शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

धनोली धरणाचे गेट तोडून पाणीचोरीचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 18:17 IST

दळवटच्या चौघांना अटक, गुन्हा दाखल

ठळक मुद्देधनोली गावात रात्रभर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते

पाळे खुर्द :  दुष्काळाची धग दिवसेंदिवस वाढत चालली असतानाच आता पाण्याच्या चोरीच्याही घटना घडू लागल्या आहेत. नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील धनोली येथील धरणाचे गेट तोडल्याची घटना घडली असून त्यामुळे धरणातील सुमारे सात ते आठ दसलक्षघनफूट इतके पाणी वाया गेले आहे. धरणाचे गेट तोडणाऱ्या दळवट येथील चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्र वारी (दि.१७) सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान धनोली धरणाचे लोखंडी गेट तोडण्यात आल्यानंतर धरणातून अचानक पाण्याचा प्रचंड असा लोंढा सुटल्याने धरणाच्या बाजूस शेतात काम करीत असलेल्या आदिवासी शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली. शेतक-यांनी लगोलग गेटकडे धाव घेतली असता तेथे चार इसम संशयास्पद स्थितीत आढळले. शेतक-यांनी संबंधित इसमांना पकडले आणि धनोली गावातील मंदिरात त्यांना कोंडून ठेवले. या इसमांनी चौकशी केली असता ते चौघेही दळवट येथील रहिवाशी निघाले. हि बातमी पसरताच धनोली गावात रात्रभर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याची कुणकुण प्रशासकीय यंत्रणेला लागताच संपूर्ण यंत्रणा धनोली गावात रात्री नऊ वाजेच्या सुमारास हजर झाली. कळवणचे तहसीलदार बंडू कापसे तसेच पोलीस उपअधीक्षक सदाशिव वाघमारे यांचेसह अभोणा पोलीस उपनिरीक्षक गायकवाड व पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता अभिजित रौंदळ हे घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर सदर तणावपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान,ल धरणाचे गेट तोडणारे दळवट येथील प्रमोद बयाजी पवार (६०), सोनू बंडू गावित(६०), शंकर केवजी चव्हाण (५५) आणि सुभाष येवाजी पवार (६०) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान म्हणून कलम ३ व ७ अन्वये नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी(दि.१९) सदर आरोपींना न्यायालयात हजर केले जाणार आहे.

टॅग्स :NashikनाशिकDamधरण