शहरं
Join us  
Trending Stories
1
Goregaon Fire: गोरेगावच्या भगतसिंग नगरमध्ये घराला भीषण आग; एकाच कुटुंबातील तिघांचा गुदमरून मृत्यू
2
वाद शिंदे सेनेशी, अन् नाईकांच्या सोसायटीत उद्धवसेनेला 'नो एन्ट्री'; वनमंत्र्यांच्या भावाने रोखल्याचा आरोप
3
"ट्रम्प यांनी नेतन्याहूंचे अपहरण करावे", पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची जीभ घसरली! इस्रायलने दिले उत्तर
4
NSE आणि BSE मध्ये शनिवारी ट्रेडिंग; वीकेंडला ट्रेडिंग सेशनची गरज का भासली, SEBI चा काय आहे आदेश?
5
Nashik Municipal Election 2026 : भाजप निष्ठावंतांना चुचकारण्याची ठाकरेंची खेळी, विकासापेक्षा राजकीय टीका-टिप्पणीवर भर
6
Tata च्या 'या' कंपनीनं केलं मालामाल; १ लाख रुपयांचे झाले १ कोटींपेक्षा अधिक, कोणता आहे स्टॉक?
7
मालकासाठी आयुष्य झिजवलं, पण त्याने मुलाच्या लग्नाला बोलावलं नाही; ६० वर्षीय वृद्धाची पोलीस ठाण्यात धाव
8
कोट्यवधींची गुंतवणूक, १६ लाखांहून अधिक रोजगारनिर्मिती; मुंबईसाठी CM फडणवीसांचा अजेंडा
9
"पाळी आली असेल तर पुरावा दाखव", उशीर झाल्याने लेक्चरर्सचे टोमणे; धक्क्याने विद्यार्थिनीचा मृत्यू
10
Sukanya Samriddhi Yojana Calculator: 'या' स्कीममध्ये तुमच्या मुलीसाठी उभा करू शकता ४७ लाख रुपयांचा फंड; सरकार देतेय ८.२% चं व्याज, जाणून घ्या
11
जयपूरमध्ये कारचं मृत्यूतांडव! रेसिंगच्या नादात १६ जणांना चिरडलं; एकाचा जागीच मृत्यू, शहरात खळबळ
12
Bhogi Festival 2026: खेंगट, बाजरीची भाकरी आणि लोणी; संक्रांतीच्या आधी भोगी का महत्त्वाची?
13
सुझुकीने अखेर ईलेक्ट्रीक स्कूटर e-Access लाँच केली, ९५ किमी रेंजसाठी किंमत एवढी ठेवली की...
14
"मी गरीब आहे, मला डॉक्टर व्हायचंय..."; मुख्यमंत्र्यांना भेटता न आल्याने विद्यार्थिनीला कोसळलं रडू
15
ट्रम्प टॅरिफबाबत अमेरिकन सर्वोच्च न्यायालयात काय-काय झालं? भारतावर किती परिणाम, जाणून घ्या
16
पाकिस्तानच्या कुरापती सुरूच! सांबाच्या फ्लोरा गावात ड्रोनने पाडलं पॅकेट; बीएसएफने उधळला पाकचा डाव
17
जपानच्या अधिकाऱ्याचा फोन चीनच्या विमानतळावर चोरीला गेला; अणुऊर्जा प्रकल्पांसह अत्यंत गोपनीय माहिती लीक होण्याचा धोका...
18
परभणी-जिंतूर मार्गावर पहाटे भीषण अपघात; कीर्तनाहून परतणाऱ्या तीन वारकऱ्यांचा मृत्यू
19
डोनाल्ड ट्रम्प यांची तेल कंपन्यांसोबत बैठक, अमेरिका भारताला व्हेनेझुएलाचे तेल देण्यास तयार; पण एका अटीवर...
20
भयंकर प्रकार! 'द राजा साब'च्या स्क्रीनिंगदरम्यान प्रभासच्या चाहत्यांनी कागदाचे तुकडे जाळले, व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटी की वाद सिटी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 19:50 IST

नाशिक- शाश्वत विकासासाठी देशभरात राबविण्यात येत असलेल्या स्मार्ट सिटी प्रकल्पात एक ना अनेक वाद निर्माण झाले आहेत. महाराष्टÑात आणि नाशिकमध्ये वेगळे घडत नाही. सर्वच ठिकाणी स्मार्ट सिटी कंपनी नामक जी पर्यायी यंत्रणा उभारण्यात आली आहे तीच सर्वत्र वादाला कारणीभूत ठरत आहे नाशिक मध्ये नुकत्याच झालेल्या आठव्या राष्टÑीय स्मार्ट सिटी परिषदेत अनेक मुद्यांवर चर्चा झाली आणि शाश्वत विकास करण्याचे ठरविण्यात आले असले तरी आधी शाश्वत वाद मिटवा, मग शाश्वत विकास करा असे सांगण्याची किमान नाशिकमध्ये तरी वेळ आली आहे.

ठळक मुद्देलोक भावना जाणून कामे हवीवादविरहीत स्मार्ट सिटी साकारली तरी पुरे

संजय पाठक, नाशिक- शाश्वत विकासासाठी देशभरात राबविण्यात येत असलेल्या स्मार्ट सिटी प्रकल्पात एक ना अनेक वाद निर्माण झाले आहेत. महाराष्टÑात आणि नाशिकमध्ये वेगळे घडत नाही. सर्वच ठिकाणी स्मार्ट सिटी कंपनी नामक जी पर्यायी यंत्रणा उभारण्यात आली आहे तीच सर्वत्र वादाला कारणीभूत ठरत आहे नाशिक मध्ये नुकत्याच झालेल्या आठव्या राष्टÑीय स्मार्ट सिटी परिषदेत अनेक मुद्यांवर चर्चा झाली आणि शाश्वत विकास करण्याचे ठरविण्यात आले असले तरी आधी वाद मिटवा, मग शाश्वत विकास करा असे सांगण्याची किमान नाशिकमध्ये तरी वेळ आली आहे.

आठवी स्मार्ट सिटी परीषद नुकतीच नाशिकमध्ये पार पडली. यावेळी जी शहरे स्मार्ट सिटी अंतर्गत मागे पडत आहेत. त्यांना वेगाने पुढे आणण्यासाठी भगीनी शहरांच्या जोड्या करण्यात आल्या आहेत. नाशिकची जोडी जम्मु आणि काश्मिरशी लावण्यात आली आहे. बैठकीत अनेक राज्यातील स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी तात्वीक मत प्रदर्शन केले असले तरी ते ढोबळ स्वरूपात होते. वास्तवात आणि तळात काय चालते हा आणखी संशोधनाचा विषय आहे. एखादा विदेशातील प्रकल्प एका स्मार्ट सिटीने राबवला तर त्याचे अंधानुकरण करताना त्या शहरातील सामाजिक आर्थिक स्थिती आणि विशेषत: मनस्थिती काय आहे,याची चाचपणीच केली जात नाही. त्यातही कंपनीला जगाचे भान अधिक आणि नागरीकांना, लोकप्रतिनिधींना कमी कळते असा दुराग्रह बाळगून कामे होत असतात. महापालिकांंना पर्यायी यंत्रणा असल्याने कंपन्या काय मनमानी करतात आणि लोकप्रतिनिधींचे हक्क डावलले गेल्याने काय होते याबाबत परिषदेच कोणतीही चर्चा झाली नाही. जो स्मार्ट लाईटचा प्रकल्प अद्याप पुर्णच झाला नाही त्याबद्दल नाशिक स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाऱ्यांचा पुरस्कार देऊन गौरवही करण्यात आला. त्यामुळे अशा परिषदांपेक्षा कोणत्या तरी निर्णयक्षम प्राधीकरणाने तटस्थपणे त्या त्या शहरातील लोकभावना जाणून घेण्यासाठी परीषद घेतली तर ते अधिक फलदायी ठरेल.

केंद्रात संयुक्त पुरागोमी आघाडी सरकार असताना नेहेरू नागरी अभियान राबविण्यात आले. परंतु त्यात झााले नाही तितके वाद आणि घोटाळे आता स्मार्ट सिटी अंतर्गत गाजत आहेत. स्मार्ट सिटी विरूध्द संचालक आणि कंपनीच्या विरोधात अन्य नगरसेवक, प्रकल्पाच्या विरोधात लाभार्थी असे एकेक वाढते विरोधक बघता ही स्मार्ट सिटी की वाद सिटी असा प्रश्न निर्माण झाला आहे.

नाशिकमध्ये एकही प्रकल्प वादाविना सुरू झाला नाही की वादाविना संपला नाही. संचालक अंधारात आणि नगरसेवकांना पत्ता नाही. तेथे सामान्य नागरीकांची काय व्यथा? कंपनी स्थापन झाल्यापासून वादाचे ग्रहण लागले असून ते कायम आहे. नाशिकमध्ये कोणत्या ठिकाणी पट्टे मारून ते पे अ‍ॅँड पार्क सुरू होणार आहे आणि अचानक रस्ते खोदून तेथे स्मार्ट रोड सुरू होणार आहे. याचा थांगपत्ता कोणाला लागत नाही. अवघ्या एक किलो मीटर रस्त्यासाठी दोन वर्षे लागल्याने आता स्मार्ट सिटीचा प्रकल्प म्हंटला की नागरीकांना धडकीच भरते. अशा स्थितीत किमान वादविरहीत स्मार्ट सिटी साकारली गेली तरी पुरे आहे.

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाSmart Cityस्मार्ट सिटी