शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

आश्रमशाळेच्या चिमूकल्यांनी भागविली मुक्या जीवांची तहान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 01:22 IST

पेठ : मार्च महिन्याचे तळपते ऊन आणि रानावनात भटकणाऱ्या पशुपक्ष्यांची अन्नपाण्याशिवाय होणारी उपासमार लक्षात घेऊन पेठ तालुक्यातील आडगाव (भू.) आश्रमशाळेतील विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी यांच्या संकल्पनेतून टाकाऊपासून टिकाऊ पाणवठे तयार करून मुक्या जीवांची तहान-भूक भागविली आहे.

ठळक मुद्देपेठ तालुक्यातील आडगाव शाळेचा उपक्रम

पेठ : मार्च महिन्याचे तळपते ऊन आणि रानावनात भटकणाऱ्या पशुपक्ष्यांची अन्नपाण्याशिवाय होणारी उपासमार लक्षात घेऊन पेठ तालुक्यातील आडगाव (भू.) आश्रमशाळेतील विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी यांच्या संकल्पनेतून टाकाऊपासून टिकाऊ पाणवठे तयार करून मुक्या जीवांची तहान-भूक भागविली आहे.निवासी आश्रमशाळेत शिक्षण घेऊन ज्ञान संपादन करणाऱ्या आडगाव भू. येथील विद्यार्थी रंजना पोटींदे (७वी), गीतांजली खुरकुटे(५वी), हेमलता पोटींदे (५वी), कृष्णा बोरसे(६वी) आदी विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने शाळेतील रिकामे तेलाचे डबे कापून त्यामध्ये एका बाजूला पाणी तर दुसऱ्या बाजूला दाणे टाकण्याची सुविधा केली.       शाळेच्या आवारात तसेच रस्त्यावरील झाडांवर हे कृत्रिम पाणवठे टांगण्यात आले असून ऐन उन्हात पक्षी या ठिकाणी पाणी पिऊन तृप्त होत आहेत. याकामी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक खैरणार, शिक्षक खिल्लारे, पुयड आदींच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी नियमितपणे या पाणवठ्यांवर दाणा-पाण्याची सोय करीत आहेत.मोठ्या प्रमाणावर जंगलतोड झाल्याने झाडांची संख्या कमी झाली. ऊन्हाळ्यात पशू, पक्षी अन्नपाण्यावाचून भटकत असतात. सध्या कडक ऊन पडत असल्याने शिक्षकांच्या मदतीने जुन्या डब्यांचा वापर करून केलेले पाणवठे पक्ष्यांसाठी उपयोगी पडत आहेत.-रंजना पोटींदे, विद्यार्थिनी.

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळा