शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
3
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
4
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
5
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
6
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
7
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
8
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
9
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
10
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
11
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
12
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
13
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
14
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
15
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
16
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
17
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
18
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
19
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
20
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार

आडगाव वसतिगृहासमोर छात्रभारतीचे ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2022 01:28 IST

शहरातील सर्व वसतिगृह सुरू करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी (दि. ८) सकाळी ११.०० वाजेपासून छात्रभारती विद्यार्थी संघटनेतर्फे आडगाव येथील समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देवसतिगृह सुरू करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी आक्रमक

नाशिक : शहरातील सर्व वसतिगृह सुरू करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी (दि. ८) सकाळी ११.०० वाजेपासून छात्रभारती विद्यार्थी संघटनेतर्फे आडगाव येथील समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.

नाशिक समाजकल्याण विभाग वसतिगृह विद्यार्थ्यांना वेठीस धरत असल्याचा आरोप करीत छात्रभारती विद्यार्थी संघटनेने आंदोलनात्मक पवित्रा घेतला आहे. सामाजिक न्याय विभाग मंत्री धनंजय मुंडे यांनी विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर राज्यातील वसतिगृह सुरू करण्याचा आदेश दिलेला असतानाही अद्याप नाशिक शहरात समाजकल्याण विभागाने सुरू केलेले नाही, महाविद्यालय वैद्यकीय महाविद्यालय तसेच विविध भरती परीक्षा आणि एमपीएससीच्या परीक्षा सुरू असताना वसतिगृह बंद ठेवून विद्यार्थ्यांवर अन्याय केला जात असल्याचा आरोपही छात्रारतीने केला आहे. संघटनेतर्फे यासंदर्भात मागील १५ दिवसांपासून उपायुक्तांना विद्यार्थी संघटनांनी प्रत्यक्ष भेट घेऊन वसतिगृहातील विद्यार्थ्यांची परिस्थिती लक्षात आणून दिली होती. मात्र, वसतिगृह सुरू करण्याबाबत कोणतीही कारवाई न करता टाळाटाळ केल्याचा आरोप आंदोलक विद्यार्थ्यांकडून केला असून, विद्यार्थ्यांच्या मागणीचा विचार होत नसल्याने मंगळवारी छात्रभारती विद्यार्थी संघटनेने ठिय्या आंदोलन करीत आदिवासी विभागातील अधिकाऱ्यांविरोधात रोष व्यक्त केला. या ठिय्या आंदोलनात छात्रभारतीचे राज्याध्यक्ष राकेश पवार, राज्य सचिव समाधान बागूल आणि शहराध्यक्ष देवीदास हजारे वसतिगृह विद्यार्थी प्रशिक सोनवणे, आकाश सावकार, विनय मोरे, ऋषिकेश आंधळे, आकाश पठारे, नकुल जमाव, विजय गांगुर्डे, अक्षय निकम यांच्यासह सर्व विद्यार्थी कार्यकर्ते उपस्थित होते.

 

कल्याणकारी योजनांमध्ये समाजकल्याण विभाग अपयशी

समाजकल्याण वसतिगृहातील विद्यार्थ्यांना २०१९ पासून निर्वाह भत्ता मिळालेला नसल्याचे नमूद करतानाच शैक्षणिक शिष्यवृत्ती वेळेवर मिळत नाही, मागील २ वर्षांपासून स्वाधार योजनेचा निधी वितरित केलेला नाही, वसतिगृह विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादी वेळेत जाहीर केली जात नाही, अशा विविध मागण्यांबाबत छात्रभारती विद्यार्थी संघटनेने वेळोवेळी पाठपुरावा करूनदेखील समाजकल्याण विभागाने दखल घेतली नसल्याने विद्यार्थ्यांसाठी कल्याणकारी योजना राबविण्यात समाजकल्याण विभाग अपयशी ठरल्याची प्रतिक्रिया छात्रभारतीतर्फे आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांनी दिली आहे.

टॅग्स :NashikनाशिकStudentविद्यार्थीagitationआंदोलन