शहरं
Join us  
Trending Stories
1
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
2
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
3
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
4
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
5
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
6
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
7
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
9
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
10
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
11
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
12
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
13
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
14
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
15
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
16
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
17
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
18
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
19
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
20
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट

केंद्र सरकारने कांदा निर्यातमूल्य वाढविल्याने कळवणमध्ये नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 10:51 PM

कांद्याचे निर्यातमूल्य ८५० डॉलर करण्याचा सरकारच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली जात असून, शहरी भागातील जनतेला खूश ठेवण्यासाठी ऊस उत्पादक शेतकरी बांधवांच्या भावनांशी सरकार खेळते आहे. निर्यातमूल्य वाढल्याने व्यापारी बांधवांना कांदा निर्यातीसाठीच्या खर्चात वाढ होणार आहे. त्यामुळे देशांतर्गत विक्र ीस प्राधान्य दिले जाईल. त्यामुळे बाजारभावात कांदा स्वस्त होईल असे गणित असल्याने कांदा निर्यातमूल्य वाढविल्याने कळवणमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्दे कांदा निर्यातीसाठीच्या खर्चात वाढ कांदा निर्यातीवर काही प्रमाणात बंधन कांदा उत्पादक शेतकरी संतप्त

कळवण : कांद्याचे निर्यातमूल्य ८५० डॉलर करण्याचा सरकारच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली जात असून, शहरी भागातील जनतेला खूश ठेवण्यासाठी ऊस उत्पादक शेतकरी बांधवांच्या भावनांशी सरकार खेळते आहे. निर्यातमूल्य वाढल्याने व्यापारी बांधवांना कांदा निर्यातीसाठीच्या खर्चात वाढ होणार आहे. त्यामुळे देशांतर्गत विक्र ीस प्राधान्य दिले जाईल. त्यामुळे बाजारभावात कांदा स्वस्त होईल असे गणित असल्याने कांदा निर्यातमूल्य वाढविल्याने कळवणमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.  किरकोळ बाजारातले कांद्याचे दर आणखी वाढू नयेत यासाठी केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर प्रतिटन ८५० डॉलरची ईएमपी अर्थात निर्यातमूल्य आकारण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयामुळे कांदा निर्यातीवर काही प्रमाणात बंधन येणार आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संतप्त झाले असून, गुजरातची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेतला असल्याचे सांगून अप्रत्यक्ष निर्यातबंदी केली असल्याने कांदा उत्पादक शेतकरीचे नुकसान होणार असल्याने निर्यातमूल्य वाढविणे चुकीचे आहे, असे मत कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती धनंजय पवार यांनी व्यक्त केले.  या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकºयांना त्याचा काही प्रमाणात फटका बसू शकतो. या निर्णयामुळे देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याचे भाव स्थिर राहण्यास मदत होईल अशी आशा सरकारला वाटतेय. तर हा निर्णय शेतकरीविरोधी असल्याचे मत शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देवीदास पवार यांनी व्यक्त केले.  यंदा कांद्याचं उत्पादन मुळातच कमी आणि त्या तुलनेत मागणी जास्त असल्याने कांद्याचे बाजारभाव फारसे कमी होणार नाहीत असे कांदा व्यापारी हेमंत बोरसे व सुनील महाजन यांनी सांगितले.   केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने कांद्यावरील किमान निर्यातमूल्य शून्यावरून थेट ८५० डॉलरपर्यंत वाढविण्याचा निर्णय गुरु वारी घेतल्याने गेल्या दोन वर्षांपासून कांद्यावर निर्यातमूल्य आकारले जात नव्हते. मात्र, वाणिज्य मंत्रालयाच्या गुरु वारच्या निर्णयामुळे कांद्याची निर्यात घटणार आहे. त्यामुळे कांद्याचे भाव कोसळण्याची भीती आहे.  - धनंजय पवार, सभापती, कळवण बाजार समितीजनतेला महाग कांदा खरेदी करावा लागू नये यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला असल्याने कांदा उत्पादकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. गेल्या काही दिवसांपासून कांद्याला तेजी आली आहे. काही कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांदा ४४४० रु पये प्रतिक्विंटल भावाने विकला गेला. शेतकरी बांधवांना दोन पैसे मिळू लागल्याने हे सहन झाले नाही.  - रवींद्र देवरे, माजी सभापती, अर्थ समिती, जि. प

टॅग्स :Marketबाजारonionकांदा