शहरं
Join us  
Trending Stories
1
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
2
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
3
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर पुणे पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
4
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेसमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
5
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
6
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
7
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
8
प्रेक्षकांचा सूरज चव्हाणला 'गोलीगत धोका', 'झापुक झुपूक'ने पहिल्या आठवड्यात केली फक्त इतकी कमाई
9
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
10
हवाई दलाचं जबरदस्त शक्तिप्रदर्शन, हायवेवर उतरवली मिराज, राफेलसह ही लढाऊ विमानं
11
सिद्धार्थ-मितालीच्या घरी आला छोटा पाहुणा, फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
12
WhatsApp वेबवर व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर लाँच; आता तुम्ही थेट करू शकता कॉल
13
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
14
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाला 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
15
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
16
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
17
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
18
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
19
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
20
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश

नाशिकमध्ये मोबाईल टॉवरसाठी महापालिकेसमोर भाजयुमोचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 15:24 IST

नाशिक- अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मुलभूत गरजा आहेत. परंतु आता इंटरनेट किंवा मोबाईल रेंज ही चौथी गरज निर्माण झाली आहे. शहरातील सातपुर भागातील काही ठिकाणी मोबाईल टॉवरचा अभाव असल्याने तेथील नागरीकांना मोठी अडचण होत आहे. त्यामुळे ही चौथी मुलभूत गरज भागविण्यासाठी म्हणजेच मोबाईल टॉवर बसविण्यास कंपन्यांना महापालिकेने परवानगी द्यावी यासाठी भाजयुमोच्या नेतृत्वाखाली राजीव गांधी भवनासमोर शनिवारी (दि.१) धरणे आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देस्मार्ट सिटी कशी होणारसातपूर परीसरातील नागरीक रेंज नसल्याने हैराण

नाशिक- अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मुलभूत गरजा आहेत. परंतु आता इंटरनेट किंवा मोबाईल रेंज ही चौथी गरज निर्माण झाली आहे. शहरातील सातपुर भागातील काही ठिकाणी मोबाईल टॉवरचा अभाव असल्याने तेथील नागरीकांना मोठी अडचण होत आहे. त्यामुळे ही चौथी मुलभूत गरज भागविण्यासाठी म्हणजेच मोबाईल टॉवर बसविण्यास कंपन्यांना महापालिकेने परवानगी द्यावी यासाठी भाजयुमोच्या नेतृत्वाखाली राजीव गांधी भवनासमोर शनिवारी (दि.१) धरणे आंदोलन करण्यात आले.सध्या तंत्रज्ञानाचे युग असून ही जीवनातील अपरिहार्यता आहे. सर्व कामकाज आता तंत्रज्ञानाच्या आधारावर होत असून इंटरनेट नसेल तर कामकाज ठप्प होते. नाशिक शहाराच्या अनेक भागात मोबाईल टॉवर नाहीत. त्यामुळे रेंज मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. सातपूर भागातील शिवाजी नगर, धु्रव नगर, श्रमिक नगर या भागात तर मोबाईल रेंज नसल्याने कोणाचा मृत्यू झाला तरी नागरीकांना स्थानिक ठिकाणी किंवा परगावी निरोपही देता येत नाही. मोबाईल कंपन्या टॉवर उभारण्यास तयार आहेत, परंतु महापालिकेकडून संंबधीतांना ना हरकत दाखला दिला जात नाही. त्यातच मध्यंतरी सुलभ शौचालय बांधून त्यावर मोबाईल कंपन्यांनी टॉवर उभारयचे तसेच त्या शौचालयांची देखभाल महापालिकेनेच करायची असा अजब प्रस्ताव महापलिकेने तयार केला होता. परंतु मोबाईल कंपन्यांनी नकार दिला. त्यामुळे या विषयाचे भिजत घोंगडे आहे. त्या पार्श्वभूमीवर महापलिकेने त्वरीत निर्णय घ्यावा अशी मागणी करणारे निवेदन आंदोलकांनी भाजयुमोचे चिटणीस अमोल पाटील, नगरसेवक वर्षा भालेराव, रविंंद्र धिवरे यांच्या नेतृत्वाखाली आयुक्त राधाकृष्ण गमे यांना निवेदन दिले.

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाMobileमोबाइल