शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

परप्रांतीयांचा मुद्दा सोडला तर मनसेशी युतीचा विचार; चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2021 05:26 IST

राज ठाकरे यांनी व्यापक राजकारण केले, परप्रांतीयांच्या मुद्द्याकडे त्याच दृष्टीने बघितले पाहिजे, अशा व्यापक राजकारणातून युती होऊ शकते, असे  भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्क

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील येथील शासकीय विश्रामगृहात उतरल्याने पुन्हा युतीची चर्चा सुरू झाली. मात्र, ठाकरे यांनी व्यापक राजकारण केले, परप्रांतीयांच्या मुद्द्याकडे त्याच दृष्टीने बघितले पाहिजे, अशा व्यापक राजकारणातून युती होऊ शकते, असे  भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. राज ठाकरे हे महाराष्ट्राला हवे असलेले नेतृत्व आहे, असेही ते म्हणाले.

पंतप्रधान मोदी यांची राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी दिल्लीत भेट घेतल्यानंतर उलटसुलट चर्चेला उधाण आले असले तरी ही संसद अधिवेशनापूर्वी चर्चेसाठी प्रघाताप्रमाणे भेट असावी, आणखी काही खास चर्चा झाली असेल तर माहिती नाही परंतु या भेटीमुळे महाराष्ट्रात राजकीय घडामोडी होण्याची शक्यता कमीच आहे, असे पाटील म्हणाले. 

नाशिकच्या दौऱ्यावर पाटील यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना महाविकास आघाडीला नाइलाजाने एकत्र राहावेच लागणार असल्याचे सांगितले. केंद्रातील मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने मुंडे भगिनी नाराज आहेत. त्यात पंकजा मुंडे यांच्या साखर कारखान्याला ईडीची नोटीस बजावण्यात आली. त्यावर बोलताना दोन घटनांचा एकत्र अर्थ लावण्याचे त्यांनी खंडन केले. 

चूक केली नसेल तर घाबरायचे कारण नाही. मात्र, रात्रीतून कोणालाही अटक होऊ शकते, असे गप्पांच्या ओघात सांगणाऱ्या पाटील यांनी नंतर सारवासारव केली. रात्रीतून अटक म्हटलो; परंतु कोणाचे नाव घेतले नव्हते. खूप जणांची चौकशी सुरू असून, त्यांच्या अटकेची शक्यता आहे, असे ते म्हणाले.

केवळ मुंडे यांच्याच नव्हे, तर अन्य कारखान्यांवरही कारवाई करण्यात आली आहे. मुळात पंकजा मुंडे नाराज नसून त्यांचे कार्यकर्ते नाराज होते, पंकजाताईंनी त्यासंदर्भात त्यांचीही समजूत काढली आहे. - चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप

टॅग्स :Politicsराजकारणchandrakant patilचंद्रकांत पाटीलRaj Thackerayराज ठाकरेBJPभाजपाMNSमनसे