शहरं
Join us  
Trending Stories
1
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
2
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
3
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
4
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
5
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
6
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
7
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
8
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
9
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
10
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
11
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
12
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
13
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
14
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
15
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
16
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
17
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
18
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
19
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
20
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

चणकापूर, पुनंदमधून आवर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 23:07 IST

चणकापूर व पुनंद धरणात पाणीसाठा असल्याचे निदर्शनास आणून देत या दोन्ही प्रकल्पातून गिरणा व पुनंद नदीला आवर्तन सोडून कसमादे पट्ट्यातील पाणीटंचाई दूर करावी, अशी मागणी आमदार नितीन पवार व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांनी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे केल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी प्राप्त अहवालानुसार चणकापूर व पुनंद प्रकल्पातून तत्काळ पाणी सोडण्याचे निर्देश दिले आहेत.

ठळक मुद्देगिरणा नदी खळाळणार : उद्यापासून कसमादे पट्ट्याला मिळणार दिलासा

कळवण :चणकापूर व पुनंद धरणातपाणीसाठा असल्याचे निदर्शनास आणून देत या दोन्ही प्रकल्पातून गिरणा व पुनंद नदीला आवर्तन सोडून कसमादे पट्ट्यातील पाणीटंचाई दूर करावी, अशी मागणी आमदार नितीन पवार व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांनी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे केल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी प्राप्त अहवालानुसार चणकापूर व पुनंद प्रकल्पातून तत्काळ पाणी सोडण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार नाशिक व मालेगाव पाटबंधारे विभागाने १५ एप्रिल रोजी पाणी सोडण्याचे नियोजन केल्यामुळे कसमादे पट्ट्यातील जनतेला दिलासा मिळाला आहे.जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी मालेगाव पाटबंधारे विभाग व गिरणा खोरे प्रकल्प विभागाला तत्काळ अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्यानंतर अहवालानुसार पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत. पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी चणकापूर व पुनंद प्रकल्पातून १५ एप्रिल रोजी पुनंद व गिरणा नदीद्वारे पाणी सोडण्यात येणार आहे. त्याचबरोबर कालव्याद्वारे पाणी सोडण्यात येणार आहे. पाणी आवर्तनाच्या माध्यमातून गिरणा व पुनंद नदीपात्रात १५ दिवसांचे आवर्तन राहणार असल्याने कसमादे पट्ट्यातील गिरणा काठाला दिलासा मिळाला आहे.गिरणा व पुनंद नदीचे पात्र कोरडेठाक झाल्यामुळे या नदीतील पाण्यावर अवलंबून असलेल्या कसमादे पट्ट्यातील अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजना ठप्प झाल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे कसमादे पट्ट्यातील शहरी भागात राहणाऱ्या नागरिकांनी आपला मोर्चा गावाकडे वळविला आहे. त्यामुळे आदिवासी व ग्रामीण भागात पाण्याची मागणी वाढली आहे. प्रत्येकाला साबण लावून हात धुण्याच्या सूचना दिल्यामुळे पिण्यासाठी पाणी नाही तर हात धुणार कुठे, असा सवाल आदिवासी भागात विचारला जात असून, तालुक्यातील दौºयात आदिवासी बांधवानी याबाबत अगतिकता बोलून दाखविल्याचे आमदार नितीन पवार यांनी यंत्रणेच्या निदर्शनास आणून दिले होते. कळवण नगरपंचायत, सटाणा नगर परिषद, देवळा ग्रामीण पाणीपुरवठा योजना, दाभाडी बारा गाव पाणीपुरवठा योजना, लखमापूर, ब्राह्मणगाव, लोहोणेर, ठेंगोडा आदी पाणीपुरवठा योजनांसह कसमादे पट्ट्यातील टंचाईग्रस्त भागाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. कळवण तालुक्यातील संबंधित गावांचे पाणी मागणीचे ठराव जोडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते.सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरी व ग्रामीण भागातील पाणीपुरवठा अनियमित सुुरू असल्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. कोरोनामुळे शहरात लॉकडाउन व संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. कोरोनामुळे मोठ्या शहरातून विद्यार्थी तसेच नोकरदार, व्यावसायिक कसमादे पट्ट्यातील गावाकडे आल्यामुळे ग्रामीण व आदिवासी भागातील अनेक कुटुंबातील सदस्यांची संख्यादेखील वाढलेली आहे. त्यातच कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी पाण्याने हात स्वच्छ धुणे तसेच स्वच्छता राखण्यासाठी शासनाने विविध सूचनांचे पालन करण्याचा आग्रह धरला आहे. यामुळे पाण्याचा वापरही वाढला आहे. परंतु अनियमित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. त्यातच संचारबंदीमुळे घराबाहेर पडणे शक्य होत नसल्यामुळे इतर ठिकाणांहून पाणी आणणे दुरापास्त झाले आहे.देवळा तालुक्यातील कालवा लाभ क्षेत्रातील गावांना आवर्तन सोडण्यात येणार आहे. उन्हाळ्यात उभ्या पिकांसाठी व फळबागेसाठी योग्य मागणीनुसार गिरणा नदीच्या काठालगत असणाºया सर्व प्रकल्पांना व गिरणा डावा व गिरणा उजव्या कालव्यास ७५० दलघफू पाण्याचे १५ दिवसांचे आवर्तन १५ एप्रिल रोजी सोडण्यात येणार आहे.- डॉ. राहुल आहेर, आमदार

टॅग्स :WaterपाणीDamधरण