शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

आडगाव वसतिगृहासमोर छात्रभारतीचे ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2022 01:28 IST

शहरातील सर्व वसतिगृह सुरू करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी (दि. ८) सकाळी ११.०० वाजेपासून छात्रभारती विद्यार्थी संघटनेतर्फे आडगाव येथील समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देवसतिगृह सुरू करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी आक्रमक

नाशिक : शहरातील सर्व वसतिगृह सुरू करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी (दि. ८) सकाळी ११.०० वाजेपासून छात्रभारती विद्यार्थी संघटनेतर्फे आडगाव येथील समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.

नाशिक समाजकल्याण विभाग वसतिगृह विद्यार्थ्यांना वेठीस धरत असल्याचा आरोप करीत छात्रभारती विद्यार्थी संघटनेने आंदोलनात्मक पवित्रा घेतला आहे. सामाजिक न्याय विभाग मंत्री धनंजय मुंडे यांनी विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर राज्यातील वसतिगृह सुरू करण्याचा आदेश दिलेला असतानाही अद्याप नाशिक शहरात समाजकल्याण विभागाने सुरू केलेले नाही, महाविद्यालय वैद्यकीय महाविद्यालय तसेच विविध भरती परीक्षा आणि एमपीएससीच्या परीक्षा सुरू असताना वसतिगृह बंद ठेवून विद्यार्थ्यांवर अन्याय केला जात असल्याचा आरोपही छात्रारतीने केला आहे. संघटनेतर्फे यासंदर्भात मागील १५ दिवसांपासून उपायुक्तांना विद्यार्थी संघटनांनी प्रत्यक्ष भेट घेऊन वसतिगृहातील विद्यार्थ्यांची परिस्थिती लक्षात आणून दिली होती. मात्र, वसतिगृह सुरू करण्याबाबत कोणतीही कारवाई न करता टाळाटाळ केल्याचा आरोप आंदोलक विद्यार्थ्यांकडून केला असून, विद्यार्थ्यांच्या मागणीचा विचार होत नसल्याने मंगळवारी छात्रभारती विद्यार्थी संघटनेने ठिय्या आंदोलन करीत आदिवासी विभागातील अधिकाऱ्यांविरोधात रोष व्यक्त केला. या ठिय्या आंदोलनात छात्रभारतीचे राज्याध्यक्ष राकेश पवार, राज्य सचिव समाधान बागूल आणि शहराध्यक्ष देवीदास हजारे वसतिगृह विद्यार्थी प्रशिक सोनवणे, आकाश सावकार, विनय मोरे, ऋषिकेश आंधळे, आकाश पठारे, नकुल जमाव, विजय गांगुर्डे, अक्षय निकम यांच्यासह सर्व विद्यार्थी कार्यकर्ते उपस्थित होते.

 

कल्याणकारी योजनांमध्ये समाजकल्याण विभाग अपयशी

समाजकल्याण वसतिगृहातील विद्यार्थ्यांना २०१९ पासून निर्वाह भत्ता मिळालेला नसल्याचे नमूद करतानाच शैक्षणिक शिष्यवृत्ती वेळेवर मिळत नाही, मागील २ वर्षांपासून स्वाधार योजनेचा निधी वितरित केलेला नाही, वसतिगृह विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादी वेळेत जाहीर केली जात नाही, अशा विविध मागण्यांबाबत छात्रभारती विद्यार्थी संघटनेने वेळोवेळी पाठपुरावा करूनदेखील समाजकल्याण विभागाने दखल घेतली नसल्याने विद्यार्थ्यांसाठी कल्याणकारी योजना राबविण्यात समाजकल्याण विभाग अपयशी ठरल्याची प्रतिक्रिया छात्रभारतीतर्फे आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांनी दिली आहे.

टॅग्स :NashikनाशिकStudentविद्यार्थीagitationआंदोलन