शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

लष्कराच्या संरक्षक भिंतीमुळे भगूर-नानेगाव रस्ता बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 1:46 AM

लष्कराच्या विजयनगर येथील संरक्षक भिंतीमुळे स्वातंत्र्यपूर्व काळापासून वाहतूक सुरू असलेला भगूर-नानेगाव रस्ता बंद करण्याच्या भूमिकेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे.

देवळाली कॅम्प : लष्कराच्या विजयनगर येथील संरक्षक भिंतीमुळे स्वातंत्र्यपूर्व काळापासून वाहतूक सुरू असलेला भगूर-नानेगाव रस्ता बंद करण्याच्या भूमिकेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे.लष्कराच्या संरक्षिक भिंतीमुळे रस्ता बंद होण्यामुळे विद्यार्थी, कामगार वर्गासह शेतमाल वाहतुकीची मोठी समस्या निर्माण होणार असून, नानेगाव ग्रामस्थांना शेतमाल देवळाली कॅम्प-भगूरला आणण्यासाठी शिंदे-पळसे नाहीतर दोनवाडे-राहुरी मार्गे लांबचा प्रवास करून जावे लागणार आहे. महाराष्टÑ शासनाकडून गावागावांना जोडणारे शिवरस्ते जोडण्याची उपाययोजना असताना स्वातंत्र्यपूर्व काळापूर्वीपासून रस्ताच बंद करण्याच्या भूमिकेमुळे ग्रामस्थांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. भगूर-नानेगाव रस्ता बंद करण्याच्या लष्कराच्या भूमिकेविरुद्ध लष्करी अधिकाऱ्यांसह जिल्हा प्रशासनाला याबाबत निवेदन दिले होते. त्यानंतर या रस्त्याबाबत कोणताही निर्णय होऊ शकला नव्हता. स्थानिक पातळीवर कॅन्टोन्मेंट प्रशासनाच्या माध्यमातून लष्कर व ग्रामस्थ यांच्या प्रश्नांवर तोडगा काढत लष्करी हद्द व रेल्वे यादरम्यान पंधरा-वीस फुटांचा रस्ता कॅन्टोन्मेंट बोर्डाने करून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र सहा महिन्यांनंतर रस्त्याचे आश्वासन सर्वच अधिकारी विसरल्याने त्या रस्त्याच्या जागेवर संरक्षक भिंतीचे काम सुरू झाले आहे.भगूर-नानेगांव रस्ता बंदबाबत नानेगाव ग्रामस्थांनी रविवारी ग्रामस्थांची बैठक घेऊन रस्त्याच्या मुद्द्याबाबत लष्करी अधिकाºयांची भेट घेण्याचे नियोजित केले आहे.पुणे-नाशिक रेल्वे मार्गाचे बाधीत होणाºया नानेगावाला आता भगूरहून होणाºया वाहतुकीचा रस्ताच लष्करी प्रशासनामुळे बंद होणार आणि ‘इंग्रज बरे की अच्छे दिन चांगले’ अशी मनस्तापाची वेळ नानेगाव ग्रामस्थांवर येऊन ठेपली आहे.वाहतूक इतरत्र मार्गस्थ करावी लागणारभगूरहून शिंदे-पळसेला जाणारा नानेगाव मार्गे रस्ता या लष्कराच्या संरक्षक भिंतीमुळे बंद होणार असून, भविष्यकाळात भगूर-इगतपुरीकडून शिंदे, पळसे, एकलहरा आदी गावांकडे जाणारा रस्ताच बंद होणार असल्यामुळे वाहतुकीची मोठी गर्दी नाशिकरोड मार्गे मार्गस्थ करावी लागणार आहे. ग्रामीण भागात भगूरहून नानेगाव, शिंदे, पळसे या गावांना जोडणारा मार्ग बंद झाला तर सध्या बंद असलेल्या नाशिक साखर कारखान्यालाही ऊस वाहतुकीसाठी मोठा फटका बसणार आहे.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानNashikनाशिक