शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ठाणगावच्या शेतकऱ्याची द्राक्ष बागेवर कुऱ्हाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 18:03 IST

पाटोदा : गेल्या काही वर्षांपासून निसर्गाचा लहरीपणा व मागील वर्षापासून कोरोना महामारीच्या संकटामुळे द्राक्ष पिकास अपेक्षित भाव मिळत नसल्याने द्राक्ष शेती तोट्याची होऊ लागली आहे. या त्रासामुळेच काही ोशेतकऱ्यांनी आपल्या द्राक्ष बागांवर कुऱ्हाड चालविली आहे.

ठळक मुद्देउष्णतेमुळे प्रादुर्भाव : निसर्गाचा लहरीपणा अन‌् कोरोना फटका

पाटोदा : गेल्या काही वर्षांपासून निसर्गाचा लहरीपणा व मागील वर्षापासून कोरोना महामारीच्या संकटामुळे द्राक्ष पिकास अपेक्षित भाव मिळत नसल्याने द्राक्ष शेती तोट्याची होऊ लागली आहे. या त्रासामुळेच काही ोशेतकऱ्यांनी आपल्या द्राक्ष बागांवर कुऱ्हाड चालविली आहे.                       यावर्षी जानेवारी व फेब्रुवारी महिन्यांत पडलेल्या अवकाळी पावसाचा द्राक्ष बागांना फटका बसला असून, द्राक्ष मण्यांना तडे गेल्याने व्यापाऱ्यांनी या भागातील द्राक्ष खरेदीकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी कोलमडून पडला असल्याने येवला तालुक्यातील ठाणगाव येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी दीपक साहेबराव कव्हात या युवा शेतकऱ्याने हतबल होऊन आपल्या गट नंबर २६० मध्ये पिकासह उभ्या असलेल्या द्राक्ष बागेवर कुऱ्हाड चालवून द्राक्ष बाग आडवी करत आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली.                    मागील वर्षी अवकाळी पाऊस व वातावरणातील बदलावर मात करीत द्राक्ष बागेसाठी एकरी तीन लाख रुपये खर्च करून निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन घेतले. मात्र, कोरोनाच्या महामारीमुळे मातीमोल भावात द्राक्षे विकावी लागली. त्यामुळे औषधी तसेच मजुरांची देणेदारीचे सुमारे चार लाख रुपये रक्कम घरातून द्यावी लागली.                       यावर्षीही नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी व फेब्रुवारी या महिन्यांत वातावरणातील बदल, तसेच पडलेल्या अवकाळी पावसाने द्राक्ष बागांना मोठा फटका बसला आहे. द्राक्ष मण्यांना तडे गेल्याने व्यापाऱ्यांनी नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष बागा खरेदीकडे पाठ फिरवली असून, त्यांनी आपला मोर्चा सांगली जिल्ह्याकडे वळविला असल्याने या भागातील शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांच्या विनवण्या करून द्राक्ष कवडीमोल भावात विकावी लागत असल्याने उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.कवडीमोल दरनोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत वातावरणातील बदल व अवकाळी पावसामुळे उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. मात्र, कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी वर्गाचे आर्थिक गणित कोलमडून पडले असल्याने द्राक्ष बागा उभ्या करण्यासाठी बँका, पतसंस्था व सहकारी सोसायट्यांमार्फत घेतलेले कर्ज तसेच औषध विक्रेत्यांचे देणे कसे फेडायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.                              जे प्लॉट ऑक्टोबर छाटणीचे आहेत, ते आज सहा महिन्यांचे झाले आहेत. मागील महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने बागांचे नुकसान झाले आहे. द्राक्ष मण्यांना तडे गेल्याने पंधरा ते सोळा रुपये दरानेही खरेदीदार मिळत नसल्याने पीक बागेवर तसेच शिल्लक आहे. गेल्या पंधरा- वीस दिवसांपासून उष्णता जास्त वाढल्याने पिकावर उकाड्याचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्याने पीक धोक्यात आले आहे.माझ्याकडे सात एकर द्राक्ष बाग आहे. गेल्या दोन- तीन वर्षांपासून वातावरणातील बदलामुळे द्राक्ष बागा धोक्यात आल्या आहेत. त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. मागील वर्षापासून कोरोनाच्या नव्या संकटामुळे द्राक्षे मातीमोल भावात विकावी लागली. खर्च जास्त आणि उत्पन्न कामी, अशी स्थिती निर्माण झाल्याने आर्थिक गणित जुळवणे अवघड झाले असल्याने जड अंत:करणाने द्राक्ष बाग तोडण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे.-दीपक कव्हात, शेतकरी, ठाणगाव. 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती