शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

गाभ्रीच्या पावसाची ती ‘काळरात्र’ आजही खामखेडावासियांच्या स्मरणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 16:09 IST

फ्लॅशबॅक : पाच वर्षांपूर्वी गारपीटीने उडविली होती दाणादाण. आठवणींनी उडतो थरकाप

ठळक मुद्देबुजुर्गांनी त्यांच्या हयातीत असा गारांचा पाऊस पाहिला नव्हता. खामखेडा, भऊर, विठेवाडी, सावकी, बेज, भादवण, पिळकोस, बगडू, लोहणेर आदी गावांमधील कांदा, डाळिंब , गहू , हरभरा, कोबी, मिरची , कांद्याचे डोंगळे, टोमाटो आदि पिकांचे शंभर टक्के नुकसान या गाभ्रीच्या पावस

दिनकर आहेर, खामखेडा : ९ मार्च २०१४ ची रात्रीची नऊ वाजेची वेळ होती. दक्षिणेकडून राक्षसी पावलाने घोंगावत आलेल्या गाभ्रीच्या पावसाने अक्षरश: कहर केला आणि अवघ्या नऊ ते दहा मिनिटांत खामखेडासह पंचक्रोशीतील शेतातील उभी पिके भुईसपाट झाली होती. शेतजमिनीवर पाव ते अर्धा फूट साचलेल्या बर्फाच्या थराने शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडा केला होता. शनिवारी (दि.९) या घटनेला बरोबर पाच वर्षे लोटली आहेत. मात्र, ९ मार्च उजाडला की आजही या घटनेच्या आठवणींनी शेतकऱ्यांचा थरकाप उडतो.पाच वर्षापूर्वी ९ मार्च २०१४ रोजी रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास खामखेडा या गावावर निसर्ग कोपला. वादळी वा-यासह झालेल्या गारांच्या पावसाने कळवण व देवळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांना अक्षरश भुइसपाट केले. बुजुर्गांनी त्यांच्या हयातीत असा गारांचा पाऊस पाहिला नव्हता. खामखेडा, भऊर, विठेवाडी, सावकी, बेज, भादवण, पिळकोस, बगडू, लोहणेर आदी गावांमधील कांदा, डाळिंब , गहू , हरभरा, कोबी, मिरची , कांद्याचे डोंगळे, टोमाटो आदि पिकांचे शंभर टक्के नुकसान या गाभ्रीच्या पावसाने केले होते. पोटच्या मुलाप्रमाणे खर्च करून जपलेला कांदा हातात येण्याऐवजी भुइसपाट झाल्याने शेतक-यांच्या डोळ्यात अश्रूंचा महापूर दाटला होता. दीड ते दोन तास वादळी पाउस व अर्धा किलोच्या वजनाच्या गारेने आंब्याबरोबरच रब्बी पिकांचे अतोनात नुकसान केले होते. ही गारपीट इतकी भयानक होती, की दोन दिवस शेतातील गारांचा थर वितळला नव्हता. आजही या घटनेच्या नुसत्या विचाराने शेतक-यांचा थरकाप उडतो.यंदा दुष्काळी स्थितीपाच वर्षांपूर्वी झालेला हा गाभ्रीचा पाऊस आजही शेतक-यांसह गावक-यांना आठवतो. गावाने पहिल्यांदाच अशी भयानक नैसर्गिक आपत्ती अनुभवली होती. त्यामुळे मार्च महिना आला की गावातील शेतक-यांना त्या काळरात्रीच्या आठवणींनी थरकाप उडतो. या घटनेमुळे जे नुकसान झाले, त्यातून आजही अनेक शेतकरी कुटुंबे सावरलेली नाहीत. यंदाही परिसरात दुष्काळ सदृश परिस्थिती आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग चिंतेत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक