शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

भाजपा जिंकला, भाजपा हरला! रिंगणातून काँग्रेसला केले हद्दपार, स्वत:ही मैदानातून काढला पळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2023 12:05 IST

डॉ. राजेंद्र विखे हे नगर जिल्ह्यातील असल्यामुळे यंदा नगर विरुद्ध नगर अशीच लढत रंगणार, अशी चर्चा भाजपकडूनच पसरविली जात होती.

नाशिक : पक्षाने अधिकृत उमेदवारी दिलेली असतानाही डॉ. सुधीर तांबे यांना आमदार होण्यापासून रोखणे, पक्षाने नकार दिलेला असताना सत्यजित तांबे यांना अपक्ष उमेदवारी करण्यास भाग पाडून भारतीय जनता पक्षाने फटक्यासरशी काँग्रेसला आपल्या खेळीने पदवीधर मतदारसंघाच्या मैदानावर चारीमुंड्या चीत केले असले तरी, कोणतीही निवडणूक जिंकण्यासाठीच लढणाऱ्या भाजपने पदवीधर मतदारसंघात पहिल्यांदाच पक्षाचा अधिकृत उमेदवार नाकारून निवडणुकीपूर्वीच स्वत:चीही हार मानली आहे.

नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघावर असलेल्या भाजपच्या एकतर्फी वर्चस्वाला डॉ. सुधीर तांबे यांनी पहिल्यांदा अपक्ष व नंतर काँग्रेसकडून उमेदवारी घेत सुरूंग लावल्याने खवळलेल्या भाजपने यंदाच्या निवडणुकीत त्याचा वचपा काढल्याचे आता बोलले जात आहे. पदवीधर मतदारसंघाच्या मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून काँग्रेसकडून अवघे डॉ. सुधीर तांबे यांच्या नावाची चर्चा होत असताना भाजपकडून मात्र महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू डॉ. राजेंद्र विखे, हेमंत धात्रक, धनराज विसपूते, विखे यांचे समर्थक धनंजय जाधव, शुभांगी पाटील असे अर्धा डझन इच्छूक होते. त्यामुळे  या सर्व इच्छुकांची ताकद एकत्र आल्यास पदवीधर निवडणुकीत भाजपचा विजय सोपा असल्याचे गणितही मांडण्यात येत होते.

डॉ. राजेंद्र विखे हे नगर जिल्ह्यातील असल्यामुळे यंदा नगर विरुद्ध नगर अशीच लढत रंगणार, अशी चर्चा भाजपकडूनच पसरविली जात होती. त्यातच भाजपचे संकटमोचक म्हणून प्रसिद्ध असलेले गिरीष महाजन यांना निवडणूक अधिकारी म्हणून नेमण्यात आल्याने भाजप काँग्रेसच्या ताब्यातून मतदारसंघ हिसकावण्यास यशस्वी होईल,  असे मानले जात होते. मात्र, भाजपने काँग्रेसचे विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या पुत्रालाच उमेदवारी देण्याची चर्चा घडवून आणताना डॉ. तांबे यांना गारद करण्याचा डाव खेळला व तो यशस्वी होत असल्याचे दिसू लागताच स्वत: पक्षाचा उमेदवार जाहीर न करता सत्यजित तांबे यांच्या शिडात हवा भरली.

परिणामी, काँग्रेसच्या अधिकृत घोषीत उमेदवाराला माघार घ्यावी लागली तर ज्याला पक्षाने नाकारले त्या सत्यजित तांबे यांना पुढे करण्याची वेळ डॉ. तांबे यांच्यावर आली. भाजपची खेळी यशस्वी झाल्याने यापुढे पदवीधर मतदारसंघावर काँग्रेस अधिकृत दावा करू शकणार नसला तरी, अखेरच्या क्षणापर्यंत पक्षाच्या इच्छुकांना उमेदवारीसाठी झुलवत ठेवून ऐनवेळी निवडणुकीच्या रिंगणात पळ काढण्याच्या भाजपच्या पळपुट्या कृतीचीही आता चर्चा होऊ लागली आहे. निवडणुकीला सामोरे न जाता, समोरच्याला पराभूत करण्यात भाजप यशस्वी झाली खरी. मात्र, कोणतीही निवडणूक जिंकण्यासाठीच लढण्याचा केला जात असलेला दावा फोल ठरला आहे. 

ना जोष, ना जल्लोष!

भारतीय जनता पक्षाला या निवडणुकीतील पराभवाची जणू चाहूल लागली असावी, म्हणूनच नामांकन दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशीही भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये ना जोष दिसला ना जल्लोष. इच्छूक उमेदवारांना एकीकडे नामांकन दाखल करण्यासाठी प्रोत्साहित केले जात असताना दुसरीकडे त्यांना फक्त कोरे एबी फॉर्म दुरूनच दाखविले जात होते. हातात एबी फॉर्म असूनही भाजपचे पदाधिकाऱ्यांचे सारे लक्ष तांबे पिता- पुत्रावरच लागून होते. त्यातही सत्यजित तांबे यांचे एकांतात भ्रमणध्वनीवरून सुरू असलेले बोलणे भाजपच्या पदाधिकाऱ्यांना सुखावून जात होते.

टॅग्स :Satyajit Tambeसत्यजित तांबेPoliticsराजकारणcongressकाँग्रेसBJPभाजपा