शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे नाशिकरोडवरून रद्द; प्रवाशांचा प्रवास खोळंबला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 17:29 IST

नाशिकरोड रेल्वेस्थानकातून छत्रपती शिवाजी टर्मिनलला जाणा-या पंचवटी, राज्यराणी, गोदावरी एक्सप्रेसदेखील मंगळवारी रद्द केल्या गेल्या. तसेच नंदीग्राम, देवगीरी, शालिमार या एक्सप्रेससुध्दा नाशिकवरून पुढे जाऊ शकल्या नाहीत.

ठळक मुद्देपंचवटी, राज्यराणी, गोदावरी एक्सप्रेसदेखील मंगळवारी रद्द रात्रीपासून नाशिकमार्गे मुंबईत केवळ कृषीनगर एक्सप्रेस पोहचू शकली.मुंबई नाशिक ते भुसावळपर्यंत रेल्वेची कोंडी झाली

नाशिक : मुंबईत झालेल्या अतिवृष्टीमुळे रेल्वेमार्गावर पाणी साचल्याने कसाºयापासून पुढे रेल्वेरू ळ पाण्याखाली गेले होते. त्यामुळे सोमवारी रात्रीपासूनच मध्यरेल्वेची सेवा विस्कळीत झाली. मंगळवारी रात्री आठ वाजेपर्यंत हळुहळु रेल्वे वाहतूक ‘रूळा’वर येईल, असे प्रशासनाने सांगितले.दररोज नाशिकरोड रेल्वेस्थानकातून छत्रपती शिवाजी टर्मिनलला जाणा-या पंचवटी, राज्यराणी, गोदावरी एक्सप्रेसदेखील मंगळवारी रद्द केल्या गेल्या. तसेच नंदीग्राम, देवगीरी, शालिमार या एक्सप्रेससुध्दा नाशिकवरून पुढे जाऊ शकल्या नाहीत. सोमवारी रात्रीपासून नाशिकमार्गे मुंबईत केवळ कृषीनगर एक्सप्रेस पोहचू शकली. तसेच जनता व कृषीनगर एक्सप्रेस मुंबईवरून पुन्हा नाशिकपर्यंत सुरळीत आली. रेल्वेगाड्या रद्द झाल्यामुळे सकाळी नाशिकरोड रेल्वे स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. मुंबईला जाणाºया चाकरमान्यांचे प्रमाण सुटीमुळे नव्हते. दुस-या राज्यातून आलेल्या प्रवाशांचा मात्र नाशिकपासून मुंबईचा पुढील प्रवास खोळंबला. त्यामुळे मंगळवारी सकाळी सात वाजेपासून अकरा वाजेपर्यंत रेल्वेस्थानकार प्रवाशांची गर्दी झाली होती. रेल्वेगाड्यांच्या चौकशीचा भडीमार केंद्रावर दिसून आला. यावेळी चौकशी अधिकारी आणि प्रवाशांमध्ये खटकेही उडाले. मध्य रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने मुंबई नाशिक ते भुसावळपर्यंत रेल्वेची कोंडी झाली. बहुतांश रेल्वेगाड्या साईडट्रॅकला करण्यात आल्या होत्या. काही रेल्वेगाड्या स्थानकाबाहेर उभ्या केल्या गेल्याने प्रवाशांचे हाल झाले. 

टॅग्स :Nashikनाशिकrailwayरेल्वेRainपाऊसMumbai Floodedमुंबईत पावसाचा हाहाकार