शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
2
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
6
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
7
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
8
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
9
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
10
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
11
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
12
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
13
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
14
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
15
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
16
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
17
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
18
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
19
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
20
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम

स्मार्ट सिटी की वाद सिटी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 19:50 IST

नाशिक- शाश्वत विकासासाठी देशभरात राबविण्यात येत असलेल्या स्मार्ट सिटी प्रकल्पात एक ना अनेक वाद निर्माण झाले आहेत. महाराष्टÑात आणि नाशिकमध्ये वेगळे घडत नाही. सर्वच ठिकाणी स्मार्ट सिटी कंपनी नामक जी पर्यायी यंत्रणा उभारण्यात आली आहे तीच सर्वत्र वादाला कारणीभूत ठरत आहे नाशिक मध्ये नुकत्याच झालेल्या आठव्या राष्टÑीय स्मार्ट सिटी परिषदेत अनेक मुद्यांवर चर्चा झाली आणि शाश्वत विकास करण्याचे ठरविण्यात आले असले तरी आधी शाश्वत वाद मिटवा, मग शाश्वत विकास करा असे सांगण्याची किमान नाशिकमध्ये तरी वेळ आली आहे.

ठळक मुद्देलोक भावना जाणून कामे हवीवादविरहीत स्मार्ट सिटी साकारली तरी पुरे

संजय पाठक, नाशिक- शाश्वत विकासासाठी देशभरात राबविण्यात येत असलेल्या स्मार्ट सिटी प्रकल्पात एक ना अनेक वाद निर्माण झाले आहेत. महाराष्टÑात आणि नाशिकमध्ये वेगळे घडत नाही. सर्वच ठिकाणी स्मार्ट सिटी कंपनी नामक जी पर्यायी यंत्रणा उभारण्यात आली आहे तीच सर्वत्र वादाला कारणीभूत ठरत आहे नाशिक मध्ये नुकत्याच झालेल्या आठव्या राष्टÑीय स्मार्ट सिटी परिषदेत अनेक मुद्यांवर चर्चा झाली आणि शाश्वत विकास करण्याचे ठरविण्यात आले असले तरी आधी वाद मिटवा, मग शाश्वत विकास करा असे सांगण्याची किमान नाशिकमध्ये तरी वेळ आली आहे.

आठवी स्मार्ट सिटी परीषद नुकतीच नाशिकमध्ये पार पडली. यावेळी जी शहरे स्मार्ट सिटी अंतर्गत मागे पडत आहेत. त्यांना वेगाने पुढे आणण्यासाठी भगीनी शहरांच्या जोड्या करण्यात आल्या आहेत. नाशिकची जोडी जम्मु आणि काश्मिरशी लावण्यात आली आहे. बैठकीत अनेक राज्यातील स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी तात्वीक मत प्रदर्शन केले असले तरी ते ढोबळ स्वरूपात होते. वास्तवात आणि तळात काय चालते हा आणखी संशोधनाचा विषय आहे. एखादा विदेशातील प्रकल्प एका स्मार्ट सिटीने राबवला तर त्याचे अंधानुकरण करताना त्या शहरातील सामाजिक आर्थिक स्थिती आणि विशेषत: मनस्थिती काय आहे,याची चाचपणीच केली जात नाही. त्यातही कंपनीला जगाचे भान अधिक आणि नागरीकांना, लोकप्रतिनिधींना कमी कळते असा दुराग्रह बाळगून कामे होत असतात. महापालिकांंना पर्यायी यंत्रणा असल्याने कंपन्या काय मनमानी करतात आणि लोकप्रतिनिधींचे हक्क डावलले गेल्याने काय होते याबाबत परिषदेच कोणतीही चर्चा झाली नाही. जो स्मार्ट लाईटचा प्रकल्प अद्याप पुर्णच झाला नाही त्याबद्दल नाशिक स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाऱ्यांचा पुरस्कार देऊन गौरवही करण्यात आला. त्यामुळे अशा परिषदांपेक्षा कोणत्या तरी निर्णयक्षम प्राधीकरणाने तटस्थपणे त्या त्या शहरातील लोकभावना जाणून घेण्यासाठी परीषद घेतली तर ते अधिक फलदायी ठरेल.

केंद्रात संयुक्त पुरागोमी आघाडी सरकार असताना नेहेरू नागरी अभियान राबविण्यात आले. परंतु त्यात झााले नाही तितके वाद आणि घोटाळे आता स्मार्ट सिटी अंतर्गत गाजत आहेत. स्मार्ट सिटी विरूध्द संचालक आणि कंपनीच्या विरोधात अन्य नगरसेवक, प्रकल्पाच्या विरोधात लाभार्थी असे एकेक वाढते विरोधक बघता ही स्मार्ट सिटी की वाद सिटी असा प्रश्न निर्माण झाला आहे.

नाशिकमध्ये एकही प्रकल्प वादाविना सुरू झाला नाही की वादाविना संपला नाही. संचालक अंधारात आणि नगरसेवकांना पत्ता नाही. तेथे सामान्य नागरीकांची काय व्यथा? कंपनी स्थापन झाल्यापासून वादाचे ग्रहण लागले असून ते कायम आहे. नाशिकमध्ये कोणत्या ठिकाणी पट्टे मारून ते पे अ‍ॅँड पार्क सुरू होणार आहे आणि अचानक रस्ते खोदून तेथे स्मार्ट रोड सुरू होणार आहे. याचा थांगपत्ता कोणाला लागत नाही. अवघ्या एक किलो मीटर रस्त्यासाठी दोन वर्षे लागल्याने आता स्मार्ट सिटीचा प्रकल्प म्हंटला की नागरीकांना धडकीच भरते. अशा स्थितीत किमान वादविरहीत स्मार्ट सिटी साकारली गेली तरी पुरे आहे.

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाSmart Cityस्मार्ट सिटी