, पूररेषा रखडल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. त्यावरदेखील चर्चा अधिक झाली.ग्रामीण भागात सर्वाधिक मुद्दा कांदा निर्यातबंदीचाच चर्चेत ठरला. निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. ग्रामीण भागातील रोष बघता मुख्यमंत्र्यांनी प्रथमच ग्रामीण भागात दौरा करून निवडणुका झाल्या की, तत्काळ कांदा निर्यातबंदी हटविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे विनंती करू, असे सांगून रोष शमविण्याचा प्रयत्न केला; मात्र अखेरपर्यंत हा मुद्दा विरोधकांच्या अजेंड्यावर होता. कळवण, चांदवड, देवळा या भागात नार-पारचे पाणीदेखील चर्चेत होते तर आदिवासींच्या आरक्षणाचा मुद्दादेखील चर्चेत असल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्याबाबतदेखील रोष कमी करण्याचा प्रयत्न केला.विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांमुळे मात्र सरकार पक्षाची दमछाक झाली. त्यांनी त्यावर उत्तर देण्याचा प्रयत्न केला; परंतु सत्तारूढ पक्षाच्या वतीने मात्र त्या तुलनेत सरकारी योजनांचा लेखाजोखा मांडण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यापेक्षा त्यांचा भर ३७० कलम, पाकिस्तानला धडा शिकविला, तिहेरी तलाक या मुद्द्यांवरच अधिक होता.दत्तक नाशिकवरून कोंडीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिक ा निवडणुकीच्या वेळी नाशिक दत्तक घेतल्याचे जाहीर केले होते; मात्र त्यानंतर कोणतीही नवीन गुंतवणूक आली नाही. अनेक कारखाने बंद पडले हा मुद्दा विरोधकांनी पुढे केला असल्याने त्याची बरीच चर्चा झाली. नाशिक पश्चिम मतदारसंघात हा मुद्दा चर्चिला गेला; मात्र भाजपने माकपाच्या युनियनवर त्याबाबत ठपका ठेवून त्यामुळेच नवीन कारखाने आले नसल्याचे सांगून सोडवणूक करण्याचा प्रयत्न केला. त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभ हा अवघा एक किलोमीटरचा रस्ता, परंतु दोन वर्षांपासून तो रखडला असल्याने तोदेखील चर्चिला गेला.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019onionकांदाElectionनिवडणूक