शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
2
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
3
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
4
एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही
5
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
6
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
7
'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."
8
घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक
9
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप
10
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
11
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
12
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
13
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
14
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
15
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
16
शू रॅकवर बसल्याने मांजराला नवव्या मजल्यावरून फेकले, आरोपी शेजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
17
‘भारतात मतदार यादी तयार करणे, हे जगात सर्वांत कठीण काम’
18
लोकल लेट का होते? ते शोधा, तरच अपघात कमी होतील, मुंब्रा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संघटनांचे मत
19
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
20
नव्या स्थानकांच्या उभारणीत रेल्वेचा हात आखडताच, नवे ठाणे, चिखलोली, दातीवली, मानस मंदिरसह ३२ स्थानकांचा होता प्रस्ताव

मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे नाशिकरोडवरून रद्द; प्रवाशांचा प्रवास खोळंबला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 17:29 IST

नाशिकरोड रेल्वेस्थानकातून छत्रपती शिवाजी टर्मिनलला जाणा-या पंचवटी, राज्यराणी, गोदावरी एक्सप्रेसदेखील मंगळवारी रद्द केल्या गेल्या. तसेच नंदीग्राम, देवगीरी, शालिमार या एक्सप्रेससुध्दा नाशिकवरून पुढे जाऊ शकल्या नाहीत.

ठळक मुद्देपंचवटी, राज्यराणी, गोदावरी एक्सप्रेसदेखील मंगळवारी रद्द रात्रीपासून नाशिकमार्गे मुंबईत केवळ कृषीनगर एक्सप्रेस पोहचू शकली.मुंबई नाशिक ते भुसावळपर्यंत रेल्वेची कोंडी झाली

नाशिक : मुंबईत झालेल्या अतिवृष्टीमुळे रेल्वेमार्गावर पाणी साचल्याने कसाºयापासून पुढे रेल्वेरू ळ पाण्याखाली गेले होते. त्यामुळे सोमवारी रात्रीपासूनच मध्यरेल्वेची सेवा विस्कळीत झाली. मंगळवारी रात्री आठ वाजेपर्यंत हळुहळु रेल्वे वाहतूक ‘रूळा’वर येईल, असे प्रशासनाने सांगितले.दररोज नाशिकरोड रेल्वेस्थानकातून छत्रपती शिवाजी टर्मिनलला जाणा-या पंचवटी, राज्यराणी, गोदावरी एक्सप्रेसदेखील मंगळवारी रद्द केल्या गेल्या. तसेच नंदीग्राम, देवगीरी, शालिमार या एक्सप्रेससुध्दा नाशिकवरून पुढे जाऊ शकल्या नाहीत. सोमवारी रात्रीपासून नाशिकमार्गे मुंबईत केवळ कृषीनगर एक्सप्रेस पोहचू शकली. तसेच जनता व कृषीनगर एक्सप्रेस मुंबईवरून पुन्हा नाशिकपर्यंत सुरळीत आली. रेल्वेगाड्या रद्द झाल्यामुळे सकाळी नाशिकरोड रेल्वे स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. मुंबईला जाणाºया चाकरमान्यांचे प्रमाण सुटीमुळे नव्हते. दुस-या राज्यातून आलेल्या प्रवाशांचा मात्र नाशिकपासून मुंबईचा पुढील प्रवास खोळंबला. त्यामुळे मंगळवारी सकाळी सात वाजेपासून अकरा वाजेपर्यंत रेल्वेस्थानकार प्रवाशांची गर्दी झाली होती. रेल्वेगाड्यांच्या चौकशीचा भडीमार केंद्रावर दिसून आला. यावेळी चौकशी अधिकारी आणि प्रवाशांमध्ये खटकेही उडाले. मध्य रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने मुंबई नाशिक ते भुसावळपर्यंत रेल्वेची कोंडी झाली. बहुतांश रेल्वेगाड्या साईडट्रॅकला करण्यात आल्या होत्या. काही रेल्वेगाड्या स्थानकाबाहेर उभ्या केल्या गेल्याने प्रवाशांचे हाल झाले. 

टॅग्स :Nashikनाशिकrailwayरेल्वेRainपाऊसMumbai Floodedमुंबईत पावसाचा हाहाकार