शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

काढणीसाठी आलेल्या कांद्यावर मोठे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 01:44 IST

राजापूर : परिसरात लाल कांदा काढणीस सुरुवात झाली आहे; परंतु दोन दिवसांपासून थंडी व ढगाळ वातावरणामुळे कांदा काढणी केलेल्या व शेतात असलेल्या कांद्याला मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे.

ठळक मुद्देयेवला : ढगाळ वातावरणामुळे मावा रोगाचा प्रादुर्भाव

राजापूर : परिसरात लाल कांदा काढणीस सुरुवात झाली आहे; परंतु दोन दिवसांपासून थंडी व ढगाळ वातावरणामुळे कांदा काढणी केलेल्या व शेतात असलेल्या कांद्याला मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे.सध्या थंडी मोठ्या प्रमाणावर असल्याने काढून ठेवलेला कांदा कापणीसाठी मजुरांना थंडीमुळे मजूर मिळणे अवघड झाले आहे. कांदा कापणीसाठी अव्वाच्या सव्वा रोज देऊन कांदा कापणी करावी लागत आहे. ढगाळ हवामान व थोड्याफार प्रमाणात बारीक भुरभुर पाऊस येत असल्याने शेतकऱी मोठ्या प्रमाणावर संकटात सापडला आहे.राजापूर व परिसरात लाल कांदा यावरच शेतकऱ्यांचे भवितव्य अवलंबून आहे. रांगडा कांदा हा राजापूर येथे निघणार नाही. राजापूर येथील विहिरीने आताच तळ गाठला आहे. त्यामुळे निसर्गाने व शासनाच्या धोरणामुळे शेतकऱ्यांच्या या अपेक्षेवर पाणी फिरणार आहे. राजापूर परिसरात अजून एक महिन्याने पाणी टंचाईची समस्या जाणवणार आहे. राजापूर येथे रांगडा उन्हाळ कांदा हा फक्त ज्या शेतकऱ्यांनी शेततळे भरून ठेवलेले आहे अशा शेतकऱ्यांची रांगडा व उन्हाळ कांदा लागवड सुरू आहे.आम्ही खरिपाचा लाल कांदा काढणीस सुरुवात केली. कांदा काढणीस उशीर झाला तर कांद्याचे नुकसान टाळण्यासाठी कांदा काढून कापून पोळीत टाकला जात आहे. थंडीमध्ये कांदा कापणी करावी लागते आहे. शेतकऱ्यांना ढगाळ वातावरणामुळे मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. शासनाने कांदा निर्यातबंदी उठवून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले, पाहिजे ही आमच्या शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.- विठ्ठल वाघ, शेतकरी, राजापूर. (१२ कांदा)

टॅग्स :onionकांदाagricultureशेती