शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

पावसाने दडी मारल्याने बळीराजा द्विधावस्थेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 6:51 PM

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील अनेक गावांत सुरु वातीला चांगला पाऊस झाल्याने बळीराजांच्या चेहऱ्यावर समाधान होते. त्यामुळे खरीप हंगामासाठी सज्ज होऊन बळीराजा मशागत करून पेरणीला लागला; परंतु नंतर पावसाने दडी मारल्याने बळीराजांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. रब्बी हंगामातील आलेला कटू अनुभव बाजूला सारून बळीराजाने यंदाच्या खरीप हंगामासाठी आपली कंबर कसली आहे. सुरुवातीला पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे लखमापूर, म्हेळुसके, परमोरी, अवनखेड, करंजवण, ओझे, ओझरखेड, दहेगाव वागळुद आदी भागातील शेतकरीवर्ग खरीप हंगामासाठी सज्ज झाला.

मध्यंतरी थोडा पाऊस उघडल्याने बळीराजांच्या पेरण्या मध्यावर आल्या असताना पावसाने दडी मारल्याने बळीराजांच्या कल्पनाना फाटा निर्माण झालाआहे. पेरण्या आटोपल्या असून, पावसाने पाठ फिरवल्याने तालुक्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. कोरोना, अस्मानी, सुलतानी संकटांनी ग्रामीण भागातील जनता त्रासून गेली आहे. त्यात मोठ्या कष्टाने खरीपाची तयारी करून जास्त कसे उत्पन्न घेता येईल.यंदा सुरु वातीला चांगला पाऊस झाल्याने पाण्याची काळजी मिटली या आशेवर बळीराजाने सोयाबीन, भुईमूग, मका, भात, ज्वारी आदी बियाणे खरेदी करून पेरणी केली.पावसाने पाठ दाखवल्याने खरीप हंगामाचे भांडवल वाया जाते की काय याची भीती बळीराजाला वाटू लागली आहे. या परिस्थितीतही उधार- उसनवारी करून बियाणे, खते खरेदी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. परिसरात खरीप हंगामातील मका, सोयाबीन पिकांच्या लागवडी झाल्या आहेत. मक्याचे अंकुर उगवले असून, सोयाबीनच्या पेरण्याही झाल्या आहेत. मात्र, अद्याप सोयाबीन उगवले नसल्याने शेतकरी चिंतित आहे. आठ दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने व वाढत्या उष्णतेने जमिनीची ओलही कमी होत चालल्याने मका, सोयाबीन पीक धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे शेतकºयांना मुसळधार पावसाची प्रतीक्षा आहे.

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती