शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

गाभ्रीच्या पावसाची ती ‘काळरात्र’ आजही खामखेडावासियांच्या स्मरणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 16:09 IST

फ्लॅशबॅक : पाच वर्षांपूर्वी गारपीटीने उडविली होती दाणादाण. आठवणींनी उडतो थरकाप

ठळक मुद्देबुजुर्गांनी त्यांच्या हयातीत असा गारांचा पाऊस पाहिला नव्हता. खामखेडा, भऊर, विठेवाडी, सावकी, बेज, भादवण, पिळकोस, बगडू, लोहणेर आदी गावांमधील कांदा, डाळिंब , गहू , हरभरा, कोबी, मिरची , कांद्याचे डोंगळे, टोमाटो आदि पिकांचे शंभर टक्के नुकसान या गाभ्रीच्या पावस

दिनकर आहेर, खामखेडा : ९ मार्च २०१४ ची रात्रीची नऊ वाजेची वेळ होती. दक्षिणेकडून राक्षसी पावलाने घोंगावत आलेल्या गाभ्रीच्या पावसाने अक्षरश: कहर केला आणि अवघ्या नऊ ते दहा मिनिटांत खामखेडासह पंचक्रोशीतील शेतातील उभी पिके भुईसपाट झाली होती. शेतजमिनीवर पाव ते अर्धा फूट साचलेल्या बर्फाच्या थराने शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडा केला होता. शनिवारी (दि.९) या घटनेला बरोबर पाच वर्षे लोटली आहेत. मात्र, ९ मार्च उजाडला की आजही या घटनेच्या आठवणींनी शेतकऱ्यांचा थरकाप उडतो.पाच वर्षापूर्वी ९ मार्च २०१४ रोजी रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास खामखेडा या गावावर निसर्ग कोपला. वादळी वा-यासह झालेल्या गारांच्या पावसाने कळवण व देवळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांना अक्षरश भुइसपाट केले. बुजुर्गांनी त्यांच्या हयातीत असा गारांचा पाऊस पाहिला नव्हता. खामखेडा, भऊर, विठेवाडी, सावकी, बेज, भादवण, पिळकोस, बगडू, लोहणेर आदी गावांमधील कांदा, डाळिंब , गहू , हरभरा, कोबी, मिरची , कांद्याचे डोंगळे, टोमाटो आदि पिकांचे शंभर टक्के नुकसान या गाभ्रीच्या पावसाने केले होते. पोटच्या मुलाप्रमाणे खर्च करून जपलेला कांदा हातात येण्याऐवजी भुइसपाट झाल्याने शेतक-यांच्या डोळ्यात अश्रूंचा महापूर दाटला होता. दीड ते दोन तास वादळी पाउस व अर्धा किलोच्या वजनाच्या गारेने आंब्याबरोबरच रब्बी पिकांचे अतोनात नुकसान केले होते. ही गारपीट इतकी भयानक होती, की दोन दिवस शेतातील गारांचा थर वितळला नव्हता. आजही या घटनेच्या नुसत्या विचाराने शेतक-यांचा थरकाप उडतो.यंदा दुष्काळी स्थितीपाच वर्षांपूर्वी झालेला हा गाभ्रीचा पाऊस आजही शेतक-यांसह गावक-यांना आठवतो. गावाने पहिल्यांदाच अशी भयानक नैसर्गिक आपत्ती अनुभवली होती. त्यामुळे मार्च महिना आला की गावातील शेतक-यांना त्या काळरात्रीच्या आठवणींनी थरकाप उडतो. या घटनेमुळे जे नुकसान झाले, त्यातून आजही अनेक शेतकरी कुटुंबे सावरलेली नाहीत. यंदाही परिसरात दुष्काळ सदृश परिस्थिती आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग चिंतेत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक