शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
3
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
4
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
6
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
7
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
8
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
9
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
10
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
11
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
12
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
13
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
14
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
15
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
16
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
17
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
18
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
19
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
20
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली

नेहरूनगर वसाहतीत वाहन जळीतकांड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 01:17 IST

नेहरूनगर येथील सीआयएसएफ वसाहतीत अज्ञात समाजकंटकाने सीआयएसएफच्या दोन जवानांच्या दुचाकी सोमवारी पहाटे पेटवून दिल्याने त्या आगीत जळून खाक झाल्या.

नाशिकरोड : नेहरूनगर येथील सीआयएसएफ वसाहतीत अज्ञात समाजकंटकाने सीआयएसएफच्या दोन जवानांच्या दुचाकी सोमवारी पहाटे पेटवून दिल्याने त्या आगीत जळून खाक झाल्या. सीआयएसएफ वसाहतीत गेल्या काही महिन्यांत तिसऱ्यांदा वाहन जळीतकांडाची घटना घडल्याने सीआयएसएफ वसाहतीच्या सुरक्षितेचा प्रश्न निर्माण झाला आहे.नेहरूनगर सीआयएएफ वसाहतीतील टाइप -२ ए क्वार्टरमध्ये जवान संदीप विश्रांत पानवळ (३९) व मंगल आनंदराव पाटील हे राहण्यास असून, त्यांच्या दुचाकी इमारतीखाली नेहमीप्रमाणे लावल्या होत्या. सोमवारी (११ मार्च) पहाटे ४ वाजेच्या सुमारास अज्ञात समाजकंटकाने पानवड यांची ड्रीम युगा (एमएच ५० जी ०४८५) व पाटील यांची होंडा शाईन (सीजी ०७ एलडब्ल्यू ०१८९) या दोन्ही दुचाकीवर काहीतरी ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून देण्यात आल्या. काही वेळातच आजूबाजूच्या रहिवाशांना दुचाकींना आग लागल्याचे निदर्शनास येताच सर्वांनी घटनास्थळी धाव घेऊन दुचाकीला लागलेली आग विझवली. मात्र तोपर्यंत दोन्ही गाड्या आगीत जळून खाक झाल्या होत्या.वाहन जळीताची तिसरी घटनानेहरूनगर सीआयएसएफच्या नियंत्रण कक्ष मोटार परिवहन विभागात गेल्या १२ आॅक्टोबर २०१८ रोजी अचानक लागलेल्या आगीत सीआयएसएफच्या क्वॉलिस व मार्शल जीपचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर गेल्या २ जानेवारी २०१९ रोजी पहाटे सीआयएसएफच्या वसाहतीत दोन-तीन ठिकाणी नऊ दुचाकींवर ज्वलनशील पदार्थ टाकून त्या पेटवून देण्यात आल्या होत्या. या दोन्ही घटनेचा अद्याप उलगडा झालेला नाही.दुचाकीला लागलेल्या आगीच्या ज्वालांमुळे इमारतीच्या तळ मजल्यावरील वीजमीटरदेखील जळाले आहेत. याबाबत सीआयएसएफ जवान संदीप पानवळ यांनी उपनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात संशयिताविरोधात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Fairजत्राNashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी