शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
2
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं"
3
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन करणार नाही - उद्धव ठाकरे
4
जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
5
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
6
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
7
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
8
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
9
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
10
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
11
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
12
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
13
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
14
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
15
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
16
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
17
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
18
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
19
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
20
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे

वातावरणातील बदलाने द्राक्षपंढरीत शेतकरी चिंतित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2020 02:49 IST

दिंडोरी तालुक्यातील द्राक्षपंढरी सध्या वातावरणातील बदलावाच्या परिस्थितीमुळे चिंतातुर झाली आहे. त्यामुळे यंदाचा द्राक्षे हंगाम कसा घ्यावा ही मोठी समस्या निर्माण झाल्याने बळीराजा हतबल झाला आहे.

ठळक मुद्देसंकट : यंदाचा हंगाम कसा घ्यावा; शेतकऱ्यांपुढे प्रश्न

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील द्राक्षपंढरी सध्या वातावरणातील बदलावाच्या परिस्थितीमुळे चिंतातुर झाली आहे. त्यामुळे यंदाचा द्राक्षे हंगाम कसा घ्यावा ही मोठी समस्या निर्माण झाल्याने बळीराजा हतबल झाला आहे.दिंडोरी तालुक्याचा संपूर्ण जिल्ह्यात द्राक्षपंढरी म्हणून नामोल्लेख केला जातो. परंतु सध्या या द्राक्षपंढरीला हवामानातील बदल, वातावरणातील बदलाव आदी संकटांनी आक्रमण केल्याने द्राक्षहंगाम पुढील काळासाठी डोकेदुखी बनती काय, असा सवाल उपस्थित होत आहे. सध्या तालुक्यात परतीच्या पावसाने कहर केला असून, शेतकरीवर्गाच्या तोंडातला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने भांडवलाचा तुटवडा ही गहन समस्या शेतकरीवर्गापुढे आ वासून उभी राहिली आहे. तालुक्यात सध्या त्रिसूत्री वातावरण पाहायला मिळत आहे. सकाळी दाट धुके, दुपारी कडक ऊन आणि संध्याकाळी परतीच्या पावसाचे आगमन यामुळे शेतकरीवर्ग मेटाकुटीस आला आहे. दिंडोरी तालुक्यातील द्राक्षे पिकाचे माहेरघर समजले जाणारे लखमापूर, म्हेळुस्के, ओझे, करंजवन, दहिवी, दहेगाव वागळुद, अवनखेड, कोराटे, मोहाडी, मडकीजांब, जांबुटके, परमोरी, राजापूर, मातेरेवाडी, बोपेगाव, खेडगाव, सोनजांब, तिसगाव बहादुरी, मावडी, शिवरे बोराळे, वणी इत्यादी गावांना वातावरणातील बदलावाचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. 

द्राक्ष हंगामात अनेक संकटाचा सामना करावा लागत असल्याने द्राक्षे पीक जिवावर बेतत आहे. भरपूर खर्च करून ही उत्पन्नाची एक कवडीही हातात न मिळाल्याने पुढे भांडवल कसे उभे करायचे हा प्रश्न भेडसावत आहे.     - जयदीप देशमुख, द्राक्ष उत्पादक, करंजवण

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी