शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

संकटांचा सामना करत श्रमाने मोती पिकवण्याची बळीराजाची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 14:58 IST

येवला : तालुक्यातील पेरणी झालेल्या पिकाची उगवण व पिक परिस्थिती सध्यातरी समाधानकारक आहे. मात्र, यंदाही मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा तर कापूस पिकावर सेंद्रीय बोंड अळीचा प्रार्दुभाव दिसून येत आहे. नेहमीपेक्षा यंदा सोयाबीनचे क्षेत्र वाढले असले तरी उगवण क्षमतेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देयंदा सोयाबीनचे क्षेत्र वाढले असले तरी उगवण क्षमतेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

योगेंद्र वाघ । लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : तालुक्यातील पेरणी झालेल्या पिकाची उगवण व पिक परिस्थिती सध्यातरी समाधानकारक आहे. मात्र, यंदाही मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा तर कापूस पिकावर सेंद्रीय बोंड अळीचा प्रार्दुभाव दिसून येत आहे. नेहमीपेक्षा यंदा सोयाबीनचे क्षेत्र वाढले असले तरी उगवण क्षमतेचा प्रश्न निर्माण झाला आहे.विषम पाणी पुरवठ्याने तीन भागात विभागलेला दुष्काळी तालुका म्हणून येवल्याची ओळख आजही कायम आहे. कालवा लाभक्षेत्रातील शेती वगळता तालुक्यातील शेती आजही, नैसर्गिक जलस्त्रोतांवरच अवलंबून आहे. पाऊस पडला तर शेती पिकली हे या भागातील समीकरण गेल्या पन्नासवर्षातही बदलू शकले नाही. नगदी पिकांकडे शेतकऱ्यांचा कल असल्याने तालुक्यात पारंपारीक पिकांकडून मका, कपाशी, सोयाबीन पिकांकडे शेतकरी वळले आहे. मात्र, अस्मानी, सुल्तानी संकटांनी तालुक्यातील शेतकर्?यांची पाठ सोडलेली नाही.गेल्या दोन वर्षात तालुक्यात पर्जन्यमान चांगले राहिले परिणामी उत्पादन वाढले परंतू शेतमालाचे भाव नेहमीप्रमाणेच पडल्याने तोंड मिळवणी करतांना शेतकऱ्यांना कसरतच करावी लागली. यंदाही, कोरोनाचा फटका बसल्याने शेतमालाचे भाव पडले अन् शेतकरी अिर्थक संकटात सापडला आहे. द्राक्ष, डाळींब,कांदा व भाजीपाला उत्पादकांना याचा मोठा फटका बसला. नगदी पिक हाच तालुक्याचा आजचा पिक पॅटर्न बनला असून यंदा उत्तर-पूर्व भागात चांगला पाऊस झाल्याने नद्या, बंधारे भरले तर विहिरींना पाणी उतरले आहे. या तुलनेत कालवा लाभक्षेत्रात दक्षिण-पश्चिम भागात मात्र पावसाचे प्रमाण कमी आहे. पेरण्यानंतर पावसाने ओढ दिल्याने केलेला खर्च वाया जातो की काय, या धास्तीने शेतकरी हवालदिल झाला होता. मात्र, बहुत्वांशी पिकांनी जमीनीच्यावर डोके काढल्याने बळीराजाच्या जीवात जीव आला आहे.चाचणीसाठी सोडण्यात आलेले मांजरपाड्याचे पाणी बाळापूर पर्यंत पोहचल्याने उत्तर-पूर्व भागातील वंचितांच्या आशा पालावल्या आहेत. तालुक्यातील वंचित भागातील अनेक शेतकºयांनी शेततळी करून नैसर्गिक व उपलब्ध पाण्याचा साठा करत शेती फुलवण्याचा प्रयत्न केला आहे. बोटावर मोजण्या इतक्या शेतकºयांनी शेतीतील नवे प्रयोग व नवे पिके घेण्याचा प्रयत्नही केला आहे. डोंगरपट्यातील शेतीसाठी स्वतंत्र विचार होणे ही काळाची गरज आजही कायम आहे.(फोटो २७ येवला,१)

टॅग्स :Waterपाणीagricultureशेती