पाणीपुरवठा होत नसल्याने सिडकोत मोर्चा
By Admin | Updated: May 29, 2014 01:15 IST2014-05-29T00:38:13+5:302014-05-29T01:15:44+5:30
सिडको : गेल्या तीन दिवसांपासून बजरंग चौक, दत्त चौकसह परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिकांनी आज सिडको मनपा कार्यालयावर मोर्चा काढला.

पाणीपुरवठा होत नसल्याने सिडकोत मोर्चा
सिडको : गेल्या तीन दिवसांपासून बजरंग चौक, दत्त चौकसह परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिकांनी आज सिडको मनपा कार्यालयावर मोर्चा काढला.
सिडकोतील विजयनगर, दत्त चौक, बजरंग चौक, तानाजी चौक, वृंदावन चौक यांसह परिसरात गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास पाणीपुरवठा केला जात होता. परंतु गेल्या तीन दिवसांपासून सदर परिसरात अत्यंत कमी दाबाने व अवेळी पाणीपुरवठा होत असल्याने महिला वर्गात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शिवसेनेचे माजी नगरसेवक सतीश खैरनार यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील महिला वर्गाने मनपाच्या सिडको विभागीय कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली पाणीपुरवठ्याची वेळ आहे तीच ठेवावी. तसेच सुरळीत पाणीपुरवठा करावा, याबाबत पाणीपुरवठा अधिकारी संजीव बच्छाव यांना सांगितले. बच्छाव यांनीही उद्यापासून पाणीपुरवठ्याची वेळ नियमित करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे शिष्टमंडळाला सांगितले.
पाणीपुरवठा अधिकारी संजीव बच्छाव यांच्याशी चर्चा करताना सतीश खैरनार, भिकुबाई वाडेकर, ललिता काळे, चंद्रकला खरोटे, मंदा संधान.