शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

आरोग्य सांभाळा! तणावपूर्ण जीवनशैली टाळल्यास आजारांवर मात शक्य; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 10:48 IST

पंचवटी : दैनंदिन जीवन जगत असताना मनुष्याला तणाव, नैराश्य, एकांगीपणा यांच्यामुळे आजार जडतात. निरोगी राहण्यासाठी कायम आहार, विहार करावा ...

पंचवटी : दैनंदिन जीवन जगत असताना मनुष्याला तणाव, नैराश्य, एकांगीपणा यांच्यामुळे आजार जडतात. निरोगी राहण्यासाठी कायम आहार, विहार करावा तसेच मनुष्याने तणावपूर्ण जीवनशैली टाळल्यास आजारांवर सहज मात करणे शक्य असल्याचा सूर श्री काळाराम मंदिरात राम जन्मोत्सवानिमित्ताने आयोजित वासंतिक नवरात्र महोत्सवात आरोग्य परिसंवादात निघाला.

काळाराम मंदिरात झालेल्या आरोग्य परिसंवादात डॉ. समीर चंद्रात्रे, वैद्य विनय वेलणकर, डॉ. दीपाली निकम, डॉ. शैलेश बोदार्डे, डॉ. किशोर वाणी, डॉ. मनोज चोपडा, डॉ. शीतल मोकळ, अरुण एकबोटे यांनी सहभाग घेतला. यावेळी वैद्य डॉ. एकनाथ कुलकर्णी यांनी उपस्थित डॉक्टरांशी संवाद साधला. मधुमेह असणाऱ्या नागरिकांनी नियमित रक्त तपासणी करावी, असे डॉ. चंद्रात्रे यांनी सांगितले.

...तर वैद्य वेलणकर यांनी दैनंदिन जीवन जगत असताना मनुष्य विविध कारणांनी खचतो. आपण तणावपूर्ण जीवनशैली टाळली पाहिजे, तसे जीवन जगल्यास आजारांपासून दूर राहता येते. डॉ. वाणी यांनी कमी पाण्यामुळे किडनी मूतखड्यासारखे आजार जडतात. रोज चांगले पाणी पिणे गरजेचे असल्याचे सांगितले.

हृदयरोग तज्ज्ञ डॉ. चोपडा यांनी हृदय रोग होण्यापूर्वी ॲसिडिटी, जळजळ, गॅस असे त्रास पंधरा मिनिटांपेक्षा जास्त वेळ झाले तर वेळेत उपचार करावे. हृदय रोगाचा झटका आल्यास तीन ते सहा तासांच्या आत उपचारासाठी रुग्णालयात पोहोचावे. स्त्रियांमध्ये गर्भाशय मुखाच्या कॅन्सरचे प्रमाण वाढते आहे. त्यासाठी लसीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे. योग्यवेळी लसीकरण करून घेत धोका टाळावा, असे डॉ. निकम यांनी सांगितले.

कॅन्सरतज्ज्ञ डॉ. बोदार्डे यांनी कॅन्सरविषयी माहिती सांगताना, कॅन्सर म्हणजे पेशींची अमर्याद वाढ होणे. मानवी शरीराच्या कोणत्याही अवयवास कॅन्सर होऊ शकतो. स्त्रियांना स्तनाचा, गर्भाशयाच्या मुखाचा, तंबाखूजन्य पदार्थ खाणाऱ्यांना तोंडाचा कॅन्सर होतो. बालरोग तज्ज्ञ डॉ. मोकळ यांनी बालकांना सहा महिने आईचे दूधच द्यावे, मुलांच्या शारीरिक हालचाली अत्यंत महत्त्वाच्या आहेत त्यासाठी मैदानी खेळातही मुलांचा सहभाग असायला पाहिजे, असे सांगितले.

 

टॅग्स :NashikनाशिकHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स