शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

भाजपचे ७० उमेदवार आयाराम : सुप्रिया सुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 02:03 IST

भाजपने कॉँग्रेसमुक्त भारत करण्याची घोषणा केली असली तरी सद्य:स्थितीत भाजपच कॉँग्रेसयुक्त झाली आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपचे १५० पैकी ७० उमेदवार हे आयात केलेले आहेत. त्यामुळेच भाजपकडून खरोखरच पार्टी विथ डिफरन्स ही संकल्पना राबविली जात असल्याचा टोला राष्टÑवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी येवला येथे पत्रकार परिषदेत बोलताना भाजपला लगावला.

ठळक मुद्देहे तर दडपशाही करणारे सरकार!

येवला : भाजपने कॉँग्रेसमुक्त भारत करण्याची घोषणा केली असली तरी सद्य:स्थितीत भाजपच कॉँग्रेसयुक्त झाली आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपचे १५० पैकी ७० उमेदवार हे आयात केलेले आहेत. त्यामुळेच भाजपकडून खरोखरच पार्टी विथ डिफरन्स ही संकल्पना राबविली जात असल्याचा टोला राष्टÑवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी येवला येथे पत्रकार परिषदेत बोलताना भाजपला लगावला.सुप्रिया सुळे म्हणाल्या, प्रकरणे जुनी असताना विरोधी पक्षातील नेत्यांना निवडणुकीच्या अगोदरच नोटिसा दिल्या जात असल्याने हे दडपशाही करणारे सरकार आहे. प्रफुल्ल पटेल यांना निवडणुकीच्या तोंडावर नोटीस दिली जाते. कोर्टाची आॅर्डर, संबंधित पुरावे जर हे सरकार मानणार नसेल तर सर्वसामान्य जनतेचं काय, असा सवालही सुळे यांनीकेला.पक्षातीलच नेते शिवसेना उमेदवाराच्या प्रचारात सक्रि य सहभाग घेऊन पक्षविरोधी काम करत असल्याच्या प्रश्नावर सुळे यांनी सांगितले, संघटना ही पहिली असते, नंतर मतभेदांकडे पाहिले पाहिजे.संघटनेने निर्णय घेतला तर पक्ष पहिला आणि मतभेद बाजूला ठेवण्याची गरज आहे. ज्यांच्यावर पक्षाने प्रेम केले, त्यांच्याकडून पक्षविरोधी भूमिका घेतली जात असेल तर ही दुर्दैवी बाब आहे. संबंधितांवर कारवाई करण्याचा निर्णय प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, अंबादास बनकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.राष्ट्रवादीतील मोठा चेहरा म्हणून छगन भुजबळ यांच्याकडे बघितले जाते. मात्र निवडणुकीच्या तोंडावर त्यांचा आवाज दडपला जात आहे. कुठलंही सरकार असो, त्यांनी प्रशासनाचा गैरवापर करू नये.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Supriya Suleसुप्रिया सुळेBJPभाजपा