शहरं
Join us  
Trending Stories
1
पाथर्डीत मतदान कर्मचाऱ्यांकडेच सुजय विखे पाटील यांची प्रचार पत्रके, ग्रामस्थांचा आक्षेप
2
निकालानंतर पुन्हा भाजपासोबत जाणार का?; राऊतांचा प्रश्न अन् उद्धव ठाकरेंचं सडेतोड उत्तर
3
मतदारयादीत नाव त्यांचेच पण आडनाव दुसऱ्याचे; सकाळीच रांगेत आलेले पती-पत्नी मतदानाला मुकले
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates :राज्यात निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 6.45 टक्के मतदान झाले
5
Panchayat 3 ची झलक बघायची आहे? 'या' दिवशी रिलीज होणार सीरिजचा ट्रेलर
6
Tata Motors चे शेअर्स जोरदार आपटले, ८ टक्क्यांची घसरण; Q4 निकालांमुळे गुंतवणूकदार नाराज
7
मध्य रेल्वे: ठाणे-कळवा स्थानकादरम्यान लोकल १ तासाहून अधिक वेळ थांबलेली; सहा मार्ग झालेले बंद
8
शिंदे कट्टर शिवसैनिक, ते बंड करणारे नव्हते, पण...; देवेंद्र फडणवीसांनी पडद्यामागचं राजकारण सांगितलं
9
Success Story: ₹८५० च्या पगारावरून ₹५५,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, नशीब बदलणाऱ्या उद्योजकाची कहाणी
10
पुण्यात पैसे वाटल्याचा धंगेकरांचा आरोप, मुरलीधर मोहोळांचे सडेतोड उत्तर; म्हणाले...
11
मृणाल दुसानीस इंडस्ट्रीत करणार कमबॅक?; सिनेकरिअरविषयी दिली मोठी हिंट
12
छत्रपती संभाजीनगरमध्ये २५ ईव्हीएम बंद पडली, परळीतही गोंधळ; टक्केवारीवर परिणाम
13
"उद्धव ठाकरेंचं स्वत:चं मेटावर्स जग, त्या जगाचे राजे तेच, नियमही त्यांचेच..."
14
Stock Market Opening Bell: Sensex-Nifty वर विक्रीचा दबाव, बाजार उघडताच गुंतवणूकदारांचे ₹४७.५ हजार कोटी बुडाले
15
"भर उन्हाळ्यात 'नगर दक्षिणे'त पैशांची धुवांधार बरसात"; पैसे वाटपावरून विखे - लंके यांच्यात जुंपली
16
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीचा अपघातात मृत्यू, बसने कारला धडक दिली अन्...
17
राज ठाकरेंच्या राजकारणाचा शेवट, आग लावण्याची कामं बंद करा; जितेंद्र आव्हाड संतापले
18
NPS: Retirement वर पाहिजेय ₹२ लाखांचं Pension? पाहा तुम्हाला किती करावी लागेल गुंतवणूक
19
भारतासोबत पंगा महागात पडला! मालदीवकडे विमाने आणि हेलिकॉप्टर उडवण्यासाठी वैमानिक नाहीत
20
राज ठाकरेंनी ज्याची सुपारी घेतली, त्याची वाजवावी तर लागेलच! जयंत पाटलांनी काढला फडणवीसांचा जुना व्हिडीओ

आठ लाखांच्या थकबाकीमुळे पिंपळगावच्या बीएसएनएलचा वीजपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 1:17 PM

पिंपळगाव बसवंत - गेल्या कित्येक दिवसांपासून पिंपळगाव शहरातील मोबाईल नेटवर्करची बत्ती गुल्ल झाल्याने आपण ज्या व्यक्तीशी संपर्क साधत आहे.तो ...

पिंपळगाव बसवंत - गेल्या कित्येक दिवसांपासून पिंपळगाव शहरातील मोबाईल नेटवर्करची बत्ती गुल्ल झाल्याने आपण ज्या व्यक्तीशी संपर्क साधत आहे.तो नंबर अस्तित्वातच नाही. अशा उत्तराने पिंपळगावचे नागरिक परेशान झाले आहे. फोन केला की नॉट रिचेबल सारख्या उत्तराने पिंपळगावकर हैराण झाले आहे.याबद्दल चौकशी केली असता बीएसएनएल कंपनीने महावितरण विभागाचे बिलच भरले नसल्याने या टॉवरची वीज खंडित केली असल्याचा प्रकार उघडीस आल्याने बीएसएनएल कंपनीच्या नेटवर्कवर अवलंबून असलेल्या ग्राहकांना नेटवर्कच अस्तित्वात नसल्याचा धक्काच बसला आहे.महावितरणकडून पिंपळगाव बसवंत येथील आठ बीएसएनएल टी.डी टॉवरचा वीजपुरवठा बंद करण्यात आला असून यामुळे या टॉवरवरून सुरू असलेली नेटवर्क सेवादेखील ठप्प झाल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. महावितरणकडून थकीत वीजबील ग्राहकांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. यामध्ये सरकारी विभागांचादेखील समावेश आहे. पिंपळगावमधील बीएसएनएलच्या टी.डी टॉवरला आठ वीजमीटर होते .त्यांचे तब्बल ७ लाख ८३ हजार एवढे वीज बिल भरण्यात आलेले नाही. त्यामुळे महावितरणकडून टॉवरसाठी लावण्यात आलेले वीजमीटरच बंद करण्यात आले आहेत.याबाबत बीएसएनएलला संपर्क केला असता बीएसएनएलच्या कार्यालयीन कामकाजाचा निधी दिल्ली आणि मुंबई कार्यालयातून होते. निधी येताच आम्ही वीजबिल भरणार आहोत. दोन्ही सेवा सरकारी आहेत. आम्ही महावितरणशी समन्वय साधण्याचा प्रयत्न करीत आहोत. महावितरण विभागाकडून सिंगल फेज वीज जोडणी मिळाल्यास परिसरातील इंटरनेट सेवा सुरळीत करता येईल, असे सांगितले जात आहे.--बीएसएनएलकडून आठ वीजमीटरचे मिळून ७ लाख ८३ हजार रु पये एवढे वीजबिल थकीत आहे. ही थकबाकी २०१८ ते १९ या कालावधीतील आहे. त्यामुळे महावितरणकडून कारवाई करण्यात आली आहे. थकीत वीजबिल भरल्यास वीजपुरवठा सुरळीत केला जाईल.- गायत्री गावित, सहाय्यक अकाऊंट , महावितरण विभाग.....................................बीएसएनएल वीज पुरवठा बंद केल्यामुळे तसेच महावितरण विभागाचे त्या संबंधित ट्रॉवरचे वीज बिल थकले असल्याने त्या परिसरातील नेटवर्क बंद आहे. आम्ही या बाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्र ार केली असून नेटवर्क लवकरात लवकर चालू करण्याचा प्रयत्न करत आहोत.-वर्षा भंगाळे, बीएसएनएल अधिकारी.............................जर ग्राहकांकडून मोबाईलचे बिल वेळेवर भरले जातात मग त्यांना योग्य नेटवर्कची सेवा का पुरवली जात नाही. ‘रेंज न मिळणे व सतत नेटवर्क ‘इमर्जन्सी कॉल्स ओन्ली’ अशा मोडवर जाणे. इंटरनेट स्पीड नसणे किंवा मध्येच इंटरनेट बंद होणे, हा सुद्धा पिंपळगाव मध्ये नेटवर्कचा सर्वात मोठा त्रास गेल्या कित्येक दिवसापासून आहे.-राजा बुब, त्रस्त नागरिक, पिंपळगाव बसवंत 

टॅग्स :Nashikनाशिक