शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

भाजप, सेना ताट-वाट्या घेऊन राज्यभर फिरताहेत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 02:04 IST

महाराष्टÑातील बंद पडलेले उद्योग, तरुणांची बेरोजगारी व शेतकऱ्यांच्या वाढत चाललेल्या आत्महत्या या प्रश्नांवर न बोलणारी भारतीय जनता पार्टी व शिवसेना विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात राज्यात ताट-वाट्या घेऊन फिरत असल्याची टीका करून, महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी, एक पक्ष दहा रुपयांत तर दुसरा पाच रुपयांत थाळी देण्याचे आश्वासन देत असल्याचे पाहून महाराष्टÑ भिकेला लागलाय काय? असा सवालही उपस्थित केला.

ठळक मुद्देराज ठाकरे यांची घणाघाती टीका : शिवसेना सत्तेसाठी घरंगळली

नाशिक : महाराष्टÑातील बंद पडलेले उद्योग, तरुणांची बेरोजगारी व शेतकऱ्यांच्या वाढत चाललेल्या आत्महत्या या प्रश्नांवर न बोलणारी भारतीय जनता पार्टी व शिवसेना विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात राज्यात ताट-वाट्या घेऊन फिरत असल्याची टीका करून, महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी, एक पक्ष दहा रुपयांत तर दुसरा पाच रुपयांत थाळी देण्याचे आश्वासन देत असल्याचे पाहून महाराष्टÑ भिकेला लागलाय काय? असा सवालही उपस्थित केला.महाराष्टÑ नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ येथील डोंगरे वसतिगृह मैदानावर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. आपल्या भाषणात शिवसेनेवर तुटून पडताना राज ठाकरे यांनी भाजपाने जागावाटपात नाशिक व पुण्यात शिवसेनेला एकही जागा न सोडल्याचा संदर्भ दिला तसेच उद्धव ठाकरे यांच्या भाषणाची आठवण करून देताना ते म्हणाले, यापुढे महाराष्टÑावर एक हाती भगवा फडकावयाचा असून, गेली २५ वर्षे भाजपाबरोबर युती करून सडली, असे म्हणणाºया उद्धव ठाकरेंना नाशिक व पुण्यात विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी भाजपाने एकही जागा न सोडल्याने शिवसेनेच्या लोकांनी काय करायचे? असा प्रश्नही राज ठाकरे यांनी केला.सत्तेसाठी शिवसेना भाजपाच्या पाठीमागे घरंगळत चालली असून, ही माणसे आहेत की गोट्या असा प्रश्नही राज ठाकरे यांनी केला.पंतप्रधानांनी नोटबंदी केल्यानंतर आपण हा निर्णय जर चुकला तर देश खड्ड्यात जाईल, असे भाकीत केले होते, तसेच घडले असून, नोटबंदीनंतर रांगेत उभे राहून अनेकांना प्राण गमवावा लागला, देशाची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस खालवत चालली.नाशिकचा पराभव जिव्हारी लागला...नाशिक महापालिकेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कामे केली. मात्र तरीही निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. कधी कधी काय पाहिजे हेच कळत नाही. काम करून सत्ता मिळत नाही आणि जे काहीच करत नाही त्यांना मात्र भरभरून दिले जाते. त्यामुळे नाशिकचा पराभव जिव्हारी लागला, असे राज ठाकरे यांनी सांगतानाच आपली खंत जाहीर सभेत केली.च्नाशिककरांवर बोजा नको म्हणून बाहेरून निधी आणला आणि कामे केली. टाटा किंवा अन्य कोणी अन्य शहरात जाऊन कामे केली आहेत का, असा प्रश्न करीत त्यांनी तरीही आपले नाशिकवरचे प्रेम कमी झाले नाही, असे नमूद केले. नाशिक महापालिकेत आपण कामे केली, इतकी कामे गेल्या तीस वर्षांत झाली नाही, मात्र आता काय सुरू आहे. महापालिका ओरबाडण्याचे काम सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.किती काश्मिरी पंडित परतले?निवडणुकीच्या प्रचारात पाच वर्षे सत्तेत असताना त्यांनी काय कामे केली, हे सांगत नाही. जनतेचे भलत्याच प्रश्नाकडे लक्ष वळविले जात असून, काश्मीरमधील ३७० कलम रद्द करण्याचा व महाराष्टÑाच्या निवडणूक प्रचाराशी त्याचा काय संबंध? हा प्रश्न काश्मीरपुरता मर्यादित असून, ३७० रद्द केल्यानंतर सरकारने काश्मीरमध्ये काय केले? किती काश्मिरी पंडित पुन्हा काश्मीरमध्ये परत आले याचा आकडा भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांनी जाहीर करावा, असे आव्हानही ठाकरे यांनी दिले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा