साडेचार हजार मतदान केंद्रांमध्ये जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2019 11:17 PM2019-10-08T23:17:40+5:302019-10-08T23:18:31+5:30

नाशिक : विधानसभा निवडणुकीसंदर्भात राबविण्यात आलेल्या विविध प्रकारच्या उपाययोजनांनंतर निवडणूक पारदर्शक पार पाडण्यासाठी जिल्हा निवडणूक शाखेने काटेकोर नियोजन केले असून, जिल्ह्यात जनजागृती मोहीम राबविली आहे. जिल्ह्यातील ४,५७९ मतदान केंद्रांमध्ये सदर मोहीम राबविण्यात आली आहे. या मोहिमेतून सुमारे १ लाख ३४ हजार मतदारांनी प्रत्यक्ष जनजागृती मोहिमेत सहभाग घेतला आहे.

Awareness in the polling stations of four and a half thousand | साडेचार हजार मतदान केंद्रांमध्ये जनजागृती

साडेचार हजार मतदान केंद्रांमध्ये जनजागृती

Next
ठळक मुद्देनिवडणूक शाखा : दीड लाख मतदारांचा मतदार जनजागृती मोहिमेत सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : विधानसभा निवडणुकीसंदर्भात राबविण्यात आलेल्या विविध प्रकारच्या उपाययोजनांनंतर निवडणूक पारदर्शक पार पाडण्यासाठी जिल्हा निवडणूक शाखेने काटेकोर नियोजन केले असून, जिल्ह्यात जनजागृती मोहीम राबविली आहे. जिल्ह्यातील ४,५७९ मतदान केंद्रांमध्ये सदर मोहीम राबविण्यात आली आहे. या मोहिमेतून सुमारे १ लाख ३४ हजार मतदारांनी प्रत्यक्ष जनजागृती मोहिमेत सहभाग घेतला आहे.
निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार संपूर्ण जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर ईव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृती मोहीम राबविण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात जनजागृतीचे नियोजन करण्यात आले होते. या मोहिमेत प्रत्येक वयोगटातील मतदारांचा सहभाग नोंदविण्यात आला. शिवाय जनजागृतीसाठी शालेय आणि महाविद्यालयीन तरुणांमध्येदेखील जनजागृती करण्यात आली. संपूर्ण जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून जनजागृती मोहीम राबविण्यात येऊन प्रत्यक्ष मतदारांचा सहभाग नोंदविण्यात आला आहे.
जिल्ह्यातील ४५७९ मतदान केंद्रांवर १३० कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून जनजागृती प्रात्यक्षिक मोहीम राबविण्यात आली आहे. या मोहिमेसाठी प्रत्येकी ३० बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट मशीनचा वापर करण्यात आला आहे.
या मोहिमेत १,३४,०१० मतदारांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदविला असून १,०९,५९८ मतदारांनी मतदानाच्या प्रात्यक्षिकात सहभाग घेतला आहे.
लोकसभा निवडणुकीकरिता मूळ मतदान केंद्र ४,४४६ आणि २७४ सहाय्यकारी केंद्रे असे एकूण ४७२० मतदान केंद्रांवर निवडणूक घेण्यात आलेली आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आता १५०० पेक्षा जास्त मतदार असलेल्या मतदान केंद्रांसाठीच सहाय्यकारी मतदान केंद्र तयार करण्याबाबत निर्देश आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीकरिता मतदान केंद्रांची संख्या ही लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत कमी राहणार आहे.
साधारणत: १५० एवढे सहाय्यकारी मतदान केंद्रे विधानसभेसाठी तयार करण्यात येणार आहेत. एकूण मतदान केंद्रे साधारणत: ४,५९६ इतके राहणार आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत मतदारांनी ज्या मतदान केंद्रावर मतदान केले शक्यतो त्याच मतदान केंद्रावर विधानसभेसाठी मतदान घेण्यात येणार आहे. अपवादात्मक परिस्थितीत काही मतदान केंद्रांमध्ये बदल होऊ शकतात.२७४ सहाय्यकारी केंद्रलोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ करिता मूळ मतदान केंद्र ४,४४६ आणि २७४ इतके सहायकारी मतदान केंद्रे असे एकूण ४,७२० मतदान केंद्रांवर निवडणूक घेण्यात आलेली आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आता १५०० पेक्षा जास्त मतदार असलेल मतदान केंद्रांसाठीच सहायकारी मतदान केंद्र तयार करण्याबाबत निर्देश प्राप्त असल्यामुळे जिल्ह्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ करिता मतदान केंद्रांची संख्या ही लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत कमी राहणार आहे. एकूण १३३ सहाय्यकारी मतदान केंद्रे विधानसभा निवडणुकीसाठी तयार करण्यात आले असून, सदर प्रस्तावास भारत निवडणूक आयोगाने मान्यता दिलेली आहे. जिल्ह्यात मूळ मतदान केंद्र ४,४४६ आणि १३३ इतके सहाय्यकारी मतदान केंद्रे, असे एकूण ४५७९ एव्हढी मतदान केंद्रे आहेत.

Web Title: Awareness in the polling stations of four and a half thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.