शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

स्वस्त धान्य विक्री केंद्र ठरु शकते ह्यकोरोनाह्णचे संक्रमणाचे केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 4:57 PM

सिन्नर: एप्रिल महिन्यापासून बंद असलेली रेशन दूकानातील बायोमेट्रिक प्रणाली पुन्हा कार्यान्वीत करण्यात आली आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाने रेशन वाटपासाठी ह्यबायोमेट्रिकह्ण पध्दत पुर्वीप्रमाणे राबविण्याचा निर्णय घेतल्याने कोरोनाचा वाढता प्रार्दूभाव लक्षात घेता या निर्णयाच्या फेरविचाराची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा स्वस्त धान्य विक्री केंद्र बायोमेट्रिक मशीनमुळे कोरोना संक्रमणाचे केंद्र ठरल्यास नवल वाटू नये.

ठळक मुद्देबायोमेट्रिक निर्णयाच्या फेरविचाराची गरज; लाभार्थी व रेशन दूकानदारांची जीव मुठीत

सिन्नर: एप्रिल महिन्यापासून बंद असलेली रेशन दूकानातील बायोमेट्रिक प्रणाली पुन्हा कार्यान्वीत करण्यात आली आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाने रेशन वाटपासाठी ह्यबायोमेट्रिकह्ण पध्दत पुर्वीप्रमाणे राबविण्याचा निर्णय घेतल्याने कोरोनाचा वाढता प्रार्दूभाव लक्षात घेता या निर्णयाच्या फेरविचाराची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा स्वस्त धान्य विक्री केंद्र बायोमेट्रिक मशीनमुळे कोरोना संक्रमणाचे केंद्र ठरल्यास नवल वाटू नये.मार्च अखेरीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक दिवसाचा ह्यजनता कफ्यूह्ण लावला. त्याच्या दुसऱ्या दिवसापासून लॉकडाऊन झाले. त्यामुळे एप्रिल महिन्यापासून रेशन दुकानात बायोमेट्रिक पध्दतीने रेशन वाटप बंद करण्यात आले होते. कोरोनाचा ससंर्ग होऊ नये म्हणून बायोमेट्रिक बंद करण्यात आले होते. मात्र अन्न व नागरी पुरवठा विभागाने आॅगस्ट महिन्यापासून पुन्हा बायोमेट्रिक मशीनद्वारे रेशन वितरणास प्रारंभ केला. चार महिन्यानंतर उलट आता कोरोनाची परिस्थिती गंभीर झाली आहे. देश, राज्य, जिल्हा व तालुक्यात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. असे असतांना पुन्हा बायोमेट्रिक प्रणालीद्वारे रेशन वाटप करण्याचा निर्णय कितपत योग्य आहे हे येणारा काळच सांगेल.कोरोनामुळे राज्य व जिल्ह्यात मृतांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तर कोरोनाबाधितांचा आकडाही मोठा वाढला आहे. कोरोनामुळे लाखों लोकांचे रोजगार गेले. अचानक झालेल्या लॉकडाऊनमुळे हजारो लोक अन्नपाण्यावाचून रस्यावर आल्याचे दृष्य एप्रिल व मे महिन्यात पहायला मिळाले. अनेकांनी चार-पाचशे किलोमीटर पायी चालून घर जवळ केले होते. गावात गेल्यानंतर त्यांना आधार मिळाला तो गावातील सरकारी स्वस्त धान्य दुकातील धान्याचा. हा शासनाचा निर्णय अतिशय योग्य होता. मात्र आता एप्रिल-मे महिन्याच्या तुलनेत कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असतांना पुन्हा बायोमेट्रिक पध्दतीने रेशन वितरणाचा निर्णय झाल्याने दुकानात रेशन घ्यायला जाणारे लाभार्थी व स्वस्त धान्य दुकानदार या दोघांना मशीनवर बोट उमटविण्याासाठी बोट टेकवतांना अंगावर काटा उभा राहात असल्याचे चित्र आहे. त्यात रेशन दुकानातील बायोमेट्रिकचे सर्व्हस डाऊन राहात असल्याने ग्राहकांना तास्तास रांगेत गर्दीत उभे राहावे लागत आहे.सुविधांबाबत सांशकता..१ आॅगस्टपासून बायोमेट्रिक पध्दत सुरु करण्यात आली आहे. अंगठा लावल्यानंतरच धान्य मिळते. मात्र दुकानात सॅनिटायझर आणि इतर सुविधा किती दुकानात पुरवल्या जातात याबाबत सांशकता आहे. रेशन घेण्यासाठी होणारी गर्दीत सोशल डिस्टिंगसिंग पाळले जाते का? सर्वांच्या हाताला सॅनिटायझर लावले जाते का याबाबत सांशकता आहे. त्यामुळे रेशन दुकान कोरोना संक्रमणाचे केंद्र होेऊ शकते.अंगठा नाही तर धान्य नाही१ आॅगस्टपासून शासनाने स्वस्त धान्य नेण्यासाठी बायोमेट्रिक मशीनवर अंगठा लावणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे आता अंगठा लावल्याशिवाय धान्य मिळणार नाही. कोरोनाच्या धास्तीने अगोदर नागरिकांमध्ये भीती आहे. त्यात या निर्णयामुळे नागरिकांना जीव मुठीत धरुन स्वस्त धान्य मिळविण्यासाठी रांगेत उभे राहावे लागत आहे.ह्यबायोमेट्रिक पध्दतीने रेशन वाटपास दुकानदारांची हरकत नाही. मात्र सध्या कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने येणारे लाभार्थी अंगठा टेकविण्यास कचरतात. कोरोनाचा संसर्ग होण्यास घाबरतात. त्यामुळे कोरोना संसर्ग कमी होईपर्यंत दुकानदार आणि लाभार्थी संकटात येऊ नये यासाठी या निर्णयाच्या फेरविचार होण्याची गरज आहे. त्यात बायोमेट्रिक मशीनचे सर्व्हर नेहमी डाऊन असते. त्यामुळे रेशन घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना तासंतास रांगेत उभे राहावे लागते. त्यामुळे धोका आणखी वाढतो.सतीश भुतडा, अध्यक्ष, सिन्नर तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटना 

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयGovernmentसरकार