शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

भुजबळांना शिवसेनेचा नवा प्रवाह माहीत नाही : संजय राऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2021 00:55 IST

राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी नवी मुंबई विमानतळाविषयी केलेल्या वक्तव्याला शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडून २५ ते ३० वर्षांचा कालावधी उलटला आहे. त्यामुळे त्यांना शिवसेनेतील नवा प्रवाह माहिती नसल्याची बोचरी टीका संजय राऊत यांनी रविवारी (दि.१३) नाशिमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत केली.

ठळक मुद्देनामांतराच्या मुद्यावरून लगावला टोला

नाशिक : राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी नवी मुंबई विमानतळाविषयी केलेल्या वक्तव्याला शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडून २५ ते ३० वर्षांचा कालावधी उलटला आहे. त्यामुळे त्यांना शिवसेनेतील नवा प्रवाह माहिती नसल्याची बोचरी टीका संजय राऊत यांनी रविवारी (दि.१३) नाशिमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत केली.

बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी नवी मुंबई विमानतळाला जेआरडी टाटा यांचे नाव सुचवले असते, असे मत छगन भुजबळ यांनी शुक्रवारी बोलताना व्यक्त केले होते. त्यावर राऊत यांनी विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेच नाव देणे योग्य असल्याचे नमूद करीत मंत्रिमंडळाने या प्रस्तावास मंजुरी देऊन केंद्राला प्रस्ताव पाठविल्याचे स्पष्ट केले. स्थानिकाकांडून विमानतळाला माजी खा. दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी होत असली तरी प्रत्यक्षात दि. बा. पाटील असते तरी त्यांनीही बाळासाहेबांच्या नावाचे समर्थन केले असते, असा दावाही संजय राऊत यांनी यावेळी केेला. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पायी वारीवर यावर्षीही निर्बंध आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी वारकरी सांप्रदायासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार संवाद साधत आहेत; परंतु पायी वारीसाठी फूस लावणारे काही राजकीय पक्ष व संघटना वारकऱ्यांच्या जिवाशी खेळत असून वारीमधून कोरोनाचा प्रसार झाला तर अशा संघटना व राजकीय पक्ष जबाबदारी घेणार का? असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला आहे.

इन्फो-१

पाच वर्षे शिवसेनेचाच मुख्यमंत्री

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री पदाची इच्छा व्यक्त केल्याच्या पार्भूमीवर राज्यात संपूर्ण पाच वर्षे शिवसेनेचाच मुख्यमंत्री राहणार आहे. महाविकास आघाडीची स्थापना करतानाच हे ठरले असून आपण त्याचे साक्षीदार असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले.

इन्फो-२

भाजपकडे दुसरा चेहराच नाही

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी २०२४ मध्येही नरेंद्र मोदीच पंतप्रधान होतील, असा दावा केला आहे. त्यावर भाजपकडे मोदींशिवाय दुसरा चेहराच नसल्याची टीका संयज राऊत यांनी केली. तसेच राजकारणात अतिशय बदल वेगाने होतात. त्यामुळे भविष्यातील आडाखे आताच मांडता येणार नाहीत, असेही ते म्हणाले.

इन्फो-३

मराठा समाजाने दिल्लीत मोर्चे काढावे

छत्रपती संभाजीराजे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर समाजाच्या नेत्यांनी दिल्लीत मोर्चा काढणे आवश्यक असून आरक्षणाचा निर्णय संसदेत किंवा पंतप्रधान अथवा राष्ट्रपती यांच्याकडेच होऊ शकतो. त्यासाठी विरोधी पक्षनेत्यांनीही पाठपुरावा करण्याचे आवाहन राऊत यांनी केेले.

टॅग्स :NashikनाशिकPoliticsराजकारणChhagan Bhujbalछगन भुजबळSanjay Rautसंजय राऊतShiv Senaशिवसेना