शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस सिद्धारामय्यांना हटवणार? कर्नाटकात CM पदावरून पुन्हा वाद पेटला, डीके गटातील आमदारांनी दिल्लीत तळ ठोकला
2
चीन-जपान तणावात भारताची 'बल्ले-बल्ले'! झाला बंपर फायदा, बाजार 11% नं वधारला; आता ट्रम्प टॅरिफचं 'नो-टेंशन'!
3
पाकिस्तानचे डोळे उघडले! चक्क चक्क चिनी कंपन्यांना ठणकावले; म्हणाले, 'आमची लूट थांबवा, अन्यथा काम बंद करा'
4
"बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..., आज जो काही आहे तो..."; निवृत्तीपूर्वी CJI बीआर गवई यांचं मोठं विधान!
5
जेव्हा मुख्यमंत्री नितीश कुमार पंतप्रधान मोदींच्या पायाला स्पर्श करण्यासाठी वाकले..., पाटणा विमानतळावरील 'आदराचं' अद्भुत दृश्य - Video
6
भाजपने आणखी एक नगरपालिका बिनविरोध जिंकली; मविआच्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले... 
7
Breaking: भारत - इस्रायल समृद्धीच्या नव्या पर्वाचे 'टेक ऑफ'; मुक्त व्यापार करार, थेट विमानसेवा अन् बरंच काही...
8
मोठी बातमी! लुधियाना टोल प्लाझाजवळ पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक; परिसरात गोळीबाराचा आवाज
9
IND vs SA: शुबमन गिलच्या दुखापतीबद्दल बॅटिंग कोचने दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...
10
२०० महिलांनी कोर्टातच घेतला जीव; मालेगावात जे घडता घडता राहिलं ते नागपूरमध्ये झालं होतं
11
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का, अनिल देशमुख यांचे पुत्र सलिल देशमुख यांचा राजीनामा
12
Viral : जगातला सगळ्यात आळशी व्यक्ती! स्पर्धा जिंकण्यासाठी तब्बल 'इतके' तास गादीवर झोपून राहिला
13
'अनगरच्या पाटलांचा माज आम्ही उतरवणार, चुकीला माफी नाही'; अजित पवारांच्या नेत्याचा थेट इशारा
14
बंगालमध्ये 'घमासान'! "परिस्थिती अत्यंत बिघडलीये, SIR त्वरित थांबवा..."; ममता बॅनर्जींच CECना पत्र, आणखी काय म्हणाल्या?
15
IND vs SA: हार्दिक पांड्या आफ्रिकेविरूद्धच्या वनडे मालिकेत खेळणार की नाही? वाचा ताजी अपडेट
16
लाकडाचेच ते...! चीनमधील १,५०० वर्षे जुन्या प्राचीन मंदिराचे पॅव्हेलिअन पेटले; पर्यटकांनी मेणबत्ती लावली अन्...
17
भारतात विकली जाणारी टेस्ला मॉडेल Y किती सुरक्षित; युरो एनकॅप क्रॅश टेस्टमध्ये मिळवले 'एवढे' स्टार रेटिंग!
18
पश्चिम बंगालमध्ये ९०० मतदारांची नावे यादीतून गायब; निवडणूक आयोगाचा संताप, बीएलओंवर कारवाईचे आदेश
19
लोकांचे पैसे गुंतविता गुंतविता Groww ने १९,००० कोटींचे नुकसान केले; गुंतवणूकदार डोके धरून बसले...
20
पती नव्हे राक्षस! पत्नीने मित्रांना विरोध केला म्हणून मारहाण, गर्भपात आणि नंतर अश्लील व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

संकटांचा सामना करत श्रमाने मोती पिकवण्याची बळीराजाची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 14:58 IST

येवला : तालुक्यातील पेरणी झालेल्या पिकाची उगवण व पिक परिस्थिती सध्यातरी समाधानकारक आहे. मात्र, यंदाही मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा तर कापूस पिकावर सेंद्रीय बोंड अळीचा प्रार्दुभाव दिसून येत आहे. नेहमीपेक्षा यंदा सोयाबीनचे क्षेत्र वाढले असले तरी उगवण क्षमतेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देयंदा सोयाबीनचे क्षेत्र वाढले असले तरी उगवण क्षमतेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

योगेंद्र वाघ । लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : तालुक्यातील पेरणी झालेल्या पिकाची उगवण व पिक परिस्थिती सध्यातरी समाधानकारक आहे. मात्र, यंदाही मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा तर कापूस पिकावर सेंद्रीय बोंड अळीचा प्रार्दुभाव दिसून येत आहे. नेहमीपेक्षा यंदा सोयाबीनचे क्षेत्र वाढले असले तरी उगवण क्षमतेचा प्रश्न निर्माण झाला आहे.विषम पाणी पुरवठ्याने तीन भागात विभागलेला दुष्काळी तालुका म्हणून येवल्याची ओळख आजही कायम आहे. कालवा लाभक्षेत्रातील शेती वगळता तालुक्यातील शेती आजही, नैसर्गिक जलस्त्रोतांवरच अवलंबून आहे. पाऊस पडला तर शेती पिकली हे या भागातील समीकरण गेल्या पन्नासवर्षातही बदलू शकले नाही. नगदी पिकांकडे शेतकऱ्यांचा कल असल्याने तालुक्यात पारंपारीक पिकांकडून मका, कपाशी, सोयाबीन पिकांकडे शेतकरी वळले आहे. मात्र, अस्मानी, सुल्तानी संकटांनी तालुक्यातील शेतकर्?यांची पाठ सोडलेली नाही.गेल्या दोन वर्षात तालुक्यात पर्जन्यमान चांगले राहिले परिणामी उत्पादन वाढले परंतू शेतमालाचे भाव नेहमीप्रमाणेच पडल्याने तोंड मिळवणी करतांना शेतकऱ्यांना कसरतच करावी लागली. यंदाही, कोरोनाचा फटका बसल्याने शेतमालाचे भाव पडले अन् शेतकरी अिर्थक संकटात सापडला आहे. द्राक्ष, डाळींब,कांदा व भाजीपाला उत्पादकांना याचा मोठा फटका बसला. नगदी पिक हाच तालुक्याचा आजचा पिक पॅटर्न बनला असून यंदा उत्तर-पूर्व भागात चांगला पाऊस झाल्याने नद्या, बंधारे भरले तर विहिरींना पाणी उतरले आहे. या तुलनेत कालवा लाभक्षेत्रात दक्षिण-पश्चिम भागात मात्र पावसाचे प्रमाण कमी आहे. पेरण्यानंतर पावसाने ओढ दिल्याने केलेला खर्च वाया जातो की काय, या धास्तीने शेतकरी हवालदिल झाला होता. मात्र, बहुत्वांशी पिकांनी जमीनीच्यावर डोके काढल्याने बळीराजाच्या जीवात जीव आला आहे.चाचणीसाठी सोडण्यात आलेले मांजरपाड्याचे पाणी बाळापूर पर्यंत पोहचल्याने उत्तर-पूर्व भागातील वंचितांच्या आशा पालावल्या आहेत. तालुक्यातील वंचित भागातील अनेक शेतकºयांनी शेततळी करून नैसर्गिक व उपलब्ध पाण्याचा साठा करत शेती फुलवण्याचा प्रयत्न केला आहे. बोटावर मोजण्या इतक्या शेतकºयांनी शेतीतील नवे प्रयोग व नवे पिके घेण्याचा प्रयत्नही केला आहे. डोंगरपट्यातील शेतीसाठी स्वतंत्र विचार होणे ही काळाची गरज आजही कायम आहे.(फोटो २७ येवला,१)

टॅग्स :Waterपाणीagricultureशेती