शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
2
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
3
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
4
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
5
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
6
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
8
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
9
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
10
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
11
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
12
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
13
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
14
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
15
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
16
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
17
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
18
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
19
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
20
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

वातावरणातील बदलाने द्राक्षपंढरीत शेतकरी चिंतित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2020 02:49 IST

दिंडोरी तालुक्यातील द्राक्षपंढरी सध्या वातावरणातील बदलावाच्या परिस्थितीमुळे चिंतातुर झाली आहे. त्यामुळे यंदाचा द्राक्षे हंगाम कसा घ्यावा ही मोठी समस्या निर्माण झाल्याने बळीराजा हतबल झाला आहे.

ठळक मुद्देसंकट : यंदाचा हंगाम कसा घ्यावा; शेतकऱ्यांपुढे प्रश्न

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील द्राक्षपंढरी सध्या वातावरणातील बदलावाच्या परिस्थितीमुळे चिंतातुर झाली आहे. त्यामुळे यंदाचा द्राक्षे हंगाम कसा घ्यावा ही मोठी समस्या निर्माण झाल्याने बळीराजा हतबल झाला आहे.दिंडोरी तालुक्याचा संपूर्ण जिल्ह्यात द्राक्षपंढरी म्हणून नामोल्लेख केला जातो. परंतु सध्या या द्राक्षपंढरीला हवामानातील बदल, वातावरणातील बदलाव आदी संकटांनी आक्रमण केल्याने द्राक्षहंगाम पुढील काळासाठी डोकेदुखी बनती काय, असा सवाल उपस्थित होत आहे. सध्या तालुक्यात परतीच्या पावसाने कहर केला असून, शेतकरीवर्गाच्या तोंडातला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने भांडवलाचा तुटवडा ही गहन समस्या शेतकरीवर्गापुढे आ वासून उभी राहिली आहे. तालुक्यात सध्या त्रिसूत्री वातावरण पाहायला मिळत आहे. सकाळी दाट धुके, दुपारी कडक ऊन आणि संध्याकाळी परतीच्या पावसाचे आगमन यामुळे शेतकरीवर्ग मेटाकुटीस आला आहे. दिंडोरी तालुक्यातील द्राक्षे पिकाचे माहेरघर समजले जाणारे लखमापूर, म्हेळुस्के, ओझे, करंजवन, दहिवी, दहेगाव वागळुद, अवनखेड, कोराटे, मोहाडी, मडकीजांब, जांबुटके, परमोरी, राजापूर, मातेरेवाडी, बोपेगाव, खेडगाव, सोनजांब, तिसगाव बहादुरी, मावडी, शिवरे बोराळे, वणी इत्यादी गावांना वातावरणातील बदलावाचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. 

द्राक्ष हंगामात अनेक संकटाचा सामना करावा लागत असल्याने द्राक्षे पीक जिवावर बेतत आहे. भरपूर खर्च करून ही उत्पन्नाची एक कवडीही हातात न मिळाल्याने पुढे भांडवल कसे उभे करायचे हा प्रश्न भेडसावत आहे.     - जयदीप देशमुख, द्राक्ष उत्पादक, करंजवण

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी