शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

बस सुरू झाल्याने आदिवासी मुलींची पायपीट थांबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2019 5:41 PM

पेठ : शालेय शिक्षण पुर्ण करण्यासाठी राहत्या गावापासून दहा- पंधरा कि मी पायपीट करून शिक्षण घेणाऱ्या आदिवासी सावित्रीच्या लेकींची पायपीट समग्र शिक्षा अभियान मानव विकास उपक्र मामुळे थांबली असून अतिदुर्गम अशा पाहुचीबारी परिसरातील सात ते आठ गावातील शाळकरी मुलींची सोय झाली आहे.

पेठ : शालेय शिक्षण पुर्ण करण्यासाठी राहत्या गावापासून दहा- पंधरा कि मी पायपीट करून शिक्षण घेणाऱ्या आदिवासी सावित्रीच्या लेकींची पायपीट समग्र शिक्षा अभियान मानव विकास उपक्र मामुळे थांबली असून अतिदुर्गम अशा पाहुचीबारी परिसरातील सात ते आठ गावातील शाळकरी मुलींची सोय झाली आहे.पेठ तालुक्याच्या उत्तरेकडील पाहुचीबरी, म्हसगण, आंबे या मोठ्या गावांना माध्यमीक व उच्च माध्यमीक शिक्षणाची सुविधा असून या शाळांमध्ये तोरणमाळ, आंबे, शिवशेत, मोहदांड, करंजखेड, वीरमळ, घाटाळबारी, जाहुले आदी गावातील विद्यार्थी पायपीट करत शाळा गाठत असतात. शिक्षण विभागाच्या समग्र शिक्षा अभियानातून फक्त मुलींसाठी मोफत बसची व्यवस्था करण्यात आली असून आता या मार्गावरून बस धावणार असल्याने शेकडो मुलींची पायपीट थांबणार आहे. शुक्र वारी पाहुचीबारी येथे प्रथमत: बसचे दर्शन झाल्याने मुख्याध्यापक अनिल देवरे, सरपंच सावित्री पाडवी, पोलीस पाटील अशोक मोरे यांचे सह विद्यार्थ्यांनी चालक - वाहकांचा सत्कार केला.पंचायत समिती सभागृहात झालेल्या मुख्याध्यापक आढावा बैठकीत या मार्गावर मानव विकास ची बस सुरू करावी अशी मागणी करण्यात आली होती. सभापती पुष्पा गवळी, उपसभापती तुळशिराम वाघमारे, सदस्य विलास अलबाड, माजी उपसभापती महेश टोपले आदींनी परीवहन मंडळाशी संपर्क साधून बस सुरू करण्याबाबत सुचीत केले.केवळ दळणवळणाची सुविधा नसल्याने अनेक मुलींवर शाळाबाह्य होण्याची वेळ आली असून मानवविकास सारख्या महत्वकांक्षी प्रकल्पामुळे आदिवासी मुली शिक्षणाच्या प्रवाहात टिकून असल्याची प्रतिक्रि या पालक व शिक्षकांनी व्यक्त केली.

टॅग्स :Socialसामाजिक