शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
2
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
3
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
4
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
5
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
6
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
7
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
8
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
9
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
10
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
11
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
12
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
13
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
14
जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
15
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
16
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
17
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
18
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
19
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
20
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला

गाभ्रीच्या पावसाची ती ‘काळरात्र’ आजही खामखेडावासियांच्या स्मरणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 16:09 IST

फ्लॅशबॅक : पाच वर्षांपूर्वी गारपीटीने उडविली होती दाणादाण. आठवणींनी उडतो थरकाप

ठळक मुद्देबुजुर्गांनी त्यांच्या हयातीत असा गारांचा पाऊस पाहिला नव्हता. खामखेडा, भऊर, विठेवाडी, सावकी, बेज, भादवण, पिळकोस, बगडू, लोहणेर आदी गावांमधील कांदा, डाळिंब , गहू , हरभरा, कोबी, मिरची , कांद्याचे डोंगळे, टोमाटो आदि पिकांचे शंभर टक्के नुकसान या गाभ्रीच्या पावस

दिनकर आहेर, खामखेडा : ९ मार्च २०१४ ची रात्रीची नऊ वाजेची वेळ होती. दक्षिणेकडून राक्षसी पावलाने घोंगावत आलेल्या गाभ्रीच्या पावसाने अक्षरश: कहर केला आणि अवघ्या नऊ ते दहा मिनिटांत खामखेडासह पंचक्रोशीतील शेतातील उभी पिके भुईसपाट झाली होती. शेतजमिनीवर पाव ते अर्धा फूट साचलेल्या बर्फाच्या थराने शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडा केला होता. शनिवारी (दि.९) या घटनेला बरोबर पाच वर्षे लोटली आहेत. मात्र, ९ मार्च उजाडला की आजही या घटनेच्या आठवणींनी शेतकऱ्यांचा थरकाप उडतो.पाच वर्षापूर्वी ९ मार्च २०१४ रोजी रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास खामखेडा या गावावर निसर्ग कोपला. वादळी वा-यासह झालेल्या गारांच्या पावसाने कळवण व देवळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांना अक्षरश भुइसपाट केले. बुजुर्गांनी त्यांच्या हयातीत असा गारांचा पाऊस पाहिला नव्हता. खामखेडा, भऊर, विठेवाडी, सावकी, बेज, भादवण, पिळकोस, बगडू, लोहणेर आदी गावांमधील कांदा, डाळिंब , गहू , हरभरा, कोबी, मिरची , कांद्याचे डोंगळे, टोमाटो आदि पिकांचे शंभर टक्के नुकसान या गाभ्रीच्या पावसाने केले होते. पोटच्या मुलाप्रमाणे खर्च करून जपलेला कांदा हातात येण्याऐवजी भुइसपाट झाल्याने शेतक-यांच्या डोळ्यात अश्रूंचा महापूर दाटला होता. दीड ते दोन तास वादळी पाउस व अर्धा किलोच्या वजनाच्या गारेने आंब्याबरोबरच रब्बी पिकांचे अतोनात नुकसान केले होते. ही गारपीट इतकी भयानक होती, की दोन दिवस शेतातील गारांचा थर वितळला नव्हता. आजही या घटनेच्या नुसत्या विचाराने शेतक-यांचा थरकाप उडतो.यंदा दुष्काळी स्थितीपाच वर्षांपूर्वी झालेला हा गाभ्रीचा पाऊस आजही शेतक-यांसह गावक-यांना आठवतो. गावाने पहिल्यांदाच अशी भयानक नैसर्गिक आपत्ती अनुभवली होती. त्यामुळे मार्च महिना आला की गावातील शेतक-यांना त्या काळरात्रीच्या आठवणींनी थरकाप उडतो. या घटनेमुळे जे नुकसान झाले, त्यातून आजही अनेक शेतकरी कुटुंबे सावरलेली नाहीत. यंदाही परिसरात दुष्काळ सदृश परिस्थिती आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग चिंतेत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक