शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
14
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
15
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
16
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
17
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
18
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
19
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
20
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?

शॉर्टसर्किटमुळे तीन एकर ऊस जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 9:05 PM

सायखेडा : निफाड तालुक्यातील पिंपळस रामाचे येथे बाणगंगा नदीच्या किनाऱ्यावर असणाऱ्या शिवारात डीपीमध्ये अचानक शॉर्टसर्किट झाल्याने सुमारे साडेतीन एकर ...

ठळक मुद्देपिंपळस : वीज वितरणचा हलगर्जीपणा शेतकऱ्यांच्या जीवावर

सायखेडा : निफाड तालुक्यातील पिंपळस रामाचे येथे बाणगंगा नदीच्या किनाऱ्यावर असणाऱ्या शिवारात डीपीमध्ये अचानक शॉर्टसर्किट झाल्याने सुमारे साडेतीन एकर ऊस जळून खाक झाला. यामध्ये शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून वीज वितरण कंपनीने याची तात्काळ दखल घेऊन पंचनामे करावे आणि नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.                 रेणुका दर्शन केंगे यांचा ग. नं. ६५१/१ ऊस क्षेत्र ६५ गुंठे, तर बाळासाहेब सुरवाडे ग.नं. ६५२ क्षेत्र २ एकर जळून खाक झाला. बाणगंगा नदीच्या खोऱ्यात काळी कसदार जमीन, मुबलक पाणी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात ऊस लागवड क्षेत्र आहे. याच परिसरातून कूपनलिकाद्वारे इतर गावांतील शेतीसाठी उचल पाणी नेण्यात आले आहे.

                       या भागात विहीर आणि नदीच्या काठावर अनेक विद्युत पंप असल्यामुळे ताराचे जाळे पसरलेले आहे. तारा जीर्ण झाल्यामुळे खाली आल्या आहेत. शिवाय, अनेक रोहित्रांवर जुने फ्युज आणि इतर सामान असल्यामुळे अनेकदा शार्टसर्किट होते. बुधवारी अचानक उसातून धूर आणि ज्वाळा बाहेर पडू लागल्या. तेव्हा परिसरातील शेतकरी जमा झाले. मात्र, आगीची दाहकता जास्त असल्यामुळे आग आटोक्यात आणता आली नाही. ऊस आणि उसाचे पाचट लवकर पेट घेते. त्यामुळे ज्वलनशील पदार्थ जवळ असल्यामुळे आग आटोक्यात आली नाही. शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर वर्ष भर सांभाळून ठेवलेला ऊस जळून खाक झाला.शेतकऱ्यांचे लाखो रुपये आगीत भस्मसात झाले. शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

टॅग्स :Fairजत्राagricultureशेती