शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

काढणीसाठी आलेल्या कांद्यावर मोठे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 01:44 IST

राजापूर : परिसरात लाल कांदा काढणीस सुरुवात झाली आहे; परंतु दोन दिवसांपासून थंडी व ढगाळ वातावरणामुळे कांदा काढणी केलेल्या व शेतात असलेल्या कांद्याला मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे.

ठळक मुद्देयेवला : ढगाळ वातावरणामुळे मावा रोगाचा प्रादुर्भाव

राजापूर : परिसरात लाल कांदा काढणीस सुरुवात झाली आहे; परंतु दोन दिवसांपासून थंडी व ढगाळ वातावरणामुळे कांदा काढणी केलेल्या व शेतात असलेल्या कांद्याला मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे.सध्या थंडी मोठ्या प्रमाणावर असल्याने काढून ठेवलेला कांदा कापणीसाठी मजुरांना थंडीमुळे मजूर मिळणे अवघड झाले आहे. कांदा कापणीसाठी अव्वाच्या सव्वा रोज देऊन कांदा कापणी करावी लागत आहे. ढगाळ हवामान व थोड्याफार प्रमाणात बारीक भुरभुर पाऊस येत असल्याने शेतकऱी मोठ्या प्रमाणावर संकटात सापडला आहे.राजापूर व परिसरात लाल कांदा यावरच शेतकऱ्यांचे भवितव्य अवलंबून आहे. रांगडा कांदा हा राजापूर येथे निघणार नाही. राजापूर येथील विहिरीने आताच तळ गाठला आहे. त्यामुळे निसर्गाने व शासनाच्या धोरणामुळे शेतकऱ्यांच्या या अपेक्षेवर पाणी फिरणार आहे. राजापूर परिसरात अजून एक महिन्याने पाणी टंचाईची समस्या जाणवणार आहे. राजापूर येथे रांगडा उन्हाळ कांदा हा फक्त ज्या शेतकऱ्यांनी शेततळे भरून ठेवलेले आहे अशा शेतकऱ्यांची रांगडा व उन्हाळ कांदा लागवड सुरू आहे.आम्ही खरिपाचा लाल कांदा काढणीस सुरुवात केली. कांदा काढणीस उशीर झाला तर कांद्याचे नुकसान टाळण्यासाठी कांदा काढून कापून पोळीत टाकला जात आहे. थंडीमध्ये कांदा कापणी करावी लागते आहे. शेतकऱ्यांना ढगाळ वातावरणामुळे मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. शासनाने कांदा निर्यातबंदी उठवून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले, पाहिजे ही आमच्या शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.- विठ्ठल वाघ, शेतकरी, राजापूर. (१२ कांदा)

टॅग्स :onionकांदाagricultureशेती