शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

बाळासाहेब सानप स्वगृही परतण्याच्या तयारीत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 00:54 IST

विधानसभा निवडणुकीत पक्षाने उमेदवारी नाकारल्यानंतर राष्टवादीकडून निवडणूक रिंगणात उतरलेले व पराभूत होताच सेनेत प्रवेश केलेले माजी आमदार बाळासाहेब सानप यांना महापौर निवडणुकीत भाजपच्या पराभवासाठी प्रयत्न करूनही यश न मिळाल्याने ते पुन्हा स्वगृही परतण्याची चर्चा सुरू झाली आहे.

नाशिक : विधानसभा निवडणुकीत पक्षाने उमेदवारी नाकारल्यानंतर राष्टवादीकडून निवडणूक रिंगणात उतरलेले व पराभूत होताच सेनेत प्रवेश केलेले माजी आमदार बाळासाहेब सानप यांना महापौर निवडणुकीत भाजपच्या पराभवासाठी प्रयत्न करूनही यश न मिळाल्याने ते पुन्हा स्वगृही परतण्याची चर्चा सुरू झाली आहे. भाजपात असलेल्या सानप समर्थक नगरसेवकांनी महापौर निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावल्यामुळे सतीश कुलकर्णी महापौर होऊ शकले आहेत, त्यामुळे आता लवकरच सानपदेखील पक्षात येतील, असा दावा भाजपकडून केला जात आहे.तीस वर्षांहून अधिक काळ भाजप व राष्टय स्वयंसेवक संघात काम केलेल्या बाळासाहेब सानप यांना पक्षाने वेळोवेळी महत्त्वाची पदेही दिली आहेत. महापौर, उपमहापौर, शहराध्यक्ष, आमदारकी अशा विविध चढ्या पदांवर काम करणाऱ्या सानप यांनी त्या त्या पदावर असताना पक्ष वाढीसाठी योगदानही दिले होते. परंतु नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारली. त्यामुळे नाराज सानप यांनी ऐनवेळी राष्टÑवादीकडून उमेदवारी घेऊन निवडणूक लढविली व त्याच वेळी पक्षाला ‘माझे काय चुकले?’ असा सवाल केला होता. विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. परंतु दोनच दिवसांत त्यांनी राष्ट्रवादीला रामराम करून शिवसेनेचे शिवबंधन बांधले होते. ऐन महापौर निवडणुकीच्या तोंडावर सानप यांनी सेनेत प्रवेश केल्याने सेनेचे बळ वाढले. त्यातच सानप यांनी महापौरपद शिवसेनेकडे खेचून आणण्याचा मनसुबा रचून भाजपतील समर्थक नगरसेवकांना आपल्या कह्यात ठेवले होते. महापौर निवडणुकीत सानप यांची भूमिका सेनेसाठी महत्त्वाची ठरली असली तरी, त्याचा लाभ मात्र सेना उचलू शकली नाही. अन्य विरोधी पक्षांनीही सेनेला साथ देण्यास हात अखडता घेतल्यामुळे अखेरच्या क्षणी सानप यांनी आपल्या समर्थक नगरसेवकांना पुन्हा भाजपच्या पाठीशी उभे केले. परिणामी सतीश कुलकर्णी यांचे पारडे जड होऊन ते बिनविरोध निवडून आले. महापालिकेत पुन्हा भाजपचीच सत्ता आल्यामुळे आता बाळासाहेब सानप पुन्हा पक्षात सक्रिय होतील अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळेच सानप यांनी आपल्या समर्थकांना भाजपच्या पाठीशी उभे केल्याचा दावाही केला जात आहे.भाजपने व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सानप यांना भ्रष्टाचारी संबोधून त्यांची गय केली जाणार नाही असा जाहीररीत्या इशारा दिल्यामुळे सानप भाजपात जातील काय व पक्षदेखील त्यांना स्वीकारेल काय? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाBalasaheb Sanapबाळासाहेब सानपBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना