शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

बंगालच्या चक्रीवादळाने अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, 8 ते 10 राज्यांना वातावरण बदलाचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2021 18:10 IST

नाशिक : वातावरण बदलाचा फटका देशभरातील आठ ते दहा राज्यांना सध्या तरी बसतो आहे. अचानकपणे या राज्यांमधील बहुतांश जिल्ह्यांचा ...

नाशिक : वातावरण बदलाचा फटका देशभरातील आठ ते दहा राज्यांना सध्या तरी बसतो आहे. अचानकपणे या राज्यांमधील बहुतांश जिल्ह्यांचा भाग बेमोसमी पावसाने प्रभावित झालेला पाहावयास मिळत आहे. पाच दिवसांपूर्वी पश्चिम बंगालच्या महासागरात निर्माण झालेली चक्रवाताची स्थिती हळूहळू अरबी समुद्राकडे सरकत गेली आणि अरबी समुद्रातही चक्रीवादळाची स्थिती निर्माण होऊ लागल्याने कमी दाबाचे क्षेत्र तयार होत गेले. अरबी समुद्रात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र सर्वसाधारणपणे चार दिवस स्थिर राहण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. अजून पुढील दोन दिवस तरी नाशकात वातावरणावर या हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव पाहावयास मिळू शकतो. यामुळेच बेमोसमी पावसाला नाशिकसह कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा या जिल्ह्यांत सुरुवात झाली. बुधवारी मागील २४ तासांत शहरासह जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यातील निफाड, लासलगाव, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर या तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस झाला.

किमान तापमानाचा पारा १३.९ अंशापर्यंत खाली घसरला असला तरीदेखील पुढील दोन दिवसांत यामध्ये अजून १ अंशाने घसरण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकीकडे थंडीचा हंगाम अन् दुसरीकडे बेमोसमी पावसाचा तडाखा यामुळे वातावरणात कमालीचा गारवा वाढल्याचा अनुभव सध्या नाशिककरांना येत आहे. तसेच हवेत बाष्पाचे प्रमाणही वाढल्याने वातावरणात मागील दोन ते तीन दिवसांपासून धुके अधिक पाहावयास मिळत आहे. त्यामुळे दृश्यमानतेची टक्केवारी काही प्रमाणात कमी झाल्याचे लक्षात येते. शुक्रवारीसुद्धा (दि.३) शहरात मळभ दाटलेले असेल आणि धुक्याच्या वातावरणाचा सामना करावा लागू शकतो. मागील दोन दिवसांत वाऱ्याचा वेगदेखील सौम्य झाल्याने शहरासह जिल्ह्यात जोरदार बेमोसमी पाऊस अधिक झाला. शनिवारी सकाळी नाशिककरांना सूर्यदर्शन घडण्याची शक्यता आहे. तसेच वाऱ्याचा वेगदेखील वाढू शकतो. त्यामुळे बेमोसमी पावसाचा धोका कमी होण्यास मदत होईल. शेतकरीवर्गाने विशेषत: द्राक्ष बागायतदारांसह अन्य फळबागा उत्पादकांनी अधिक काळजी घेत शेतपिकांवर अधिकाधिक आच्छादन टाकून शेक देण्याचा प्रयत्न करायला हवा, जेणेकरून लहरी निसर्गाच्या प्रभावामुळे शेतपिकांचे जास्तीत जास्त होणारे नुकसान टळण्यास मदत होईल.

पश्चिम बंगालच्या महासागरामध्ये पाच दिवसांपूर्वी निर्माण झालेल्या चक्रीवादळाचा प्रभाव अरबी समुद्रातदेखील पाहावयास मिळत आहे. अरबी समुद्रात दोन दिवसांपासून कमी दाबाचे क्षेत्र विकसित होत गेल्याने मध्य, उत्तर, पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांत बेमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली.

- सुनील काळभोर, हवामान केंद्र प्रमुख, नाशिक

-

टॅग्स :RainपाऊसNashikनाशिक