शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

ग्रंथ प्रदर्शनातील स्टॉल्सचे२५ मार्चला लॉटरीने वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:14 IST

नाशिक : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ग्रंथ प्रदर्शनातून किमान ५ ते ६ कोटींची पुस्तकविक्री होण्याची आयोजकांना अपेक्षा आहे. ...

नाशिक : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ग्रंथ प्रदर्शनातून किमान ५ ते ६ कोटींची पुस्तकविक्री होण्याची आयोजकांना अपेक्षा आहे. त्यासाठी उभारण्यात आलेल्या स्टॉल्सना प्रकाशक आणि विक्रेत्यांचा चांगला प्रतिसाद लाभत असून १५ मार्चपर्यंत स्टॉल बुकिंगची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तर २५ मार्चला स्टॉल्सचे लॉटरी पद्धतीने वाटप करण्यात येणार असल्याचे आयोजकांतर्फे कळविण्यात आले आहे.

साहित्य संमेलनात अधिकाधिक स्टॉल्सची नोंदणी होऊन नागरिकांना लाखो पुस्तके एकाच ठिकाणी पहायला आणि विकत घ्यायला मिळावीत, यासाठी मोठ्या प्रमाणावर गाळ्यांची आखणी व रचना केलेली आहे. या प्रदर्शनामध्ये भाग घेण्यासाठी आतापर्यंत महाराष्ट्राच्या विविध भागात मिळून ८० प्रकाशक व पुस्तक विक्रेते यांनी मिळून १२१ गाळे आरक्षित केले आहेत. त्याखेरीज रोज या संदर्भात संमेलन कार्यालयात विचारणा होत आहे. साहित्य संमेलन नियोजित तारखेलाच करण्याच्या दृष्टीने ग्रंथ प्रदर्शन समितीचे काम सुरु आहे. ग्रंथ प्रदर्शनासाठी स्टॉल बुकिंग केलेल्या नागरिकांना २५ मार्चला लॉटरी पद्धतीने या गाळ्यांचे वाटप करण्यात येणार आहे. एका व्यक्तीस , संस्थेस जास्तीत जास्त चारच गाळे मिळणार आहेत. तसेच गाळेधारकांसाठी मार्गदर्शक तत्वे व नियमही निश्चित केलेले आहेत. प्रदर्शनाच्या स्टॉल्सबाबत झालेल्या चर्चेमध्ये सी.एल. कुलकर्णी, नीलिमा अमृतकर, दीप्ती जोशी, विद्या जुन्नर मिलिंद बाबर, मुक्ता बालिगा, पंकज क्षेमकल्याणी, हेमंत देशमुख यांनी भाग घेतला होता. समिती प्रमुख वसंत खैरनार यांनी स्वागत केले व संमेलन कार्यालयाचे प्रमुख दिलीप साळवेकर यांनी मार्गदर्शन केले. दरम्यान संमेलनातील दहा प्रकारच्या कामांच्या निविदादेखील काढण्यात आल्याचे संमेलनाच्या निमंत्रकांच्या वतीने कळविण्यात आले आहे.