शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

ग्रामीण भागातुन बैलगाडी ऊस वाहतूक नामशेष होण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 15:58 IST

लखमापूर : आधुनिक युगाचा अनेक क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात प्रभाव सध्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे पारंपरिक काही गोष्टी नामशेष होण्याच्या मार्गावर दिसत आहे.

ठळक मुद्देलखमापूर : यंत्रिकी साधनांचा मोठ्या प्रमाणांवर वाहतुकीसाठी होतोय उपयोग

लखमापूर : आधुनिक युगाचा अनेक क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात प्रभाव सध्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे पारंपरिक काही गोष्टी नामशेष होण्याच्या मार्गावर दिसत आहे.सध्याचे युग गतिमान झाल्यामुळें प्रत्येक ठिकाणी कमी वेळेत जास्त काम कसे होईल. यावर जास्त प्रमाणात भर असते. अशाच एका प्रकारात वेळेची बचत करण्यासाठी चालु स्थितीतील साखर कारखान्यांनी वेळेची बचत व ऊस वाहतूक लवकरात लवकर कशी होईल. तसेच कोणत्याही शेतकरी वर्गाचा ऊस शेतात जास्त दिवस उभा राहू नये,यासाठी ट्रक, टँक्कटर आदी वाहनांच्या सहाय्याने ऊस वाहतूक केली जाते.पुर्वी ऊस वाहतूक करण्यासाठी बैलगाडीचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जात होता. तेव्हा परिसरात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर होते. बैलगाडी ऊस वाहतूक साधारणपणे पंधरा किलोमीटरच्या आत राहायची. त्यासाठी बैलगाडी ऊस ट्रेंडर काढुन ते ऊस वाहतुकीला दिले जात होते.परंतु आता बाहेरील ऊस पुरवठा क्षेत्र वाढल्याने जास्त किलोमीटर वरुन बैलगाडी वाहतूक करू शकत नाही. म्हणून लांब पल्ल्याची ऊस वाहतूक शेवटी साखर कारखान्यांना आधुनिकरणाकडे वळून यांत्रिकी साधनांचा उपयोग करावा लागला. त्यामुळे बैलगाडी वाहतूकीचे कमी प्रमाण झाले.आता बाजारपेठेत बैल जोडी खरेदी करण्यासाठी मोठे भांडवल लागते. त्यासाठी कर्ज घ्यावे लागते. सध्या काही कारखाने बंद असल्याने पुर्वी चे काही बिले बंद पडलेल्या साखर कारखान्याकडे आटकलेल्या असल्याने काही अंशी आता उसतोड कामगार या कामांकडे कानाडोळा करीत आहे. त्यामुळे पुर्वी ज्या साखर कारखान्याकडे उदा. १०० बैलगाडी ऊसवाहतुकीसाठी असायच्या त्या कारखान्याकडे आता ऊस वाहतुकीसाठी फक्त ३० ते ३५ बैलगाडी उपलब्ध आहे. त्याच्या आता ट्रक, ट्रॅक्टर, यांत्रिकी ऊस तोड मशीन यामुळे वेळेची बचत व ऊस लवकर तोडला जातो. व कमी वेळेत कारखाना स्थळांवर लवकर जातो. या गोष्टीमुळे सध्या बैलगाडीवरील ऊसवाहतुक नामशेष होण्याच्या मार्गावर दिसत आहे.१) पुर्वी ग्रामीण भागातून ऊसांची भरलेले बैलगाडी रस्त्याने चालली तर लहान मुले ऊस ओढण्यासाठी एकच गर्दी करायचे व बैलगाडीतून ऊस ओढायचे परंतु आता हे चित्र दिसत नाही.२) खडतर परिश्रम, रस्त्याची खराबी, बैलगाडी खरेदीसाठी भांडवलाचा तुटवडा, यामुळे या व्यवसायाला काहींनी राम राम ठोकला आहे. (२४ लखमापूर)

टॅग्स :agricultureशेतीSugar factoryसाखर कारखाने