शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

चक्रधर स्वामींचे कार्य समाजासाठी प्रेरक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 11:22 PM

निफाड : सुमारे साडेसातशे वर्षांपूर्वी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांनी सर्वसामान्य जनतेसाठी समाज प्रबोधन, ज्ञानप्रबोधन करीत भक्तिमार्गाचे कार्य केले. विशेष म्हणजे धर्म पंथाचे हे कार्य स्वामींनी त्या काळात प्रचलित असलेल्या संस्कृत भाषेतून न सांगता मराठी भाषेतून सांगितले. इतकेच नव्हे तर धार्मिक कार्याचा अधिकार हा केवळ उच्चवर्णीयांना नसून समाजातील सर्वच स्त्री पुरुषांना आणि सर्वसामान्य जनतेला आहे, असा संदेश दिला, असे प्रतिपादन महानुभाव पंथाचे आचार्य महंत बिडकर बाबा शास्त्री यांनी केले.

ठळक मुद्देमहंत बिडकर बाबा : अष्टशताब्दी महोत्सव सोहळा उत्साहात

निफाड : सुमारे साडेसातशे वर्षांपूर्वी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांनी सर्वसामान्य जनतेसाठी समाज प्रबोधन, ज्ञानप्रबोधन करीत भक्तिमार्गाचे कार्य केले. विशेष म्हणजे धर्म पंथाचे हे कार्य स्वामींनी त्या काळात प्रचलित असलेल्या संस्कृत भाषेतून न सांगता मराठी भाषेतून सांगितले. इतकेच नव्हे तर धार्मिक कार्याचा अधिकार हा केवळ उच्चवर्णीयांना नसून समाजातील सर्वच स्त्री पुरुषांना आणि सर्वसामान्य जनतेला आहे, असा संदेश दिला, असे प्रतिपादन महानुभाव पंथाचे आचार्य महंत बिडकर बाबा शास्त्री यांनी केले.निफाड तालुक्यातील चांदोरी येथे जिल्हास्तरीय श्रीचक्रधर स्वामी अष्टशताब्दी महोत्सव व जयंती सोहळा मोठ्या उत्साहात आणि शासनाच्या कोरोना नियमावलीचे पालन करीत संपन्न झाला. यावेळी आचार्य महंत बिडकर बाबाजी म्हणाले की, श्री चक्रधर स्वामींनी त्या काळातील प्रस्थापित धर्म व्यवस्थेची कर्मकांडाची चौकट मोडून महानुभाव पंथाच्या तत्त्वज्ञानाचा पाया रचला. श्री स्वामींनी त्या काळात सर्व महाराष्ट्रभर परिभ्रमण करून स्त्री-पुरुष समानता, अहिंसेचा संदेश, सर्व व्यसनांपासून दूर राहणे, तसेच वर्णभेदावर देखील स्वामींनी प्रहार केले. त्यानंतरच्या आचार्यांनी स्वामींचे हे मोलाचे कार्य सर्व समाजात पोहोचविले. आजही स्वामींचे हे कार्य सर्व समाजासाठी प्रेरणादायक आहे. तसेच गेल्या सातशे वर्षांपासून महाराष्ट्रात पंथाचे कार्य निरंतर सुरू आहे, असेही आचार्य महंत बिडकर बाबाजी यांनी सांगितले.याप्रसंगी महंत न्यायव्यास बाबा (मकरधोकडा जि. नागपूर ) यांनी महानुभाव पंथाचे कार्य तसेच श्री चक्रधर स्वामींच्या जीवन कार्याचा सखोल परिचय करून दिला. त्याचप्रमाणे महानुभावची काशी असलेल्या श्रीक्षेत्र रुद्धपूर (जि. अमरावती) येथे मराठी भाषा तत्त्वज्ञान अध्ययन केंद्राची स्थापना होणार असल्याचे माहिती दिली. याप्रसंगी महंत श्री सुकेणेकर बाबा शास्त्री यांनी या महोत्सवाबद्दल माहिती दिली. याप्रसंगी महंत अंकुळनेरकर बाबा, महंत संतोष मुनी शास्त्री, नीलेश दादा बिडकर आदींनी देखील विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. बाळकृष्ण अंजनगावकर यांनी केले.संत महंतांचा सन्मानअखिल भारतीय महानुभाव परिषद, नाशिक जिल्हा महानुभाव परिषद व चांदोरी ग्रामस्थ व सद्भक्त परिवार यांच्यावतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. धर्मसभेच्या प्रारंभी सकाळी देवास मंगलस्नान, भगवद्गीता पठान, पंथ ध्वजाचे पूजन व मानवंदना, सभामंडपाचे उद्घाटन देवास वंदन, संत महंतांचा सन्मान, आरती, विडा अवसर, देव पूजा, उपहार सोहळा आदी कार्यक्रम संपन्न झाले. 

टॅग्स :nifadनिफाडSocialसामाजिक