शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

महिला बचत गटाची खिचडी शिजेल? 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 19:06 IST

नाशिक महापालिकेच्या सेंट्रल किचनमधून विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाची खिचडी देण्याची बाब उघडकीस आल्यानंतर या योजनेतील एकामागोमाग एक त्रुटी उघडकीस येऊन ठेकेदाराने या योजनेआड किती व कसे खिसे भरण्याचे पराक्रम केले त्याचे किस्से चवीने चघळले जात

ठळक मुद्दे शासनानेच या योजनेच्या अंमलबजावणीत त्रुटी ठेवल्यायोजनेची अंमलबजावणी करणा-या ठेकेदारांनी या योजनेचे वाटोळे केले.

श्याम बागुलअंगणवाड्यांतील बालके व शासकीय शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची गळती रोखण्यासाठी राबविल्या जात असलेल्या विद्यार्थी मध्यान्ह भोजन पुरविण्याच्या शासनाच्या योजनेचे आजवर तीन तेराच वाजत आले आहेत. परिणामी शासनाने या योजनेच्या अंमलबजावणीत प्रत्येक वेळी बदल करून नवनवीन प्रयोग केले. अशा अनेक प्रयोगांतूनही नेहमीच या योजनेचे अपयश समोर आले. त्यात कधी कधी शासनानेच या योजनेच्या अंमलबजावणीत त्रुटी ठेवल्या तर कधी कधी या योजनेची अंमलबजावणी करणाºया ठेकेदारांनी या योजनेचे वाटोळे केले. तरीदेखील दरवेळी नवीन प्रयोग करण्याचे थांबलेले नाही. नाशिक महापालिकेने महिला बचत गटांकडून मध्यान्ह भोजन योजना काढून ती सेंट्रल किचन असलेल्या खासगी ठेकेदारांना चालवायला दिली. महिना उलटत नाही तोच या योजनेचे वास्तव समोर आले आहे. जिल्ह्यातील अंगणवाड्यांतील बालकांसाठी एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत पोषण आहार पुरविणा-या ठेकेदाराच्या करामती पाहून सर्वोच्च न्यायालयाने आता महिला बचत गटामार्फत अंगणवाड्यांतील बालकांसाठी पोषण आहार देण्याचे निर्देश दिले आहेत. महापालिका व जिल्हा परिषदेने पोषण आहाराच्या योजनेसाठी नवीन प्रयोग करण्याचे हातात घेतले असले तरी, यापूर्वीचा अनुभव लक्षात घेता, नवीन निर्णयानुसार या योजनेची अंमलबजावणी व त्याची उपयोगिता सिद्ध व्हावी.

नाशिक महापालिकेच्या सेंट्रल किचनमधून विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाची खिचडी देण्याची बाब उघडकीस आल्यानंतर या योजनेतील एकामागोमाग एक त्रुटी उघडकीस येऊन ठेकेदाराने या योजनेआड किती व कसे खिसे भरण्याचे पराक्रम केले त्याचे किस्से चवीने चघळले जात असल्यामुळे ज्या कारणावरून महिला बचत गटांकडून मध्यान्ह भोजनाचा ठेका काढून घेण्यात आला. त्याचीच पुनरावृत्ती सेंट्रल किचन चालविणाºया ठेकेदाराने केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे आता पुन्हा महिला बचत गटांनाच त्याचे काम देण्याचे घाटत आहे. जिल्हा परिषदेच्या एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गतदेखील राज्यस्तरीय ठेकेदाराला दूर सारून महिला बचत गटांच्या माध्यमातून अंगणवाडीतील बालकांना पोषण आहार देण्याची प्रक्रिया राबविली जात आहे. त्यामागे शासनाकडून विद्यमान ठेकेदारांवर अविश्वास दर्शविण्यात आला असला तरी, महिला बचत गटांना पुन्हा ठेका देताना त्यासाठी ज्या काही अटी, शर्ती घालण्यात आल्या ते पाहता शासनाला खरोखर या योजनेतील त्रुटी दूर करून बालकांना पोषण आहार खाऊ घालायचा आहे काय असा प्रश्न निर्माण होतो. ठेकेदारांना डोळ्यासमोर ठेवूनच या योजनेची अंमलबजावणी व नियमावली तयार करण्यात आल्याने त्यासाठी ग्रामीण भागातील अत्यल्प उत्पन्नगटातील महिला बचत गटांना खरोखरच त्यासाठी पात्र ठरू शकतील याविषयी शंका उत्पन्न होईल, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे एकीकडे महिला बचत गटांना अशा प्रकारचे ठेके देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा देखावा उभा करायचा व दुसरीकडे त्या पात्रच ठरणार नाही याची पुरेपूर काळजी घ्यायची अशी दुहेरी नीती शासनातील अधिकारी राबवित आहेत. अर्थातच त्यामागे त्यांचे ठेकेदारांशी असलेले साटेलोटे लपून राहिलेले नाही. अशाच साटेलोट्यातून या योजनांचे ठेकेदारांनी मातेरे केले म्हणून शासन नवनवीन प्रयोग करीत असून, आता महिला बचत गटांना ठेका देण्याचे घाटत आहे. मात्र योजना राबविणाºया शासकीय यंत्रणेची ठेकेदारधार्जिणी मानसिकता लक्षात घेता फार दिवस महिला बचत गटांची खिचडी ते शिजू देतील याची शाश्वती दिसत नाही.

टॅग्स :Governmentसरकारnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका